शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
3
PM Modi Birthday : जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
4
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
5
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
6
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
7
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
8
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
9
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
10
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
11
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
12
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
13
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
14
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
15
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
16
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
18
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
19
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
20
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली

Maharashtra Politics: “पक्षातील नेत्यांनी...” ; बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्यावर सत्यजित तांबेंची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 15:50 IST

Maharashtra Politics: नाशिक पदवीधर मतदारसंघातून विजयी झालेल्या सत्यजित तांबे यांनी बाळासाहेब थोरात यांच्या निर्णयावर स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.

Maharashtra Politics: काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून  अंतर्गत गटबाजी सुरू असल्याचे समोर आले आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीपासून काँग्रेसमध्ये सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरुन गोंधळ सुरू झाला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर नाराज असून, पक्षाच्या विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला असल्याची जोरदार चर्चा आहे. या चर्चेवर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. अलीकडेच झालेल्या विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातून विजयी झालेले सत्यजित तांबे यांनी बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली. 

विधीमंडळ नेतेपदाचा बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याच्या चर्चमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. नाना पटोले यांच्या कारभाराला कंटाळून हे पाऊल बाळासाहेब थोरात यांनी उचलल्याचे बोलले जाते आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांसह भाजपचे नेतेही यावर प्रतिक्रिया देत आहेत. यातच अपक्ष म्हणून निवडून आलेल्या सत्यजित तांबे यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. 

काँग्रेस पक्षाने याबाबत आत्मचिंतन केले पाहिजे

मीडियाशी बोलताना सत्यजित तांबे म्हणाले की, बाळासाहेब थोरात यांच्याशी माझा संपर्क झालेला नाही. मात्र त्यांनी राजीनामा दिला असेल तर काँग्रेस पक्षाने याबाबत आत्मचिंतन केले पाहिजे. काँग्रेसच्या दिग्गजांनी याबाबत विचार केला पाहिजे, असे सत्यजित तांबे म्हणाले. याशिवाय सत्यजित तांबे यांचे वडील सुधीर तांबे यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. ही व्यथित होणारी गोष्ट आहे. बाळासाहेब थोरात हे ज्येष्ठ नेते आहेत. काँग्रेसच्या विचारांवर त्यांची निष्ठा आहे. माझी त्यांची चर्चा झालेली नाही, मात्र त्यांना हा निर्णय घेण्याची वेळ का आली? यावर विचार व्हायला हवा, असे सुधीर तांबे म्हणाले. 

दरम्यान, जेव्हा एखादी व्यक्ती पक्षाच्या विचारधारेशी जोडलेली आहे. पक्षासाठी समर्पित भावनेने काम करत असताना त्यांना विश्वासात न घेणे किंवा एखाद्या निर्णयात सहभागी करुन न घेणे, हे योग्य नाही. ते विधिमंडळ पक्षनेते आहेत, त्यांच्याशी चर्चा व्हायला हवी होती, असे मला वाटते. काँग्रेसच्या अडचणीच्या काळात ज्यांनी नेतृत्व केले. काँग्रेसच्या सर्व कार्यक्रमात झोकून देऊन काम केले. याबाबत पक्षश्रेष्ठींनी गंभीर होऊन विचार केला पाहिजे, असे तांबे यांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Satyajit Tambeसत्यजित तांबेBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात