शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

सांगलीला पुन्हा अवकाळीचा तडाखा

By admin | Updated: March 9, 2015 23:48 IST

शेगावला गारपीट : मिरज, तासगावात रिमझिम; द्राक्षबागायतदार धास्तावले; रब्बी हंगामही हाताबाहेर

लिंगनूर/सोनी/मणेराजुरी/शेगाव : गेल्या आठवड्यात पडलेल्या अवकाळी पावसाने शेतकरी, बागायतदारांचे कंबरडे मोडले असताना रविवारी पुन्हा मिरज पूर्व, तासगाव, कवठेमहांकाळ, जत तालुक्यात रिमझिम पावसाने हजेरी लावली. शेगाव परिसरात तर गारपीटही झाली. गेल्या आठवड्यातील पावसाने नुकसान व्हायचे ते झालेच, पण त्यातूनही अक्षरश: जिवाचे रान करून वाचविलेल्या फळबागा, तसेच रब्बी पिकांची सोमवारी रिमझिम पावसाने वाताहात केली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात शिरढोण परिसरातही पाऊस पडला. तासगाव तालुक्यात सावर्डे, खुजगाव परिसरातही गारांचा पाऊस पडला.लिंगनूर/ सलगरे : मिरज पूर्व भागातील सीमावर्ती गावे चाबुकस्वारवाडी, शिरूर, पांडेगाव, अळट्टी, खटावचा सीमाभाग या परिसरात सायंकाळी सहापासून पावसास सुरुवात झाली. काही ठिकाणी गडगडाटासह मुसळधार पाऊस पडल्याने पुन्हा शेतीपिके, रॅकवरील बेदाण्याचे नुकसान, कलिंगड, ज्वारी, गहू, कडबा, राशी केलेली धान्ये यांचे नुकसान संभवत आहे. त्यामुळे अवकाळी पाऊस आठवडाभरातच दुसऱ्यांदा झटका देऊ लागल्याने केवळ द्राक्षे व बेदाणा उत्पादकच नव्हे, तर सामान्य शेतकऱ्यालाही त्याचा मोठा फटका बसू लागला आहे.मिरज पूर्व भागातील सीमावर्ती चाबुकस्वारवाडी, खटाव, शिरूर या परिसरात काल रात्रीही अत्यंत ढगाळ वातावरण झाले होते. काही ठिकाणी काल पावसाचा हलका शिडकावा झाला . यामुळे सीमाभागातील द्राक्षे, रॅकवरील बेदाणा, गहू, शाळू, कलिंगड या पिकांना फटका बसणार आहे. सोनी : ढगाळ पावसामुळे द्राक्ष बागायतदारांसह शेतकऱ्यांच्या मनात धडकी भरली आहे. अजून ३० ते ३५ टक्के द्राक्षे शिल्लक असल्याने द्राक्ष बागायतदारांचे मोठे नुकसान झाले. शेगाव : जत तालुक्यातील शेगावमध्ये गारांचा पाऊस झाल्यानंतर आवंढी, बनाळी, लोहगाव, वायफळ, अंतराळ या भागातही हलक्या पावसाच्या सरी पडल्या. या भागात सध्या शेतीची कामे सुरू आहेत. मजुरांचा व यंत्रांचाही तुटवडा असल्याने ज्वारी, गहू, हरभरा शेतातच पडून आहे. या पावसामुळे या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मणेराजुरी : मणेराजुरीसह परिसरास अवकाळी पावसाचा दुसऱ्यांदा तडाखा बसला आहे. द्राक्षबागांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिसरातील रब्बी पिकांचेही नुकसान झाले आहे. तासगाव पूर्व भागात आज सायंकाळी ६.३0 च्या सुमारास रिमझिम पावसाने सुरुवात केली. त्यामुळे शेतकरीवर्गाची धांदल उडाली. आठवड्यापूर्वी पावसाच्या तडाख्यानंतर लवकरात लवकर द्राक्षे काढण्यासाठी शेतकऱ्यांची धावाधाव सुरू होती. गारांचा पाऊस अन् धावपळउत्तर भागातील शेगाव येथे सायंकाळी साडेपाच वाजता गारपीट झाली. पंधरा मिनिटे गारा पडल्याने शेगाव परिसरातील ज्वारी, हरभरा, गहू, द्राक्ष, डाळिंब या पिकांचे नुकसान झाले आहे. शेगाव व उत्तर भागातील नाईक वस्तीपर्यंत गारांचा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांची धावपळ उडाली.