शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

Satara Bus Accident: साहेबांनी बोलावले म्हणून गेला...तो परतलाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 02:33 IST

पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तो मुंबईत आला होता; पण त्याला दापोली कृषी विद्यापीठातून कॉल आला. त्याचे मूळ गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली असल्याने त्याने जवळच्या फोंडा येथेच आपली पोस्टिंग करून घेतली.

- मनीषा म्हात्रेमुंबई : पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तो मुंबईत आला होता; पण त्याला दापोली कृषी विद्यापीठातून कॉल आला. त्याचे मूळ गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली असल्याने त्याने जवळच्या फोंडा येथेच आपली पोस्टिंग करून घेतली. अशात दापोलीच्या साहेबांनी बोलावले, असे सांगून तो घरातून निघाला; पण थेट त्याच्या मृत्यूच्या बातमीने फोन खणखणल्याचे, आंबेनळी घाट दुर्घटनेतील मृत विनायक सावंत (२७) याच्या नातेवाइकांनी सांगितले.कणकवलीमध्ये विनायक हा आई आणि भावासोबत राहायचा. त्याला लहानपणापासूनच पोलीस व्हायचे होते. त्यासाठी त्याने ९ वर्षांपूर्वी वरळीतील पोलीस काकांकडे धाव घेतली. वरळी बीडीडी चाळ क्रमांक २३ मध्ये विनायकचे काका बी. सावंत राहतात. ते मुंबई पोलीस दलातील सशस्त्र विभागात कार्यरत आहेत. विनायक चार ते पाच वेळा पोलीस भरतीत सहभागी झाला. मात्र, काही गुणांमुळे तो मागे राहायचा. त्याने प्रयत्न सोडले नाहीत. महाराष्ट्र सुरक्षा बलात चार महिने नोकरी केली. वर्षभरापूर्वी दापोली कृषी विद्यापीठातून कॉल आला. तेथे नोकरी करून भरतीचे प्रयत्न सुरूच ठेवायचे ठरविले. तो दापोली कृषी विद्यापीठात लिपिक पदावर रुजू झाला. तिथे काही महिने काम केले. मात्र, प्रवासात खर्च आणि वेळ वाया जात असल्याने त्याने फोंडा येथे बदली करून घेतली. फोंडाजवळ राहत असलेल्या चुलत्यांकडे तो राहत होता.शनिवारी घरातून निघताना, दापोलीच्या साहेबांनी बोलावले म्हणून तेथे जात असल्याचे सांगून तो घराबाहेर पडला. अनेकदा साहेबांनी बोलावले की, त्याला दापोलीला जावे लागत असे. मुलगा कामाला गेला आहे, नेहमीप्रमाणे घरी येईल. या विचारात कुटुंबीय होते. तो पिकनिकला जात आहे, याबाबत ते अनभिज्ञ होते. अशातच, शनिवारी सकाळी दापोलीच्या कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या बसचा अपघात झाल्याची माहिती कानावर पडली. मात्र, मुलगा तर कामाला गेला आहे... तो यामध्ये नसणार, असे स्वत:लाच धीर देत कुटुंबीय एकमेकांची समजूत काढत होते. त्यानंतर माध्यमांवर ग्रुपच्या फोटोमध्ये मुलाचा फोटो दिसला आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.विनायक गेला यावर विश्वासच बसत नाही..या अपघातात आमचा विनायक गेला, यावर अजूनही विश्वास बसत नसल्याचे त्याचे काका सावंत यांनी सांगितले. त्यांनी त्यांच्या मुलाप्रमाणे विनायकचा सांभाळ केला होता. या घटनेने सावंत कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

टॅग्स :Satara Bus Accidentसातारा बस अपघात