शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
4
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
5
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
6
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
7
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
8
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
9
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
10
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
11
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
12
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
13
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
14
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
15
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
16
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
17
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
18
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
19
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
20
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका

संघ देश चालवत नाही - राजनाथ सिंह

By admin | Updated: September 6, 2015 00:44 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देश चालवतो, हा आरोप बिनबुडाचा असून त्यात अजिबात तथ्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी स्वत: संघाचे स्वयंसेवक आहोत. कोणत्याही बैठकीत किंवा

मुंबई/पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देश चालवतो, हा आरोप बिनबुडाचा असून त्यात अजिबात तथ्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी स्वत: संघाचे स्वयंसेवक आहोत. कोणत्याही बैठकीत किंवा सार्वजनिक कार्यक्रमात आमच्याकडून गोपनीयतेच्या शपथेचा भंग होत नाही, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली.भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्ली येथील समन्वय बैठकीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सुमारे १२ केंद्रीय मंत्र्यांनी हजेरी लावली. त्यावरून विरोधी पक्षांनी संघच देश चालवत असल्याची टीका केली. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना राजनाथ सिंह म्हणाले, मी स्वत: संघाच्या बैठकीस उपस्थित होतो. मंत्र्यांना दिल्या जाणाऱ्या गोपनीयतेच्या शपथेचा या बैठकीत भंग झालेला नाही. तसेच कोणत्याही खासगी कार्यक्रमात या शपथेचा भंग होणार नाही याची आम्ही काळजी घेतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्था कोसळत असूनही आपली अर्थव्यवस्था मजबूत आहे, असा दावा करून राजनाथ सिंह म्हणाले, चीनची स्थिती काय झाली आहे ते आता जगाला समजले आहे, त्यामुळे त्यांची भीती बाळगण्याचे कारण नाही, असे त्यांनी नमूद केले.गुजरातमध्ये आंदोलन करण्यासाठी हार्दिक पटेल यांना संघाचाच पाठिंबा असल्याचा आरोप केला जातो, या प्रश्नाला उत्तर देणे राजनाथ यांनी टाळले तसेच दाऊदला पकडण्याबाबत वाट पाहावी, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी) पाकच्या छुप्या कारवायांना तोंड देण्यास सैन्य सज्जपहिली गोळी आपल्याकडून जाणार नाही, मात्र समोरून गोळी आली तर नंतर आपल्या गोळ्या मोजायच्या नाहीत, असे स्पष्ट आदेश सीमेवरच्या सैनिकांना दिले आहेत. त्यामुळे पाक कितीही छुप्या कारवाया करीत असला तरीही त्याला तोंड देण्यास आपले सैन्य सज्ज आहे, असा राजनाथ सिंह म्हणाले. मानव संसाधनामध्ये भारत दुसऱ्या कंमाकावर असतानाही विकसित देशांमध्ये भारताचा समावेश नाही. मात्र केंद्र शासनाकडून देशाच्या अर्थिक विकासासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे लवकरच भारतही विकसित देशाच्या पंगतीत बसेल. मुंबई हल्ल्यात जिवंत पकडलेल्या कसाब आमच्या देशातील नसल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला होता. मात्र नुकतच जम्मूमध्ये दोन जिवंत दहशतवादी पकडून आम्ही पाकिस्तानचा चेहरा जगासमोर आणला आहे. अमेरिकेने याबाबत पाकिस्तानला दहशतवादी कारवाया रोखण्याची ताकीद दिली आहे. मात्र आखाती देशांनी अद्यापही पाकिस्तानला अशा प्रकारे ताकिद दिलेली नाही. भारताकडे अमाप नैसर्गिक संपत्ती आहे. पण विकसित देशांमध्ये समावेश नाही. ज्या लोकांनी गेल्या अनेक वर्षांपासून हुकुमत चालवली तेच याला जवाबदार आहेत.