शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

गायी वाचवण्यापेक्षा देश वाचवा - उद्धव ठाकरे

By admin | Updated: May 3, 2017 18:57 IST

दोन भारतीय जवानांचा शिरच्छेद करून विटंबना केल्यानंतर भारतातून पाकिस्तानबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - दोन भारतीय जवानांचा शिरच्छेद करून विटंबना केल्यानंतर भारतातून पाकिस्तानबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपाचा मित्रपक्ष शिवसेनेचे पक्षप्रमूख उद्धव ठाकरे यांनीदेखील संताप व्यक्त करत केंद्र सरकारवर तोंडसुख घेतलं आहे.  भाजपा सरकारने गायी वाचवण्यापेक्षा देश वाचवावा, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिला आहे.
 
भाजपाने पक्ष मजबूत करण्यापेक्षा देश आणि राज्य मजबूत करावं, एका सर्जिकल स्ट्राइकने पाक सुधारणार नाही तर पाकिस्तानमध्ये घुसून तुकडे करावेत.  मोदींच्या पाठीशी शिवसेना उभी राहील असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. वांद्रे येथील रंगशारदामध्ये लोकप्रतिनिधी प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते.   
 
महाराष्ट्रातील फडणवीस सरकारवर टीका करताना फडणवीस सरकार निरूपयोगी असल्याचं म्हणाले. उत्तर प्रदेशात योगी सरकार आहे, तर महाराष्ट्रात निरुप"योगी" सरकार आहे, असं ते म्हणाले. गोहत्येबाबत बोलताना गाय वाचवण्यापेक्षा देश वाचवावा असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
 
मध्यावधी निवडणुकांबाबत बोलताना त्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर टीका केली. काँग्रेस-राष्ट्रवादीने आधी स्वत:च्या नेत्यांच्या भाजपा प्रवेशाच्या बातम्या थांबवाव्या, मग आम्हाला सत्ता सोडण्याचा उपदेश करावा असं ते म्हणाले. तसेच मध्यावधी निवडणुका आज झाल्या तर आम्ही तयार आहोत असं वक्तव्य त्यांनी केलं.