शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

वृक्षारोपणाच्या ‘सेल्फी’नंतरच वेतन!

By admin | Updated: July 1, 2016 00:02 IST

वृक्षारोपण मोहीम गतिमान करण्यासाठी वाशिम जिल्हा परिषदेचा निर्णय.

संतोष वानखडे/वाशिमवृक्षारोपण मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषद प्रशासनाने, वृक्षारोपण करतानाच सेल्फी पाठविल्यानंतरच संबंधितांचे वेतन अदा करण्याचा निर्णय घेतला आहे. अमरावती विभागात असा निर्णय घेणारी वाशिम जिल्हा परिषद पहिली ठरली आहे.पर्यावरणाचे संतुलन कायम राखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने १ जुलै रोजी राज्यात दोन कोटी रोपट्यांची लागवड करण्याची मोहीम हाती घेतली आहे. राज्यातील २0 टक्के भूभाग वनाच्छादीत असला तरी, यापैकी केवळ १६ टक्के क्षेत्रावरच घनदाट जंगल आहे. उर्वरित चार टक्के क्षेत्र हा विरळ भाग आहे. या चार टक्के क्षेत्रावरील जंगल अधिक घनदाट करणे आणि राज्यातील वनाच्छादीत क्षेत्र वाढविण्याचा या मोहिमेमागील उद्देश आहे. प्रत्येक जिल्हय़ाला वृक्षारोपणाचे उद्दिष्ट दिले असून, वाशिम जिल्हय़ाला २ लाख ३५ हजार ५00 असे उद्दिष्ट मिळाले आहे. यापैकी जिल्हा परिषदेच्या वाट्यावर ८0 हजारांचे उद्दिष्ट आले. प्राथमिक आरोग्य केंद्र, जि.प. शाळा, खासगी शाळा, ग्रामपंचायत, पशुसंवर्धन दवाखाने, पंचायत समिती, जिल्हा परिषद आदी ठिकाणी वृक्षारोपण होणार आहे. वृक्षारोपण मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीचा एक भाग म्हणून वृक्षारोपण करतानाच सेल्फी फोटो काढणे जिल्हा परिषद प्रशासनाने बंधनकारक केले आहे. वृक्षारोपणाची जबाबदारी असलेल्या संबंधित विभागाने असा सेल्फी जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठविला नाही तर वेतन रोखण्याची तंबीही देण्यात आली. वृक्षारोपण करतानाचा सेल्फी मिळाल्यानंतरच त्या संबंधित विभागाच्या अधिकारी कर्मचार्‍यांचे वेतन निघणार आहे. या सेल्फीमुळे वृक्षारोपण मोहिमेची अंमलबजावणी प्रभावी होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.