शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सातारचे पोलीस म्हणतात, गडचिरोली नको रे बाबा..!

By admin | Updated: December 29, 2014 00:04 IST

पोलिसांचा शून्य प्रतिसाद : बढतीचा निर्णय तरीही नक्षलवादी भागात जाण्यास नकार

मोहन मस्कर-पाटील - सातारा -‘नक्षलग्रस्त गडचिरोलीत जा, बढती मिळवा,’ या गृहविभागाच्या आवाहनास सातारा जिल्ह्यातील पोलिसांनी ठेंगा दाखविला आहे. विशेष म्हणजे, गृह विभागाने येथे नियुक्तीचा निर्णय घेत असताना बढतीचे इतर नियम, निकष बाजूला ठेवले आहेत. तरीही सातारचे पोलीस ‘गडचिरोली नको रे बाबा...’ म्हणत आहेत.गृहविभागाने विविध पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत हवालदारांना ‘सहायक फौजदार’पदी बढतीचा निर्णय घेतला आहे. इतर काही पदांचाही त्यात समावेश केला आहे. गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यांत नेहमीच नक्षलवादी विरुद्ध पोलीस आणि स्थानिक, असा संघर्ष असतो. गेल्या दहा वर्षांत हजारोंना प्राण गमवावा लागला आहे. परिणामी येथे काम करण्यास पोलीस उत्सुक नसतात. पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू झालेल्यांना सुरुवातीच्या काळात काही दिवस येथे काम करावे लागते. त्यामुळे येथे त्यांचा प्रश्न निकालात निघतो. मात्र, इतर पदांच्या बाबतीत तसे नाही. येथे सहायक फौजदार त्याचबरोबर इतर पदे येथे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यातच गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया भागात पोलिसांची कमतरता आहे, परिणामी नक्षलवाद विरोधात मोहीम राबविताना शासनापुढे असंख्य अडचणी आहेत. त्यावर विचार करून राज्याच्या गृहविभागाने महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘पोलिसांनो बढती हवी, तर मग चला गडचिरोलीला...’ असे नमूद करत नक्षलवादी भागात काम करण्यासाठी आवाहन केले होते. हे आवाहन करत असतानाच गृह विभागाने सर्व निकष बाजूला ठेवून त्यासाठी कर्मचारी, अधिकाऱ्यांना तातडीने (वेगवर्धित) बदली देण्याचाही निर्णय घेतला होता. मात्र, त्याकडे पाठच फिरविली आहे. विशेष म्हणजे, या आवाहनास मूळचे गडचिरोलीचे असणारे मात्र, इतर जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिल्याची माहिती पुढे आली आहे. नोव्हेंबर महिन्यात गृह विभागाने राज्यातील सर्वच पोलीस ठाण्यांना जे हवालदार बढती घेऊन सहायक फौजदार होण्यास इच्छुक आहेत, त्यांच्याकडून अर्ज भरून घेऊन माहिती संकलनास सांगितले होते. यासाठी दि. १५ डिसेंबर ही अंतिम मुदत दिली होती. त्यानुसार सातारचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सर्वच पोलीस ठाणे प्रमुखांना कळविले होते. मात्र, दि. १५ डिसेंबरपर्यंत एकही अर्ज पोलीस अधीक्षकांकडे आला नव्हता. दरम्यान, ही तारीख उलटून आता पंधरा दिवस झाले तरी सातारच्या पोलिसांनी या निर्णयाला नापसंतीच दर्शविली आहे.अशी होती योजना‘बढती हवी... चला गडचिरोलीला...’ या गृहविभागाच्या योजनेअंतर्गत राज्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अर्ज करता येणार होते. जे गडचिरोलीला जाण्यास तयार होतील, त्यांना तत्काळ एक बढती देऊनच येथे रुजू करून घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, ही बढती कायम राहून सेवा ज्येष्ठता यादीतही संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे नाव येणार होते. मात्र, साताऱ्यात कार्यरत पोलिसांनी त्यास नकार दिल्यामुळे बढतीचा आता प्रश्नच येत नाही....का नको गडचिरोलीदेशात वीस राज्ये नक्षलग्रस्त असून, महाराष्ट्रात गडचिरोली सर्वाधिक नक्षलवादी प्रभावी जिल्हा आहे. त्यापाठोपाठ गोंदिया, चंद्रपूर जिल्हे आहेत. देशभरात दरवर्षी जे नक्षलवादी हल्ले होतात, त्यापैकी गडचिरोली जिल्ह्याचे हल्ल्याचे सहा टक्के तर शहीद होण्याचे प्रमाण नऊ टक्के आहे. येथे दरवर्षी शंभरच्या आसपास पोलीस अधिकारी, कर्मचारी, नागरिक नक्षली हल्ल्यात बळी पडतात. त्यामुळे गडचिरोली नाव उच्चारले तरी नवीन पोलिसांना येथे रुजू होताना काटा येतो.