शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

समृद्धी महामार्ग न झाल्यास नुकसानच!

By admin | Updated: May 29, 2017 05:10 IST

विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचे चित्र बदलण्याची समृद्धी महामार्गात क्षमता आहे. तो न झाल्यास नुकसानच होणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचे चित्र बदलण्याची समृद्धी महामार्गात क्षमता आहे. तो न झाल्यास नुकसानच होणार आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा करूनच त्यांच्या जमिनी राज्य सरकार घेणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे स्पष्ट केले.समृद्धी महामार्गाच्या एकूण ७०० किलोमीटरपैकी ६७० कि.मी.ची मोजणी झालेली आहे. मात्र, काहींचा जमिनी देण्यास विरोध आहे. अर्थात विरोध असलेल्या शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांचे समाधान करूनच त्यांच्या जमिनी घेतल्या जातील, असे ते म्हणाले. नाशिकचा एकलहरे वीजप्रकल्प हलविण्याचे कारण नाही. प्रश्न वीजनिर्मितीचा नसून, विजेचे भाव कसे कमी करायचे व वितरण कसे करायचे, याबाबत विचार होणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. संपाबाबत शेतकऱ्यांशी चर्चा करू१ जूनपासून शेतकरी संपावर जाणार असल्याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी काही शेतकऱ्यांशी चर्चा केली आहे. काही शेतकऱ्यांशी चर्चा सुरू आहे. कृषिमंत्र्यांनी त्यांना चर्चेचे निमंत्रणही दिले आहे, परंतु शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांचे समाधान केले जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विरोध करणाऱ्यांना केली अटकभगूरमध्ये समृद्धीबाधित शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात निषेध करण्याचा प्रयत्न केला. तो पोलिसांनी उधळून लावला. शेतकऱ्यांना ताब्यात घेताना, पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.