शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

माउलींच्या पालखीचे ११ जूनला होणार प्रस्थान; यंदा लोणंदमध्ये दोन दिवस मुक्काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 07:36 IST

यंदा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आषाढी पायी वारीसाठी ११ जूनला आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार असल्याची माहिती

आळंदी :

यंदा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आषाढी पायी वारीसाठी ११ जूनला आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार असल्याची माहिती प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी दिली.

प्रथा-परंपरेनुसार रविवार, दि. ११ जूनला सायंकाळी साडेचारच्या सुमारास वाजत-गाजत माउलींच्या पालखीचे प्रस्थान होईल. दर्शनबारी मंडपात (आजोळी) माउलींचा पहिला मुक्काम असणार आहे. १२ व १३ जूनला पालखी सोहळा पुण्यनगरीत मुक्कामी राहील. दि. १४ व १५ सासवड, त्यानंतर १६ जेजुरी, १७ वाल्हे, १८ व १९ जूनला सोहळा लोणंद येथे मुक्कामी असेल. 

लोणंदमधून २० रोजी निघाल्यानंतर चांदोबाचा लिंब येथे उभे रिंगण करून पालखी मुक्कामासाठी तरडगावला असेल. २१ जूनला फलटण, २२ रोजी बरड, २३ नातेपुते मुक्कामी असेल.  २४ रोजी पुरंदावडे येथे गोल रिंगण करून माळशिरसला मुक्कामी जाईल. २५ रोजी पानीव येथे गोल रिंगण करून वेळापूर मुक्काम तर  २६ रोजी ठाकूर बुवाच्या समाधीजवळ गोल रिंगण करून भंडीशेगावला मुक्काम असेल. २७ रोजी बाजीरावची विहीर येथे उभे व गोल रिंगण करून सोहळा वाखरी मुक्कामी जाईल. २८ जूनला इसबावी येथे उभे रिंगण करून रात्री सोहळा श्रीक्षेत्र पंढरपूरला मुक्कामी पोहोचेल. पंढरीत आषाढी एकादशीचा महासोहळा २९ जूनला संपन्न होईल. 

पालखीचा असा असेल परतीचा प्रवास३ जुलै पौर्णिमेपर्यंत सोहळा विठ्ठलनगरीत विसावेल. गोपालकाला होऊन सोहळा परतीच्या प्रवासासाठी निघून १२ जुलै रोजी आळंदीत पोहचेल. अशी माहिती व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली.