शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

शिवाजी महाराजांचे जीवंत स्मारक असलेले गडकिल्ले प्रथम जतन करा - संभाजीराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2017 17:19 IST

अरबी समुद्रात छत्नपती शिवाजी महाराजांचे स्मारक होत आहे, ही आनंदाची बाब आहे. तथापी छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवंत स्मारक

जयंत धुळप / ऑनलाइन लोकमत
रायगड, दि. 6 - अरबी समुद्रात छत्नपती शिवाजी महाराजांचे स्मारक होत आहे, ही आनंदाची बाब आहे. तथापी छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवंत स्मारक असलेले गडकिल्ले जतन करण्याचे काम प्रथम झाले पाहिजे अशी अपेक्षा  खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केली आहे. भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समीतीच्यावतीने, किल्ले रायगडावर मंगळवारी आयोजित 344 वा राज्याभिषेक सोहळा लाखो शिवभक्तांच्या साक्षीने संपन्न झाला. त्यावेळी खासदार संभाजीराजे बोलत होते.
रायगडच्या संवर्धनात शिवभक्तांनी वर्षातून दोन वेळा श्रमदान करावे.
खासदार संभाजीराजे यांनी रायगडच्या संवर्धनाच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित केलेल्या संवर्धन रायगडचे या शिवभक्तांच्या परिसंवादात जवळपास 12क्क् प्रश्न उपस्थित झाल्याचे ते म्हणाले. रायगडच्या संवर्धनात शिवभक्तांनी वर्षातून दोन वेळा श्रमदान करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. प्रारंभी खासदार छत्नपती संभाजी राजे यांचे ढोल ताशांच्या गजरात आगमन झाले. त्यांच्या हस्ते राजसदरेवर शिवराज्याभिषेकाला सुरु वात करण्यात आली. छत्नपती शिवाजी महाराजांच्या पुतळयास विविध गडावरु न आणलेल्या पाण्याने सह दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी युवराज शहाजीराजे तसेच जलसंपदा राज्यमंत्नी विजय शिवतारे, समीतीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, सेवानिवृत्त कोकण महसूल आयुक्त प्रभाकर देशमुख, राष्ट्रसेवा समुह संघटनेचे अध्यक्ष राहुल पोकळे, संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मनोज आखटे  आदि मान्यवरांसह व देशभरातून आलेले शिवभक्त मोठया संख्येने उपस्थित होते.
रायगड देशवासीयांचा आत्मा-
नुकतेच सेवानिवृत्त झालेले कोकण महसूल आयुक्त तथा किल्ले रायगड संवर्धनाचे प्रमुख मार्गदर्शक प्रभाकर देशमुख यावेळी बोलताना म्हणाले, रायगड किल्ला हा तमाम देशवासीयांचा आत्मा असून या किल्ल्याच्या संवर्धनाकरीता शासनाने 6क्क् कोटी रु पये मंजूर केले आहेत. त्यातून संवर्धनाचे काम सुरु  आहे. शिवसमाधीचा डोंब दुरु स्त करण्यात आला असून किल्ल्यावरील  तलावांची स्वच्छता करण्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगीतले. या संवर्धन आराखडयामध्ये परिसरातील गावांचा विकास आराखडा देखील तयार केल्याचे ते म्हणाले. शासनामार्फत रायगड किल्ला संवर्धनाचे कार्य  चांगल्या पध्दतीने सुरु  आहे. त्याद्वारे रायगडचे शिवकालीन वैभव पुन्हा जोमाने उभे  राहील असा विश्वास त्यांनी अखेरीस व्यक्त केला.
प्रचंड जल्लोषात शिवराज्याभिषेकाचा लोकोत्सव रायगड किल्ल्यावर साजरा झाला. यात ढोल, ताशे यांचा गजर तसेच पारंपारिक वेशपरिधान केलेले शिवभक्त आदिंचा उत्साह मोठा होता. पहाटे पाच वाजता शिवराज्याभिषेकाच्या कार्यक्र मास सुरु वात झाली. नगारखान्या समोर ध्वजारोहण करण्यात आले. शाहीरी कार्यक्र म मोठया जल्लोषात झाले. तसेच विविध मर्दानी खेळ, दांडपट्टा यांचे प्रात्यिक्षकेही दाखिवण्यात आली.
फोटो- भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समीतीच्यावतीने, किल्ले रायगडावर मंगळवारी आयोजित 344 व्या राज्याभिषेक सोहळ्य़ात सहभागी झालेले खासदार संभाजीराजे दिसत आहेत तर शेजारी युवराज शहाजीराजे ,जलसंपदा राज्यमंत्नी विजय शिवतारे, समीतीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, सेवानिवृत्त कोकण महसूल आयुक्त प्रभाकर देशमुख, राष्ट्रसेवा समुह संघटनेचे अध्यक्ष राहुल पोकळे, संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मनोज आखटे आदी.