शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात वाळूचे लिलाव सप्टेंबरमध्ये

By admin | Updated: March 18, 2016 02:10 IST

राज्यात रेती घाटांचे लिलाव विशिष्ट काळात होतात. त्यामुळे उर्वरित काळात वाळू उपलब्ध होत नाही. यातून काळा बाजार वाढतो. यावर उपाय म्हणून राज्य सरकार लवकरच वाळू

मुंबई : राज्यात रेती घाटांचे लिलाव विशिष्ट काळात होतात. त्यामुळे उर्वरित काळात वाळू उपलब्ध होत नाही. यातून काळा बाजार वाढतो. यावर उपाय म्हणून राज्य सरकार लवकरच वाळू धोरण तयार करीत आहे. यापुढे राज्यात सर्वत्र सप्टेंबर महिन्यात रेती घाटांच्या लिलावाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी घोषणा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी गुरुवारी विधानसभेत केली. प्रश्नोत्तराच्या तासात पालघर जिल्ह्यातील वैतरणा सूर्या नदी व खाडीच्या पात्रात अवैध वाळूउपसा होत असल्याबाबतचा प्रश्न पास्कल धनोरे यांनी उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना खडसे म्हणाले, घाटांच्या लिलावात विलंब होतो. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी जून ते फेब्रुवारीच्या काळात रेती उपलब्ध होत नाही. नव्या धोरणानुसार जूनमध्ये वाळू घाट निश्चित केले जातील. जुलै ते आॅगस्ट या काळात लिलावासाठी लागणाऱ्या हरित लवाद, पर्यावरण, प्रदूषण आदी परवानग्या घेतल्या जातील. संंबंधित विभागालाही या मुदतीत एनओसीवर निर्णय घ्यावा लागेल. आॅगस्टमध्ये लिलावाची प्रक्रिया पूर्ण करून सप्टेंबरमध्ये लिलाव केले जातील. वाळूउपसा १ आॅक्टोबरपासून सुरू होईल. तसेच सध्या पाच पट सरसकट दंड आकारला जातो. यापुढे नियम भंगाचे स्वरूप पाहून सरसकट पाच पट दंड न करता पाचपटीपर्यंत दंड आकारण्याची तरतूद केली जाईल. शेतकऱ्यांना मदतीसाठी कायद्यात बदल करणारबोगस बियाणे, खतांचा पुरवठा झाल्यामुळे अपेक्षित उत्पन्न न होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होते. या नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, यासाठी केंद्र सरकारच्या कायद्यात बदल करण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती राज्यमंत्री राम शिंदे यांनी गुरुवारी विधानसभेत दिली. योगेश गोलप यांनी कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांना बनावट सेंद्रिय खतांची विक्री झाली असून, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे सांगत शेतकऱ्यांना भरपाई मिळणार का, असा प्रश्न उपस्थित केला. हरीश पिंगळे, वीरेंद्र जगताप यांनीही नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. यावर राज्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, चौकशीअंती मे. नवभारत फर्टीलायझर्स लि. हैदराबाद या कंपनीच्या नाशिक शहरातील तीन वितरकांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. कंपनीच्या विरोधात देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अशा नुकसानीसाठी मदत देण्याची तरतूद केंद्राच्या कायद्यात नाही, असे सांगून शेतकऱ्यांना ग्राहक पंचायतीकडे दाद मागता येईल, असेही सुचविले. शासकीय बांधकामांना वाळू जे घाट लिलावात विकले गेले नाहीत तेथील रेती शासकीय दराने रॉयल्टी आकारून शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, स्मारके यांना तसेच लोकहिताच्या बांधकामांसाठी दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.दगडापासून वाळू तयार करणाऱ्यांना रॉयल्टीत सूटनव्या धोरणात दगडापासून वाळू तयार करणाऱ्यांना प्रोत्साहन दिले जाईल. त्यांना रॉयल्टीमध्ये १०० टक्के सूट दिली जाईल. वीज दरात सवलत दिली जाईल, असेही खडसे यांनी स्पष्ट केले.