शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

संगनमताने सव्वा लाखाचा अपहार

By admin | Updated: June 10, 2016 01:13 IST

माजी सरपंच व ग्रामसेवक यांनी सरपंचपदावरून गेल्यानंतर देखील संगनमताने सव्वा लाखाचा अपहार करून फसविले आहे

यवत : डाळिंब ग्रामपंचायतीच्या बँकेतील खात्यातून माजी सरपंच व ग्रामसेवक यांनी सरपंचपदावरून गेल्यानंतर देखील संगनमताने सव्वा लाखाचा अपहार करून फसविले आहे, अशी तक्रार विद्यमान सरपंच मंगल चंद्रकांत सुतार यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे. याबाबत माजी सरपंच व तत्कालीन ग्रामसेवक यांची कसून चौकशी करून फसवणुकीचा व अफरातफर केल्याचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी मंगल सुतार यांनी केली आहे.मंगल सुतार या डाळिंब ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर १६ डिसेंबर २०१२ रोजी त्यांनी सरपंचपदाचा पदभार स्वीकारला. यानंतर ग्रामपंचायतीची मासिक सभा ७ जानेवारी २०१३ रोजी झाली. या सभेने सुतार यांना ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांची बँकेतील खाती त्यांचे व ग्रामसेवक यांच्या सहीने चालविण्याचा अधिकार दिला. या ठरावाची प्रत तत्कालीन ग्रामसेवक एन. बी. लोंढे यांनी संबंधित बँकेला विहित मुदतीत न दिल्यामुळे यवत येथील अ‍ॅक्सिस बँकेच्या ग्रामपंचायतीच्या खात्यामधून १५ एप्रिल २०१३ रोजी राहुलदादा कुल स्वयंरोजगार संस्थेच्या नावाने १ लाख २० हजार ८२९ रुपयांचा धनादेश व याच दिवशी राजेंद्र रामचंद्र म्हस्के यांच्या नावे ३ हजार ९४२ रुपयांचा धनादेश तत्कालीन सरपंच धनंजय म्हस्के व ग्रामसेवक एन. बी. लोंढे यांच्या सहीने वटविण्यात आला. या बाबीमुळे अधिकार नसतानादेखील ग्रामपंचायतीचे आर्थिक व्यवहार संबंधित तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांनी सुरू ठेवल्याचे व अफरातफर केल्याचे निदर्शन येत आहे. तक्रारी अर्जात सुतार यांनी सविस्तर माहिती दिली असून, अधिकार गेल्यानंतरदेखील वटविलेल्या धनादेशाची प्रतदेखील जोडल्या आहेत. नवीन सरपंचांना सह्यांचे अधिकार देण्याच्या ठरावाला स्वत: तत्कालीन सरपंच धनंजय म्हस्के हेच सूचक आहेत. या ठरावाची प्रत त्या वेळचे ग्रामसेवक एन. बी. लोंढे यांनी तत्काळ ग्रामपंचायतीची खाती असलेल्या बँकांमध्ये देणे गरजेचे असताना जाणीवपूर्वक त्यांनी टाळाटाळ केली. यामुळे संबंधित माजी सरपंच व तत्कालीन ग्रामसेवक यांनी संगनमताने हा प्रकार केला आहे. मागास समाजातील आहात, गावात नीट राहामहिला सरपंच असल्याने पाच वर्षे गावातील कामकाज चालविण्याची संधी मिळाली आहे. कमी शिक्षण असल्याने त्याचा आपण फायदा घेऊ आणि वाटेल ती चुकीची कामे करण्यास आपण भाग पाडू, अशी आशा गावातील काही चुकीच्या वृत्तीच्या राजकीय पुढाऱ्यांना होती. त्यांच्याकडून कायम ग्रामपंचायतीमध्ये कामकाजात अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र चुकीची कामे करणार नाही असा ठाम निर्णय घेतल्याने त्यांची चांगलीच गोची झाली आणि त्यांनी कामकाजात अडचणी आणण्यास सुरुवात केली. आमचे ऐकले नाही तर इतर मागास समाजातील आहात, गावात नीट राहा, अशी धमकीवजा सूचना देण्यात आल्या. सरपंचपदावरून हटविण्याचा प्रयत्नदेखील त्यांनी केला. यामुळे ग्रामपंचायतीचे सर्व व्यवहार नीट तपासले असता त्यांची चुकीची कामे झाकण्यासाठी असा प्रकार सुरू असल्याचे लक्षात आले. मात्र त्यांचे पितळ आता उघडे पडणार असून, लवकरच शासनदरबारी आपल्याला न्याय मिळेल, अशी प्रतिक्रिया मंगल सुतार यांनी दिली.दोन दिवसांत सविस्तर खुलासा देऊ...माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्यपद गेल्यानंतरदेखील ग्रामपंचायतीचे आर्थिक व्यवहार सुरू ठेवणे व धनादेश वटविले असल्याप्रकारणी माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य धनंजय म्हस्के यांनी याबाबत दोन दिवसांत सविस्तर खुलासा देऊ, असा खुलासा ‘लोकमत’कडे दिला. तर याबाबत गटविकास अधिकारी संतोष हराळे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही़