शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’ने मिळविले 215 कोटी; महामार्गाचे अर्थकारण समजून घेणे अधिक समर्पक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2023 12:33 IST

गेल्या आठवड्यात झालेल्या अपघातामुळे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वैशिष्ट्यांपेक्षा अपघातांमुळे अधिक चर्चेत राहिलेल्या या महामार्गाचे अर्थकारण समजून घेणे अधिक समर्पक ठरेल.

विनय उपासनी, मुख्य उपसंपादक

देशातील सर्वाधिक लांबीचा द्रुतगती मार्ग म्हणून नावारूपाला आलेला महाराष्ट्र समृद्धी महामार्ग गेल्या सात-आठ वर्षांपासून सत्ताधारी-विरोधक अशा सर्व पक्षीयांचा जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. त्यामुळेच या मार्गावर जरा खुट्ट झाले तरी त्याची राष्ट्रीय स्तरावर बातमी होते. हा द्रुतगती महामार्ग मुंबई आणि नागपूर या  शहरांमधील प्रवासाचे अंतर कमी व्हावे, केवळ याच उद्देशाने बांधण्यात आलेला नाही. तर त्याच्या कवेत येणाऱ्या सर्व जिल्हे-तालुके-गावांमध्ये आर्थिक विकासाची गंगा खेळविण्याचा व्यापक उद्देश डोळ्यांसमोर ठेवून या प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे. या उद्देशाची पूर्तता होईल तेव्हा होवो पण सध्या तरी अपघातांच्या मालिकेमुळे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग अधिक चर्चिला जात आहे. 

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले. कोणत्याही पायाभूत प्रकल्पाचे नियोजन करतेवेळी त्यातील गुंतवणुकीची फेरवसुली कशी करता येईल, याचे काही ठोस आडाखे बांधलेले असतात. समृद्धी महामार्ग प्रकल्प या नियमास अपवाद नाही. त्यामुळे तूर्त तरी टोलच्या माध्यमातून प्रकल्पाच्या खर्चाची वसुली हे आर्थिक प्रारूप प्रकल्पाची कार्यान्वयन यंत्रणा असलेल्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) मांडण्यात आले आहे.

बांधकामाचा खर्च

दहा जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांना जोडत जाणारा महाराष्ट्र समृद्धी महामार्ग बांधण्यासाठी ५५ हजार कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे. एमएसआरडीसीने त्यासाठी विविध राष्ट्रीयीकृत बँकांकडून २८ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. विहित करारानुसार कर्जाची परतफेड २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून सुरू होणार असून, पुढील किमान २५ वर्षांपर्यंत ही परतफेड सुरू राहील. याशिवाय म्हाडा, एमएमआरडीए, सिडको, एसआरए, एमआयडीसी यांनी साडेपाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक या प्रकल्पात केली आहे.

उद्घाटनापासून जूनपर्यंत झालेली महिनानिहाय टोलवसुली (रुपयांत)

डिसेंबर, २०२२ : १३,१७,७२,३१२जानेवारी, २०२३ : २८,५३,२३,४८३फेब्रुवारी : ३०,४७,५१,९६७मार्च : ३४,२३,०३,२२०एप्रिल : ३३,२०,२८,९८४मे : ३६,५८,४०,७२१जून : ३९,५४,०१,१३६

खर्चाची वसुली कशी?

महामार्गावर बांधण्यात आलेल्या एंट्री व एक्झिट पॉइंटला टोलनाक्यांची उभारणी केली आहे. प्रतिकिमी १.७१ रुपयांप्रमाणे समृद्धी महामार्गावर टोल आकारणी केली जाते. नागपूर ते भरवीर या ६०० किमीच्या पहिल्या टप्प्यात सप्टेंबरअखेरपर्यंत ५० लाख वाहनांची वर्दळ झाली. या कालावधीतील अपघातांत १४० लोकांचा मृत्यू झाला.

 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग