शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

बंद उद्योगांना मिळणार संजीवनी

By admin | Updated: August 24, 2014 01:09 IST

विशेष अभय योजनेला महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने ३१ मार्च २०१५ पर्यंत मुदतवाढ दिल्याने बंद उद्योगांना संजीवनी मिळणार आहे.

अभय योजनेला मुदतवाढ : नादार घोषित उद्योगांचे पुनरुज्जीवनसुहास सुपासे - यवतमाळविशेष अभय योजनेला महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने ३१ मार्च २०१५ पर्यंत मुदतवाढ दिल्याने बंद उद्योगांना संजीवनी मिळणार आहे. पुनरुज्जीवनक्षम नसलेले आणि बंद उद्योगांकडील शासकीय देणी थकीत असल्यास, त्या थकीत देणीची मुद्दल रक्कम संबंधित उद्योजकाने एकरकमी भरल्यास त्यावरील व्याज व दंडनीय रक्कम माफ करून त्या उद्योगाची स्थिर मालमत्ता अन्य उद्योजकाकडे हस्तांतरित करण्यास विशेष अभय योजनेद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे. शासनाच्या निकषांची पूर्तता करणाऱ्या उद्योगांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. एक वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी बंद असलेला किंवा न्यायालयाकडून नादार किंवा दिवाळखोर म्हणून घोषित झालेला उद्योग योजनेसाठी पात्र ठरणार आहे. त्याचप्रमाणे विशेष अभय योजनेचा लाभ देताना काही महत्वपूर्ण सूचना उद्योग विभागाच्यावतीने करण्यात आल्या आहेत. त्यानुसार उद्योग बंद किंवा पुनरुज्जीवनक्षम नसल्याबाबत स्ांबंधित वित्तीय संस्थेचे किंवा रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या आजारी उद्योगाच्या व्याख्येनुसार सदर उद्योग आजारी असल्याबाबत सनदी लेखापालांचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. उद्योग बंद पडला असल्याबाबतचा सज्जड पुरावा आवश्यक राहणार आहे. यामध्ये संबंधित कालावधीतील विद्युत देयके, वीज किंवा पाणीपुरवठा खंडित केल्याबाबतची कागदपत्रे, उत्पादन बंद पडल्याच्या आर्थिक वर्षापासूनचे वार्षिक ताळेबंद यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरला जाणार आहे. संबंधित उद्योगास विशेष अभय योजनेचा लाभ देण्यात आल्यानंतर पूर्वीच्या व्यवस्थापनामध्ये बदल अपेक्षित आहे. कंपनी असेल तर तिच्या भाग भांडवलातील नियंत्रक हितसंबंधांमध्ये बदल करण्यात यावा तसेच भागीदारी संस्था असेल तर जुन्या भागीदारांकडे नियंत्रक हितसबंधाएवढी भागीदारी नसावी. नवीन उद्योजकाने पूर्वीच्या स्थिर मालमत्तेएवढी किमान गुंतवणूक करणे आवश्यक राहणार आहे. ही गुंतवणूक अभय योजना लागू झाल्यापासून तीन वर्षात करणे आवश्यक आहे. सदर योजना राबविण्याचे व मंजुरीचे अधिकार संबंधित विभागप्रमुख किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित उद्योगांनी सबंधित विभागप्रमुख किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडे विहित कालावधीत अर्ज करणे आवश्यक आहे. या योजनेची अंमलबजावणी राज्यात सुरू झाली आहे.