शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

‘समृद्धी’ने मिळविले 215 कोटी; महामार्गाचे अर्थकारण समजून घेणे अधिक समर्पक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2023 12:33 IST

गेल्या आठवड्यात झालेल्या अपघातामुळे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वैशिष्ट्यांपेक्षा अपघातांमुळे अधिक चर्चेत राहिलेल्या या महामार्गाचे अर्थकारण समजून घेणे अधिक समर्पक ठरेल.

विनय उपासनी, मुख्य उपसंपादक

देशातील सर्वाधिक लांबीचा द्रुतगती मार्ग म्हणून नावारूपाला आलेला महाराष्ट्र समृद्धी महामार्ग गेल्या सात-आठ वर्षांपासून सत्ताधारी-विरोधक अशा सर्व पक्षीयांचा जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. त्यामुळेच या मार्गावर जरा खुट्ट झाले तरी त्याची राष्ट्रीय स्तरावर बातमी होते. हा द्रुतगती महामार्ग मुंबई आणि नागपूर या  शहरांमधील प्रवासाचे अंतर कमी व्हावे, केवळ याच उद्देशाने बांधण्यात आलेला नाही. तर त्याच्या कवेत येणाऱ्या सर्व जिल्हे-तालुके-गावांमध्ये आर्थिक विकासाची गंगा खेळविण्याचा व्यापक उद्देश डोळ्यांसमोर ठेवून या प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे. या उद्देशाची पूर्तता होईल तेव्हा होवो पण सध्या तरी अपघातांच्या मालिकेमुळे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग अधिक चर्चिला जात आहे. 

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले. कोणत्याही पायाभूत प्रकल्पाचे नियोजन करतेवेळी त्यातील गुंतवणुकीची फेरवसुली कशी करता येईल, याचे काही ठोस आडाखे बांधलेले असतात. समृद्धी महामार्ग प्रकल्प या नियमास अपवाद नाही. त्यामुळे तूर्त तरी टोलच्या माध्यमातून प्रकल्पाच्या खर्चाची वसुली हे आर्थिक प्रारूप प्रकल्पाची कार्यान्वयन यंत्रणा असलेल्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) मांडण्यात आले आहे.

बांधकामाचा खर्च

दहा जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांना जोडत जाणारा महाराष्ट्र समृद्धी महामार्ग बांधण्यासाठी ५५ हजार कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे. एमएसआरडीसीने त्यासाठी विविध राष्ट्रीयीकृत बँकांकडून २८ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. विहित करारानुसार कर्जाची परतफेड २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून सुरू होणार असून, पुढील किमान २५ वर्षांपर्यंत ही परतफेड सुरू राहील. याशिवाय म्हाडा, एमएमआरडीए, सिडको, एसआरए, एमआयडीसी यांनी साडेपाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक या प्रकल्पात केली आहे.

उद्घाटनापासून जूनपर्यंत झालेली महिनानिहाय टोलवसुली (रुपयांत)

डिसेंबर, २०२२ : १३,१७,७२,३१२जानेवारी, २०२३ : २८,५३,२३,४८३फेब्रुवारी : ३०,४७,५१,९६७मार्च : ३४,२३,०३,२२०एप्रिल : ३३,२०,२८,९८४मे : ३६,५८,४०,७२१जून : ३९,५४,०१,१३६

खर्चाची वसुली कशी?

महामार्गावर बांधण्यात आलेल्या एंट्री व एक्झिट पॉइंटला टोलनाक्यांची उभारणी केली आहे. प्रतिकिमी १.७१ रुपयांप्रमाणे समृद्धी महामार्गावर टोल आकारणी केली जाते. नागपूर ते भरवीर या ६०० किमीच्या पहिल्या टप्प्यात सप्टेंबरअखेरपर्यंत ५० लाख वाहनांची वर्दळ झाली. या कालावधीतील अपघातांत १४० लोकांचा मृत्यू झाला.

 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग