शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
3
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
4
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
5
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
6
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
7
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
8
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
9
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
10
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
11
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
12
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
13
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
14
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
15
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
16
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
17
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
18
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
19
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
20
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड

औरंगजेबाला आपण गाडलं नाही, त्याने स्वत:हून गाडून घेतलंय; शिंदेसेनेचे मंत्री काय बोलले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 17:41 IST

संभाजी महाराजांना ज्यारितीने हाल हाल करून मारलं तो प्रसंग आमच्या डोळ्यासमोर नसावा या दृष्टीकोनातून आम्हाला तिथे औरंगजेबाची कबर नको असं मंत्री शिरसाट यांनी म्हटलं.

छत्रपती संभाजीनगर - औरंगजेबाच्या बाबतीत अनेकजण आपले तर्क वितर्क लावतात. आमची भूमिका अत्यंत वेगळी आहे. औरंगजेबाला मारलं गेले नाही, त्याचा मृत्यू नगरला झाला. औरंगजेबाने त्या काळात घेतलेली जागा, तिथे त्याची कबर असावी असं त्याचे स्वप्न होते. त्यामुळे नगरला मेल्यानंतर त्याला पुरायला छत्रपती संभाजीनगरला आणलं म्हणून औरंगजेबाला पुरलं, त्याला गाडलं असं काही नाही. हा चुकीचा इतिहास राज ठाकरेंना कुणीतरी सांगितला आहे असं सांगत शिंदेसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी राज यांच्या भूमिकेला विरोध केला.

औरंगजेबाच्या कबरीवरील सजावट काढून टाका, त्याच्या कबरीजवळ मराठ्यांना संपवायला आलेल्याला आम्ही इथं गाडलं असा बोर्ड लिहा असं राज ठाकरेंनी गुढी पाडवा मेळाव्यात म्हटलं. त्यावर संजय शिरसाट म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ वेगळा होता. त्यानंतर संभाजी महाराजांचा काळ आला. संभाजी महाराजांना ज्यारितीने हाल हाल करून मारलं तो प्रसंग आमच्या डोळ्यासमोर नसावा या दृष्टीकोनातून आम्हाला तिथे औरंगजेबाची कबर नको अशी आमची भूमिका आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच औरंगजेबाला आम्ही गाडलंय का, तर नाही..त्याने स्वत:ला तिथे गाडून घेतले आहे. त्यामुळे आम्हाला हा इतिहास पुसायचा आहे हे कबर हटवण्यामागे आमचे धोरण होते. त्यात राजकारणाचा भाग येत नाही असंही मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं. तर औरंगजेबाची कबर ASI प्रोटेक्टेड आहे. त्याला कायद्याने संरक्षण मिळालं आहे. परंतु आम्ही औरंगजेबाचं उदात्तीकरण होऊ देणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

शिंदेसेनेत २ मतप्रवाह...

दरम्यान, औरंगजेबाची कबर जिथं आहे तिथे राहू द्या परंतु त्याचे उदात्तीकरण व्हायला नको. त्याला धार्मिक स्थळाचा दर्जा नको. त्याठिकाणी मोठमोठी बांधकाम नको. राज ठाकरे बोलले त्या प्रमाणे तिथे बोर्ड लावला पाहिजे. जो स्वराज्य संपवायला आला त्याला याच मातीत गाडले परंतु तो स्वराज्याला हात लावू शकला नाही हे लिहिलं पाहिजे. औरंगजेबाचा अंत महाराष्ट्रात कसा झाला हे पुढच्या पिढीला समजायला हवे त्यामुळे राज ठाकरे बोलले ते योग्य आहे असं मंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेSanjay Shirsatसंजय शिरसाटShambhuraj Desaiशंभूराज देसाई