शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

संजय बारू यांचा पंतप्रधानांवर आरोप

By admin | Updated: May 9, 2014 01:40 IST

पंतप्रधान स्वत: कधीही श्रेय घेत नसत हा वेगळा भाग. पण ते त्यांना दिलेही जात नसे, असा आरोप पंतप्रधानांचे माजी माध्यम सल्लागार संजय बारु यांनी पुन्हा एकदा केला आहे.

मुंबई : पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना कोणतेही निर्णय घेऊ दिले गेले नाहीत. प्रत्येक वेळी त्यांना श्रेष्ठींपुढे नमते घ्यावे लागत होते. त्यांनी चांगले निर्णय घेतले तरी त्याचे श्रेय काँग्रेस पक्ष व नेते घेत. पंतप्रधान स्वत: कधीही श्रेय घेत नसत हा वेगळा भाग. पण ते त्यांना दिलेही जात नसे, असा आरोप पंतप्रधानांचे माजी माध्यम सल्लागार संजय बारु यांनी पुन्हा एकदा केला आहे. मुंबईतील क्रॉसवड बूकस्टोरमध्ये त्यांच्या 'द अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' या पुस्तकाचे प्रकाशन बारू यांच्याच हस्ते बुधवारी करण्यात आले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बारु यांनी अनिवासी भारतीय उद्योगपती लक्ष्मीपती मित्तल यांचे उदाहरण दिले. २००७ साली मित्तल हे आर्सेलर ही फ्रेंच कंपनी घेऊ इच्छित होते. त्यावेळी मनमोहनसिंग यांनी एक पाऊल पुढे टाकत फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा केली होती. २००८ साली झालेल्या भारत-अमेरिका अणुकराराच्या दरम्यान काँग्रेस वेळकाढूपणा करीत होते. त्यामुळे या कराराला उशीर होत होता व पंतप्रधानांची यावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर नामुष्की होण्याची वेळी आली होती. मात्र, सिंग यांनी सोनियांना अणुकरार मार्गी लावणार नसाल तर पंतप्रधानपदी नवीन व्यक्तीचा शोध घ्या, असे स्पष्ट शब्दांत बजावले होते. त्यावेळी मनमोहन सिंग यांनी केलेल्या धाडसामुळे अमेरिकेसोबत अणुकरार झाला होता. मात्र त्याचे पुरेसे श्रेय त्यांना दिले गेले नाही, असेही बारू यांनी सांगितले. भारताला दमदार नेतृत्त्वाची गरज असल्याचे सांगून बारू पुढे म्हणाले की, एखाद्या सरकारमध्ये इतरांचा हस्तक्षेप होत असेल तर ते सरकार मृत असल्यासारखेच असते. ज्योती बसू मुख्यमंत्री होते, त्या काळात ते पक्षाचे नेते प्रणव दासगुप्ता यांना रिपोर्ट करायचे. तसेच मनोहर जोशी जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांना बाळासाहेब ठाकरेंना रिपोर्ट करावे लागत असे. देशाला खंबीर सरकार व नेत्याची गरज असते, असे सांगून सरकारमधील इतर घटकांचा हस्तक्षेप चुकीचाच असल्याचे बारु पुढे म्हणाले. मंत्रिमंडळाने गुन्हेगार नेत्यांबाबत काढलेला अध्यादेश फाडून टाकण्यायोग्य असल्याचे मत राहुल गांधी यांनी व्यक्त केल्यानंतर पंतप्रधानांनी लगेच राजीनामा द्यावा, असे मत मी जाहीरपणे व्यक्त केले होते. पंतप्रधान कन्येने आपल्याला एसएमएस पाठवून याच्याशी सहमती दर्श विली होती, असेही बारू यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

मुख्यमंत्र्यांनी केली गद्दारी!

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधानांशी २००९ मध्ये गद्दारी केली होती, असा आरोपही यावेळी बारू यांनी केला. ज्या पृथ्वीराज चव्हाण यांना पंतप्रधानांमुळे पंतप्रधान कार्यालयाचे मंत्रिपद मिळाले होते, त्यांनी याचे श्रेय पंतप्रधानांऐवजी राहुल गांधींना दिले होते. २००९च्या लोकसभा निवडणुकीच्या यशाचे श्रेयही पंतप्रधानांना देण्यात आले नाही.