शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

Satara Bus Accident: साहेबांनी बोलावले म्हणून गेला...तो परतलाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 02:33 IST

पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तो मुंबईत आला होता; पण त्याला दापोली कृषी विद्यापीठातून कॉल आला. त्याचे मूळ गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली असल्याने त्याने जवळच्या फोंडा येथेच आपली पोस्टिंग करून घेतली.

- मनीषा म्हात्रेमुंबई : पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तो मुंबईत आला होता; पण त्याला दापोली कृषी विद्यापीठातून कॉल आला. त्याचे मूळ गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली असल्याने त्याने जवळच्या फोंडा येथेच आपली पोस्टिंग करून घेतली. अशात दापोलीच्या साहेबांनी बोलावले, असे सांगून तो घरातून निघाला; पण थेट त्याच्या मृत्यूच्या बातमीने फोन खणखणल्याचे, आंबेनळी घाट दुर्घटनेतील मृत विनायक सावंत (२७) याच्या नातेवाइकांनी सांगितले.कणकवलीमध्ये विनायक हा आई आणि भावासोबत राहायचा. त्याला लहानपणापासूनच पोलीस व्हायचे होते. त्यासाठी त्याने ९ वर्षांपूर्वी वरळीतील पोलीस काकांकडे धाव घेतली. वरळी बीडीडी चाळ क्रमांक २३ मध्ये विनायकचे काका बी. सावंत राहतात. ते मुंबई पोलीस दलातील सशस्त्र विभागात कार्यरत आहेत. विनायक चार ते पाच वेळा पोलीस भरतीत सहभागी झाला. मात्र, काही गुणांमुळे तो मागे राहायचा. त्याने प्रयत्न सोडले नाहीत. महाराष्ट्र सुरक्षा बलात चार महिने नोकरी केली. वर्षभरापूर्वी दापोली कृषी विद्यापीठातून कॉल आला. तेथे नोकरी करून भरतीचे प्रयत्न सुरूच ठेवायचे ठरविले. तो दापोली कृषी विद्यापीठात लिपिक पदावर रुजू झाला. तिथे काही महिने काम केले. मात्र, प्रवासात खर्च आणि वेळ वाया जात असल्याने त्याने फोंडा येथे बदली करून घेतली. फोंडाजवळ राहत असलेल्या चुलत्यांकडे तो राहत होता.शनिवारी घरातून निघताना, दापोलीच्या साहेबांनी बोलावले म्हणून तेथे जात असल्याचे सांगून तो घराबाहेर पडला. अनेकदा साहेबांनी बोलावले की, त्याला दापोलीला जावे लागत असे. मुलगा कामाला गेला आहे, नेहमीप्रमाणे घरी येईल. या विचारात कुटुंबीय होते. तो पिकनिकला जात आहे, याबाबत ते अनभिज्ञ होते. अशातच, शनिवारी सकाळी दापोलीच्या कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या बसचा अपघात झाल्याची माहिती कानावर पडली. मात्र, मुलगा तर कामाला गेला आहे... तो यामध्ये नसणार, असे स्वत:लाच धीर देत कुटुंबीय एकमेकांची समजूत काढत होते. त्यानंतर माध्यमांवर ग्रुपच्या फोटोमध्ये मुलाचा फोटो दिसला आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.विनायक गेला यावर विश्वासच बसत नाही..या अपघातात आमचा विनायक गेला, यावर अजूनही विश्वास बसत नसल्याचे त्याचे काका सावंत यांनी सांगितले. त्यांनी त्यांच्या मुलाप्रमाणे विनायकचा सांभाळ केला होता. या घटनेने सावंत कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

टॅग्स :Satara Bus Accidentसातारा बस अपघात