शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्याच्या तासाभरानंतर होणार होती युतीची बैठक, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 17:39 IST

दोन्ही पक्षात बंद झालेल्या चर्चेला भाजप जवाबदार आहेत.

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दिवाळीच्या दिवशी भाजप-शिवसेनेत सत्तास्थापनेबाबत एक बैठक ठरली होती. परंतु त्या बैठकीच्या एका तासापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मुख्यमंत्री'पदाचा कोणताही फॉर्म्युला निवडणुकीच्या आधी ठरला नसल्याचे केलेल्या वक्तव्यामुळे ही बैठक रद्द झाली. असा खुलासा संजय राऊत यांनी केला आहे. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीवेळी ते बोलत होते.

विधानसभा निवडणुकीत युतीला बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा दोन्ही पक्षातील सुरु असलेला सत्तासंघर्ष काही थांबायला तयार नाही. दोन्ही पक्षातील नेते एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे शिवसेना सत्तेत 50-50चा आग्रह धरत अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचीही मागणीवर अडली आहे. मात्र ह्या सर्व वादात दोन्ही पक्षाकडून चर्चेसाठी प्रयत्न केला जात आहे का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापनेबाबत या दोन्ही पक्षातील नेत्यांची बैठक होणार होती. ज्यात भाजपकडून महाराष्ट्राचे प्रमुख भूपेंद्र यादव व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील किंवा पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर तर शिवसेनेकडून खासदार संजय राऊत आणि सुभाष देसाई असणार होते. मात्र बैठकीच्या एका तास आधीच मुख्यमंत्री यांनी 'मुख्यमंत्री'पदाचा कोणताही फॉर्म्युला निवडणुकीच्या आधी ठरला नसल्याचे सांगितल्याने ही बैठक रद्द झाली. त्यामुळे पुढे कोणतेही चर्चा होऊ शकली नसल्याचे राऊत म्हणाले.

दोन्ही पक्षात बंद झालेल्या चर्चेला भाजप जवाबदार आहेत. तसेच भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी हा प्रश्न राज्याच्या नेत्यांवर सोपवला आहे. मात्र राज्याचे नेते हा प्रश्न सोडवण्यासाठी अपयशी ठरले असून त्याला आम्ही जवाबदार नसल्याचे राऊत म्हणाले. चर्चेचे अधिकार भाजपमध्ये कुणाकडे आहे हेच कळत नाही. कारण सर्वच अदृश्य असून पडद्यामागे कोणती पटकथा लिहली जात आहे हे मला माहित नाही. परंतु शिवसेनेची पटकथा तयार असल्याचे सुद्धा राऊत म्हणाले.