शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

सतीशच्या हत्येसाठी मंतरलेला सुरा!

By admin | Updated: September 14, 2016 04:28 IST

डोंबिवलीतील व्यावसायिक सतीश रसाळ याच्या हत्येसाठी वापरलेला सुरा मंतरलेला होता असे तपासात पुढे आले. या प्रकरणी कल्याण गुन्हे शाखेने मुख्य मारेकऱ्यांसह त्या मांत्रिकालाही अटक केली.

ठाणे : डोंबिवलीतील व्यावसायिक सतीश रसाळ याच्या हत्येसाठी वापरलेला सुरा मंतरलेला होता असे तपासात पुढे आले. या प्रकरणी कल्याण गुन्हे शाखेने मुख्य मारेकऱ्यांसह त्या मांत्रिकालाही अटक केली. हा मांत्रिक पनवेलमधील मौजे वळवली गावचा माजी पोलीस पाटील आहे. दरम्यान, अटकेतील त्रिकुटाला १७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असे ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.परशुराम नारायण पाटील (७५) असे मांत्रिकाचे नाव आहे. त्याच्यासह जयदीप रसाळ आणि चंदन गायकवाड अशी प्रमुख मारेकऱ्यांची नावे आहेत. जयदीपची पत्नी मे महिन्यापासून त्याला सोडून निघून गेली होती. तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार २१ मे रोजी मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल होती. याचदरम्यान जयदीपला सतीशचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याची कु णकूण कानावर आली. तसेच सतीश हा ४ ते ६ सप्टेंबर दरम्यान तिच्यासोबत वसईत असल्याचे समजले. त्यामुळे संतापलेल्या जपदीपने मित्र चंदनच्या मदतीने सतीशचा काटा काढण्याचा निर्धार केला. याचदरम्यान जयदीपने त्याचा मानलेला मामा (मांत्रिक) परशुरामची घरी जाऊन भेट घेतली. तेथेच हत्येचा कट रचला. जयदीपने मामाकडून सुरा मंतरुन घेतला.आठ सप्टेंबरला जयदीप आणि चंदन यांनी सतीषवर पाळत ठेवली. यासाठी दोघांनी वेगवेगळ्या वाहनांचा वापर करुन पाठलाग केला. त्याच दिवशी रात्री जवळपास अकराच्या सुमारास जयदीपने मोटारसायकलमधील पेट्रोल संपल्याचा बहाणा केला. तेथून घरी चाललेल्या सतीश याने भाऊ रस्त्यात काय करतोय म्हणून विचारणा केली. त्यानंतर पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोल घेतले. याचवेळी दोघांनी मद्यप्राशन केले. गाडी थांबवण्याचा आग्रह जयदीपने केल्याने ते सोनारपाडा येथे थांबले. त्यावेळी चंदन हा त्यांच्या मागेच दुसऱ्या गाडीमध्ये होता. यावेळी सतीश गाडीच्या काचेवरील धुक्याने पडलेले दव आतून पुसत असताना तो बेसावध असल्याने पाहून जयदीपने त्याच्या डोके व मानेवर सुऱ्याने वार केले. त्यानंतर तेथे आलेल्या चंदनने सतीशचा गळा चिरून त्यास ठार मारले. जबरी चोरी झाल्याच्या बनावासाठी सतीशच्या अंगावरील दागिने, घड्याळ, मोबाईल व इत्यादी वस्तू घेऊन त्यांनी पोबारा केला. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांना धागेदोरे सापडणार नाही याची काळजी घेतली होती. पण जयदीपच्या पत्नीची बेपत्ता तक्रार, तसेच रसाळ कुटुंबीयांनी विकलेल्या जमिनीतून मिळणारे कोट्यावधी रुपये यादृष्टीने मानपाडा आणि कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपास सुरू केला. जयदीप याच्या पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधातून सतीशची हत्या झाल्याची धक्कादायक बाब समोर आल्यावर कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर आणि मानवी अनैतिक प्रतिबंधक पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर, सहायक पोलीस निरीक्षक विजय खेडकर यांच्या पथकाने सोमवारी तिघांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या मुद्देमालासह शस्त्र, मोटारसायकल, कार असा ७ लाख ३० हजारांचा ऐवज जप्त केला अशी माहिती मणेरे यांनी दिली. (प्रतिनिधी)संबंधित वृत्त/२