शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

संजय अखेर कारागृहात!

By admin | Updated: January 11, 2015 02:29 IST

मुदत संपल्यानंतरही तब्बल दोन दिवस घरी राहून अखेर संजय शनिवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी येरवडा कारागृहात परतला.

कोर्टाने फटकारूनही निर्णयाला विलंबमुंबई : फर्लो व पॅरोल रजा मंजूर करताना राज्य शासनाचे सेलीब्रिटी व सामान्य कैद्यांसाठी वेगळे नियम असल्याचे खडेबोल उच्च न्यायालयाने वेळोवेळी सुनावले आहेत. असे असूनही सेलीब्रिटी असलेल्या संजय दत्तच्या बाबतीत मुंबई पोलिसांनी घोळ घातलाच. मुदत संपल्यानंतरही तब्बल दोन दिवस घरी राहून अखेर संजय शनिवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी येरवडा कारागृहात परतला.गेल्या महिन्यात संजयला १४ दिवसांची फर्लो रजा मिळाली. रजेची मुदत ८ जानेवारीपर्यंत होती. ही मुदत संपण्याआधी संजयने हृदयविकाराची तपासणी व उपचारांची सबब पुढे करीत रजा वाढवून मिळावी, अशी विनंती कारागृहाकडे केली. फर्लो रजेबाबत निर्णय घेण्याचे अधिकार असलेल्या कारागृह उप महानिरीक्षक राजेंद्र धामणे यांनी वांद्रे पोलिसांकडून संजयच्या विनंती अर्जावरील शहानिशा अहवाल मागवला. मात्र वांद्रे पोलिसांनी हा अहवाल पाठविण्यास विलंब केला. वांद्रे पोलिसांनी शुक्रवारी रात्री ई-मेलने आपला अहवाल कारागृहाला पाठवला. वांद्रे पोलिसांनी संजयला वैद्यकीय चाचण्या व उपचार करायचे असल्याचे नमूद केले. मात्र ही रजा वाढवून द्यावी, अशी शिफारस केली नाही. त्यामुळे आम्ही संजूबाबाचा रजा वाढवण्याचा अर्ज मान्य केला नसल्याचे उप महानिरीक्षक धामणे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.संजयचा विनंती अर्ज अमान्य केल्याचे आम्ही वांद्रे पोलिसांना कळवले. त्यांच्याच माध्यमातून ही बाब संजयलाही कळविली गेली. त्यानुसार शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास संजय कारागृहात परतला, असेही धामणे यांनी स्पष्ट केले. संजय हा मुंबईला खोलवर जखमा देणाऱ्या १९९३च्या बॉम्बस्फोट प्रकरणात शिक्षा झालेला आरोपी आहे. शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांच्या रजा मंजूर करताना संबंधित पोलीस ठाण्याकडून वेळेत अर्ज मागवावा व ठरावीक वेळेतच या रजा मंजूरही कराव्यात, असे वेळोवेळी उच्च न्यायालयाने राज्य शासनाला सांगितले आहे. अंडरवर्ल्ड डॉन अश्विन नाईकवर गोळ्या झाडणारा आरोपी रवींद्र शांताराम सावंत याची पॅरोल रजा मंजूर न झाल्याने त्याने नागपूर खंडपीठाकडे यासाठी अर्ज केला होता. त्यावेळी न्यायालयाने शासनाचे नियम हे सेलीब्रिटींसाठी व सामान्य कैद्यांसाठी वेगळे असल्याचे खडेबोल सुनावले होते. असे असताना संजयच्या अर्जावर वेळेत निर्णय होणे अपेक्षित होते. मात्र त्यात दोन दिवसांची दिरंगाई केली गेली. ही दिरंगाई हेतुपुरस्सर झाल्याची चर्चा आहे. तसेच या प्रकरणी मुंबई पोलीस दलातल्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी, अशीही मागणी पुढे येत आहे. (प्रतिनिधी)माध्यमांवर फोडले खापर कारागृहात परतावे लागल्याचे खापर दत्त कुटुंबीयांनी प्रसार माध्यमांवर फोडले. संजय व त्याची पत्नी मान्यता या दोघांनीही फर्लो प्रकरणाला प्रसार माध्यमांनी हवा दिल्याचा आरोप केला.