शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
3
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
4
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
5
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
6
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
7
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
8
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
9
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
10
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
11
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
13
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
14
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
15
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
16
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
17
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
18
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
19
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
20
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?

Satara Bus Accident: साहेबांनी बोलावले म्हणून गेला...तो परतलाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 02:33 IST

पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तो मुंबईत आला होता; पण त्याला दापोली कृषी विद्यापीठातून कॉल आला. त्याचे मूळ गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली असल्याने त्याने जवळच्या फोंडा येथेच आपली पोस्टिंग करून घेतली.

- मनीषा म्हात्रेमुंबई : पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तो मुंबईत आला होता; पण त्याला दापोली कृषी विद्यापीठातून कॉल आला. त्याचे मूळ गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली असल्याने त्याने जवळच्या फोंडा येथेच आपली पोस्टिंग करून घेतली. अशात दापोलीच्या साहेबांनी बोलावले, असे सांगून तो घरातून निघाला; पण थेट त्याच्या मृत्यूच्या बातमीने फोन खणखणल्याचे, आंबेनळी घाट दुर्घटनेतील मृत विनायक सावंत (२७) याच्या नातेवाइकांनी सांगितले.कणकवलीमध्ये विनायक हा आई आणि भावासोबत राहायचा. त्याला लहानपणापासूनच पोलीस व्हायचे होते. त्यासाठी त्याने ९ वर्षांपूर्वी वरळीतील पोलीस काकांकडे धाव घेतली. वरळी बीडीडी चाळ क्रमांक २३ मध्ये विनायकचे काका बी. सावंत राहतात. ते मुंबई पोलीस दलातील सशस्त्र विभागात कार्यरत आहेत. विनायक चार ते पाच वेळा पोलीस भरतीत सहभागी झाला. मात्र, काही गुणांमुळे तो मागे राहायचा. त्याने प्रयत्न सोडले नाहीत. महाराष्ट्र सुरक्षा बलात चार महिने नोकरी केली. वर्षभरापूर्वी दापोली कृषी विद्यापीठातून कॉल आला. तेथे नोकरी करून भरतीचे प्रयत्न सुरूच ठेवायचे ठरविले. तो दापोली कृषी विद्यापीठात लिपिक पदावर रुजू झाला. तिथे काही महिने काम केले. मात्र, प्रवासात खर्च आणि वेळ वाया जात असल्याने त्याने फोंडा येथे बदली करून घेतली. फोंडाजवळ राहत असलेल्या चुलत्यांकडे तो राहत होता.शनिवारी घरातून निघताना, दापोलीच्या साहेबांनी बोलावले म्हणून तेथे जात असल्याचे सांगून तो घराबाहेर पडला. अनेकदा साहेबांनी बोलावले की, त्याला दापोलीला जावे लागत असे. मुलगा कामाला गेला आहे, नेहमीप्रमाणे घरी येईल. या विचारात कुटुंबीय होते. तो पिकनिकला जात आहे, याबाबत ते अनभिज्ञ होते. अशातच, शनिवारी सकाळी दापोलीच्या कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या बसचा अपघात झाल्याची माहिती कानावर पडली. मात्र, मुलगा तर कामाला गेला आहे... तो यामध्ये नसणार, असे स्वत:लाच धीर देत कुटुंबीय एकमेकांची समजूत काढत होते. त्यानंतर माध्यमांवर ग्रुपच्या फोटोमध्ये मुलाचा फोटो दिसला आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.विनायक गेला यावर विश्वासच बसत नाही..या अपघातात आमचा विनायक गेला, यावर अजूनही विश्वास बसत नसल्याचे त्याचे काका सावंत यांनी सांगितले. त्यांनी त्यांच्या मुलाप्रमाणे विनायकचा सांभाळ केला होता. या घटनेने सावंत कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

टॅग्स :Satara Bus Accidentसातारा बस अपघात