शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

स्त्री–पुरुष समानतेला घाबरणारे मर्द ‘सरपंचपती’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2022 10:35 IST

बाईकडे सत्ता आली, ती भ्रष्टाचारावर बोट ठेवायला लागली, तशा विरोधाच्या लाटा आल्या! गावागावांत सरपंचपतींचा कहर अजूनही माजलेला आहे.

- भीम रासकर

कमला भसीन म्हणायच्या, ‘Men of Quality are not Afraid of Equality’- जे पुरुष स्वतः माणूस म्हणून परिपक्व, गुणवान आहेत, त्यांना समानतेची भीती कधीच वाटत नाही! महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण मिळाल्यापासून राजकारणात व खास करून गावराजकारणात “भूकंप” आलेला आहे. मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यात एका ग्रामपंचायतीच्या शपथविधी कार्यक्रमात निवडून आलेल्या महिला पदाधिकाऱ्यांऐवजी त्यांचे पती व अन्य नातेवाइकांनीच शपथ घेतली, असे नुकतेच वाचले. अर्थात ग्रामसचिवांवर कारवाई केली गेली आहे!

त्र्याहत्तरव्या घटनदुरुस्तीनंतर गावागावांत सरपंचपतींचा अजूनही कहर माजलेला आहे.  सरपंच किंवा पंच ही बाई झाली तरी विजयी मिरवणुका सत्कार, अभिनंदन पार्ट्या व पुढील सोपस्कार बाईला फक्त सोबत ठेवून पार पाडले जातात. सरपंचपतींची ही अधोगती गावातले मतदार, गावपुढारी, प्रशासन व्यवस्था व घरातली माणसंही- आनंदानं का स्वीकारतात, याचं कारण एकच- बाईला राजकारण जमणारं नाय, तो तिचा पिंडच नाय- याबद्दल मनात एक सामूहिक विश्वास तयार झाला आहे.गेली २२ वर्षे आम्ही ‘महिला राजसत्ता आंदोलन’ म्हणून महाराष्ट्रात पंचायत पंच-सरपंचांसोबत काम करीत आहोत. गावापासून विश्वसंसदेपर्यंत कारभारणींचे प्रश्न मांडत आहोत. महाराष्ट्रात महिला चळवळीचा पाया लाभल्यानं आम्हांला मंदगतीनं का होईना यश मिळत आहे.  हळूहळू महिला सरपंच स्वत:चा फोन स्वत:च घेऊन खुला संवाद करायला लागल्या आहेत.   

एखाद्या महिलेला गावकारभारात सहकार्य करणाऱ्या परिवारांना आम्ही मान्यवरांच्या सहीचे “परिवार सन्मानपत्र” देतो. निवडणुकीत पत्नी सरपंच झाली तरी उभयतांचा सत्कार करून पतीकडून “हस्तक्षेप होणार नाही,”  हे जाहीरपणे गावासमोर वदवून घेता येतं! गावच मग त्या पती महोदयांवर नीट अंकुश ठेवतं. पुरुषप्रधानता नीट ओळखणं शिकवणाऱ्या  कोर्सचं आम्ही नामकरण केलं आहे,- ‘पपुजाधव कोर्स.’ म्हणजे, - ‘परंपरांचं, पुरुषीपणाचं, जातीचं, धर्माचं व वर्गाचं (श्रीमंत-गरीब) वर्चस्व’! वर्चस्ववादी मतदार, उमेदवार व शासन व्यवस्था कशी समजून घ्यावी, यासाठी हा कोर्स या महिलांना एक सजग दृष्टी देतो. 

बाईकडे सत्ता आली, तिला बजेट कळायला लागलं, ती भ्रष्टाचारावर बोट ठेवायला लागली, नवऱ्याचं व पक्षप्रमुखांचं ऐकेनाशी झाली; तशी सरपंचपतींची लाट आली! चारित्र्यहनन करा, हल्ले करा, सतत तिला अनियमिततेचा बडगा दाखवा, ग्रामसेवकांना हाताशी धरून प्रशासकीय खोड्या काढा..ही कारस्थानं आजही जोरात सुरू आहेत. प्रत्येक महिलेला समानता, सन्मान, सत्ता, संपत्ती व संसाधनात न्याय्य वाटा मिळाला तर तिचंही देशउभारणीतलं योगदान नक्की वाढेल! आज या अर्ध्या मानवी शक्तीला कमी लेखून आपण देश व संपूर्ण मानवी समाजाचं अपरिमित नुकसान केलेलं आहे. सरपंचपती ही गावकारभाराची अधोगती मानणारी गावंच्या गावं तयार व्हायला हवीत. स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना आरक्षण मिळालं, त्याचं सरंरक्षण व संवर्धन ही समाज म्हणून आपली जबाबदारी आहे!