शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

औरंगजेबाला आपण गाडलं नाही, त्याने स्वत:हून गाडून घेतलंय; शिंदेसेनेचे मंत्री काय बोलले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 17:41 IST

संभाजी महाराजांना ज्यारितीने हाल हाल करून मारलं तो प्रसंग आमच्या डोळ्यासमोर नसावा या दृष्टीकोनातून आम्हाला तिथे औरंगजेबाची कबर नको असं मंत्री शिरसाट यांनी म्हटलं.

छत्रपती संभाजीनगर - औरंगजेबाच्या बाबतीत अनेकजण आपले तर्क वितर्क लावतात. आमची भूमिका अत्यंत वेगळी आहे. औरंगजेबाला मारलं गेले नाही, त्याचा मृत्यू नगरला झाला. औरंगजेबाने त्या काळात घेतलेली जागा, तिथे त्याची कबर असावी असं त्याचे स्वप्न होते. त्यामुळे नगरला मेल्यानंतर त्याला पुरायला छत्रपती संभाजीनगरला आणलं म्हणून औरंगजेबाला पुरलं, त्याला गाडलं असं काही नाही. हा चुकीचा इतिहास राज ठाकरेंना कुणीतरी सांगितला आहे असं सांगत शिंदेसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी राज यांच्या भूमिकेला विरोध केला.

औरंगजेबाच्या कबरीवरील सजावट काढून टाका, त्याच्या कबरीजवळ मराठ्यांना संपवायला आलेल्याला आम्ही इथं गाडलं असा बोर्ड लिहा असं राज ठाकरेंनी गुढी पाडवा मेळाव्यात म्हटलं. त्यावर संजय शिरसाट म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ वेगळा होता. त्यानंतर संभाजी महाराजांचा काळ आला. संभाजी महाराजांना ज्यारितीने हाल हाल करून मारलं तो प्रसंग आमच्या डोळ्यासमोर नसावा या दृष्टीकोनातून आम्हाला तिथे औरंगजेबाची कबर नको अशी आमची भूमिका आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच औरंगजेबाला आम्ही गाडलंय का, तर नाही..त्याने स्वत:ला तिथे गाडून घेतले आहे. त्यामुळे आम्हाला हा इतिहास पुसायचा आहे हे कबर हटवण्यामागे आमचे धोरण होते. त्यात राजकारणाचा भाग येत नाही असंही मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं. तर औरंगजेबाची कबर ASI प्रोटेक्टेड आहे. त्याला कायद्याने संरक्षण मिळालं आहे. परंतु आम्ही औरंगजेबाचं उदात्तीकरण होऊ देणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

शिंदेसेनेत २ मतप्रवाह...

दरम्यान, औरंगजेबाची कबर जिथं आहे तिथे राहू द्या परंतु त्याचे उदात्तीकरण व्हायला नको. त्याला धार्मिक स्थळाचा दर्जा नको. त्याठिकाणी मोठमोठी बांधकाम नको. राज ठाकरे बोलले त्या प्रमाणे तिथे बोर्ड लावला पाहिजे. जो स्वराज्य संपवायला आला त्याला याच मातीत गाडले परंतु तो स्वराज्याला हात लावू शकला नाही हे लिहिलं पाहिजे. औरंगजेबाचा अंत महाराष्ट्रात कसा झाला हे पुढच्या पिढीला समजायला हवे त्यामुळे राज ठाकरे बोलले ते योग्य आहे असं मंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेSanjay Shirsatसंजय शिरसाटShambhuraj Desaiशंभूराज देसाई