शहरं
Join us  
Trending Stories
1
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
2
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
3
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
4
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
5
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
6
Video: खऱ्याखुऱ्या पोलिस काकांना पहिल्यांदाच पाहून चिमुकली भलतीच खुश, म्हणाली 'हाय फाईव्ह...'
7
कियारा अडवाणीसाठी आणण्यात आला स्पेशल केक, लेकीसोबत साजरा केला वाढदिवस; म्हणाली...
8
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
9
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
10
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
11
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
12
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
13
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
14
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना
15
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
16
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
17
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
18
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
19
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

सर्पापासून वाचवतेय ‘जादूची काठी’, सौरऊर्जेवर चालते उपकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 01:49 IST

देशासह राज्यात दरवर्षी हजारो जणांचा सर्पदंशाने मृत्यू होतो. विशेषत: राज्यात हा आकडा अधिक आहे. याचा सारासार विचार करत सर्पापासून मनुष्यप्राण्याचा विशेषत: शेतकऱ्याचा बचाव व्हावा म्हणून कर्नाटक येथील ‘प्रसादम् इंडस्ट्रीज’ने ‘द स्नेक गार्ड’चा शोध लावला आहे.

मुंबई : देशासह राज्यात दरवर्षी हजारो जणांचा सर्पदंशाने मृत्यू होतो. विशेषत: राज्यात हा आकडा अधिक आहे. याचा सारासार विचार करत सर्पापासून मनुष्यप्राण्याचा विशेषत: शेतकऱ्याचा बचाव व्हावा म्हणून कर्नाटक येथील ‘प्रसादम् इंडस्ट्रीज’ने ‘द स्नेक गार्ड’चा शोध लावला आहे. सौरऊर्जेवर चालणाºया या उपकरणातून पसरणाºया तरंगांमुळे सर्प मनुष्यप्राण्याच्या आसपास येत नसल्याचा दावा ‘प्रसादम्’ने केला आहे. परिणामी, सर्पदंशाच्या घटना घडणार नाहीत; आणि सर्प दिसल्यास त्यास मारण्याचे प्रमाणही कमी होईल, असा विश्वास ‘प्रसादम्’कडून व्यक्त करण्यात आला.सर्पदंशाने भारतात दरवर्षी ४६ हजार जणांचा मृत्यू होतो. राज्याचा विचार करता २०१७ साली महाराष्ट्रात सर्पदंशाच्या अनेक घटना घडल्या. सर्पदंशाच्या घटनांची नोंद १९ हजार १२ असून, त्यापैकी ५ हजार ४२५ नोंदी या ग्रामीण भागातील आहेत. महत्त्वाचे म्हणजे सर्प आढळला तर साहजिकच स्वसंरक्षणासाठी त्याला ठार केले जाते; मात्र अशा घटना घडताना यावर उपाययोजना काहीच केल्या जात नाहीत. परिणामी समस्या वाढतच जातात. यावर जालीम उपाय म्हणून ‘द स्नेक गार्ड’चा शोध लावला आहे. ‘प्रसादम् इंडस्ट्रीज’ आता ग्रामीण भागातील नागरिकांच्या मदतीसाठी सरसावली आहे. सर्पापासून स्वबचावासाठी ‘प्रसादम्’ने कर्नाटक आणि महाराष्ट्रातील शेतकºयांना ‘द स्नेक गार्ड’ प्रदान केले आहे.शेतात काम करताना सर्पांपासून बचावासाठी शेतकरी काठीचा वापर करतात. मात्र, यावर उपाय म्हणून ‘प्रसादम्’ने हे अल्ट्रासोनिक सोलार पॉवर कार्यप्रणाली संबंधित उपकरण वापरात आणले आहे. ते शेतकºयांना सोबत ठेवण्याएवढे सोयीचे असून, शेतात काम करताना सर्पांपासून बचाव करण्यासाठी ते जमिनीत गाडून उभे करता येईल, असे आहे. या उपकरणाच्या परिसरालगत सर्पांचा अधिवास आढळल्यास शेतकºयांना दक्षता बाळगता येईल. महत्त्वाचे म्हणजे उपकरण सौरऊर्जेवर चालणारे असल्याने ते हाताळणेही सोपे असून खर्चीक नाही; असा दावा ‘प्रसादम्’ने केला आहे. कर्नाटकसह महाराष्ट्रातील शेतकºयांना ‘द स्नेक गार्ड’ हे उपकरण वितरित केले असून, याचा निश्चितच शेतकºयांना फायदा होत असल्याचा दावा संस्थेने केला आहे.सौरऊर्जेवर चालते उपकरण‘द स्नेक गार्ड’ या उपकरणामधून निघणाºया तरंगांमुळे सर्प आसपासही येत नसल्याचे संस्थेचे म्हणणे आहे. उपकरण सौरऊर्जेवर चालते. त्याला चार्ज करण्याची गरज नाही. प्रत्येक सर्प विषारी असेल असे नाहीच. मात्र, सर्प आढळला की त्याला मारले जाते. तो बिनविषारी की विषारी हे पाहण्याची ती वेळ नसते. परिणामी, सर्पाचा जीव वाचवा, यासाठी हे उपकरण तयार केल्याचे ‘प्रसादम्’ने म्हटले आहे. ‘प्रसादम्’चे संस्थापक वेदोब्रोतो रॉय यांच्या म्हणण्यानुसार, हे उपकरण प्रायोगिक आहे. कर्नाटक, महाराष्ट्रातील शेतकरी वर्गाने त्याचा वापर केला असून, त्यांचे अनुभव चांगले असल्याचेही त्यांनी नमूद केले.

टॅग्स :Farmerशेतकरी