शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
2
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
3
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
4
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
5
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
6
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
7
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
8
३०० बंधारे आणि छोटी धरणे काढली, चीनची ‘यांगत्सी’ जिवंत झाली, आपण ‘मुळा-मुठेला’ कोंडून मारणार?
9
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
10
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
11
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
12
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
13
संपादकीय : ओसाड गावची तोंडपाटीलकी! असंवेदनशील कृषिमंत्र्यांच्या वादांची मालिका
14
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
15
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
16
पंचाहत्तराव्या वर्षी निवृत्ती.. संघाचे ‘ठरले’? पण सरकारसाठी नियम वेगळे!
17
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
18
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
19
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
20
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'

संघ देश चालवत नाही - राजनाथ सिंह

By admin | Updated: September 6, 2015 00:44 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देश चालवतो, हा आरोप बिनबुडाचा असून त्यात अजिबात तथ्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी स्वत: संघाचे स्वयंसेवक आहोत. कोणत्याही बैठकीत किंवा

मुंबई/पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देश चालवतो, हा आरोप बिनबुडाचा असून त्यात अजिबात तथ्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी स्वत: संघाचे स्वयंसेवक आहोत. कोणत्याही बैठकीत किंवा सार्वजनिक कार्यक्रमात आमच्याकडून गोपनीयतेच्या शपथेचा भंग होत नाही, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली.भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्ली येथील समन्वय बैठकीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सुमारे १२ केंद्रीय मंत्र्यांनी हजेरी लावली. त्यावरून विरोधी पक्षांनी संघच देश चालवत असल्याची टीका केली. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना राजनाथ सिंह म्हणाले, मी स्वत: संघाच्या बैठकीस उपस्थित होतो. मंत्र्यांना दिल्या जाणाऱ्या गोपनीयतेच्या शपथेचा या बैठकीत भंग झालेला नाही. तसेच कोणत्याही खासगी कार्यक्रमात या शपथेचा भंग होणार नाही याची आम्ही काळजी घेतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्था कोसळत असूनही आपली अर्थव्यवस्था मजबूत आहे, असा दावा करून राजनाथ सिंह म्हणाले, चीनची स्थिती काय झाली आहे ते आता जगाला समजले आहे, त्यामुळे त्यांची भीती बाळगण्याचे कारण नाही, असे त्यांनी नमूद केले.गुजरातमध्ये आंदोलन करण्यासाठी हार्दिक पटेल यांना संघाचाच पाठिंबा असल्याचा आरोप केला जातो, या प्रश्नाला उत्तर देणे राजनाथ यांनी टाळले तसेच दाऊदला पकडण्याबाबत वाट पाहावी, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी) पाकच्या छुप्या कारवायांना तोंड देण्यास सैन्य सज्जपहिली गोळी आपल्याकडून जाणार नाही, मात्र समोरून गोळी आली तर नंतर आपल्या गोळ्या मोजायच्या नाहीत, असे स्पष्ट आदेश सीमेवरच्या सैनिकांना दिले आहेत. त्यामुळे पाक कितीही छुप्या कारवाया करीत असला तरीही त्याला तोंड देण्यास आपले सैन्य सज्ज आहे, असा राजनाथ सिंह म्हणाले. मानव संसाधनामध्ये भारत दुसऱ्या कंमाकावर असतानाही विकसित देशांमध्ये भारताचा समावेश नाही. मात्र केंद्र शासनाकडून देशाच्या अर्थिक विकासासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे लवकरच भारतही विकसित देशाच्या पंगतीत बसेल. मुंबई हल्ल्यात जिवंत पकडलेल्या कसाब आमच्या देशातील नसल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला होता. मात्र नुकतच जम्मूमध्ये दोन जिवंत दहशतवादी पकडून आम्ही पाकिस्तानचा चेहरा जगासमोर आणला आहे. अमेरिकेने याबाबत पाकिस्तानला दहशतवादी कारवाया रोखण्याची ताकीद दिली आहे. मात्र आखाती देशांनी अद्यापही पाकिस्तानला अशा प्रकारे ताकिद दिलेली नाही. भारताकडे अमाप नैसर्गिक संपत्ती आहे. पण विकसित देशांमध्ये समावेश नाही. ज्या लोकांनी गेल्या अनेक वर्षांपासून हुकुमत चालवली तेच याला जवाबदार आहेत.