शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
3
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
4
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
5
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
6
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
7
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
8
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
9
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
10
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
11
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
12
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
13
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
14
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
15
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
16
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
17
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
18
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
19
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
20
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!

‘सावित्री’ दुर्घटनेत विरारमधील काटकर यांचा अंत

By admin | Updated: August 6, 2016 02:50 IST

गणपतीची तयारी आटोपून विरारकडे निघालेल्या मंगेश काटकर (६२) यांचा महाड दुर्घटनेत दुर्दैवी अंत झाला.

विरार : गणपतीची तयारी आटोपून विरारकडे निघालेल्या मंगेश काटकर (६२) यांचा महाड दुर्घटनेत दुर्दैवी अंत झाला. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी विरार येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा, दोन जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.विरार पश्चिमेकडील गुलमोहर सोसायटीत राहणाऱ्या काटकर यांनी सिटी बँकेतून निवृत्त झाल्यानंतर समाजसेवा सुरु केली होती. लांजा येथे गणपती असल्याने त्याच्या तयारीसाठी चार दिवसांपूर्वी काटकर गावी गेले होते. घरची साफसफाई आणि गणपतीची पूर्वतयारी करून कातकर राजापूर-बोरीवली बसने विरार येथील घरी यायला निघाले होते. बसमध्ये बसल्यानंतर त्यांनी घरी फोनही केला होता. सकाळी बोरीवलीला उतरल्यानंतर फोन करतो, असे त्यांच्या पत्नीशी त्यांचे शेवटचे बोलणे झाले होते. दुसऱ्या दिवशी बातमीनंतर घरात प्रचंड तणावाचे वातावरण होते. (प्रतिनिधी)>काटकर परत येतील असा घरच्यांना विश्वास वाटत होता. मात्र, गुरुवारी संध्याकाळी काटकर यांचा मृतदेह आंबेत-म्हसळा नदीकिनारी हाती लागल्यानंतर कुटुंबिय शोकात बुडाले. पहाटे त्यांचा मृतदेह विरारला आणल्यानंतर सकाळी शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शोकात बुडालेल्या कुटुंबियांनी मीडियाशी बोलण्याचा नकार दिला.