शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

माउलींच्या पालखीचे ११ जूनला होणार प्रस्थान; यंदा लोणंदमध्ये दोन दिवस मुक्काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 07:36 IST

यंदा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आषाढी पायी वारीसाठी ११ जूनला आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार असल्याची माहिती

आळंदी :

यंदा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आषाढी पायी वारीसाठी ११ जूनला आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार असल्याची माहिती प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी दिली.

प्रथा-परंपरेनुसार रविवार, दि. ११ जूनला सायंकाळी साडेचारच्या सुमारास वाजत-गाजत माउलींच्या पालखीचे प्रस्थान होईल. दर्शनबारी मंडपात (आजोळी) माउलींचा पहिला मुक्काम असणार आहे. १२ व १३ जूनला पालखी सोहळा पुण्यनगरीत मुक्कामी राहील. दि. १४ व १५ सासवड, त्यानंतर १६ जेजुरी, १७ वाल्हे, १८ व १९ जूनला सोहळा लोणंद येथे मुक्कामी असेल. 

लोणंदमधून २० रोजी निघाल्यानंतर चांदोबाचा लिंब येथे उभे रिंगण करून पालखी मुक्कामासाठी तरडगावला असेल. २१ जूनला फलटण, २२ रोजी बरड, २३ नातेपुते मुक्कामी असेल.  २४ रोजी पुरंदावडे येथे गोल रिंगण करून माळशिरसला मुक्कामी जाईल. २५ रोजी पानीव येथे गोल रिंगण करून वेळापूर मुक्काम तर  २६ रोजी ठाकूर बुवाच्या समाधीजवळ गोल रिंगण करून भंडीशेगावला मुक्काम असेल. २७ रोजी बाजीरावची विहीर येथे उभे व गोल रिंगण करून सोहळा वाखरी मुक्कामी जाईल. २८ जूनला इसबावी येथे उभे रिंगण करून रात्री सोहळा श्रीक्षेत्र पंढरपूरला मुक्कामी पोहोचेल. पंढरीत आषाढी एकादशीचा महासोहळा २९ जूनला संपन्न होईल. 

पालखीचा असा असेल परतीचा प्रवास३ जुलै पौर्णिमेपर्यंत सोहळा विठ्ठलनगरीत विसावेल. गोपालकाला होऊन सोहळा परतीच्या प्रवासासाठी निघून १२ जुलै रोजी आळंदीत पोहचेल. अशी माहिती व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली.