शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

राज्यात विक्रीकर वसुली रामभरोसे!

By admin | Updated: August 19, 2016 01:30 IST

आर्थिक उलाढालीत देशात क्रमांक १ चे राज्य असलेल्या महाराष्ट्रात १ एप्रिल २०१६ पासून विक्रीकराची वसुली रामभरोसे सुरू आहे. गेल्या पाच महिन्यांपासून आॅनलाइन रिटर्न बंद असल्याने

- यदु जोशी,  मुंबईआर्थिक उलाढालीत देशात क्रमांक १ चे राज्य असलेल्या महाराष्ट्रात १ एप्रिल २०१६ पासून विक्रीकराची वसुली रामभरोसे सुरू आहे. गेल्या पाच महिन्यांपासून आॅनलाइन रिटर्न बंद असल्याने कोट्यवधी रुपयांच्या उत्पन्नावर उदक सोडण्याची पाळी सरकारवर आली आहे.आॅनलाइन पद्धत ३१ मार्च २०१६ पासून बंद करण्यात आली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. रिटर्नच भरले जात नसल्याने व्यापाऱ्यांकडे नेमके किती रुपयांचे करदायित्व आहे हे कळायला मार्ग नाही. व्यापारी भरतील तो कर गोड मानून घेतला जात आहे. गेल्या वर्षी तुम्ही किती कर भरला होता त्या अनुषंगाने भरा, असे आम्हाला सांगितले जात असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. राज्याच्या महसुलात विक्रीकराचा सिंहाचा वाटा आहे. गेल्या वर्षी ७९ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न या कराद्वारे राज्य शासनास मिळाले होते. २०१६-१७ या आर्थिक वर्षात ९० हजार कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट आहे. विक्रीकर आॅफलाइन भरला जात नाही. पाच महिन्यांपासून रिटर्न भरण्याची आॅनलाइन यंत्रणा बंद आहे. यदा कदाचित ती उद्या सुरू झाली तरी करदायित्व निश्चित करून त्याची वसुली करण्याचे जिकिरीचे काम विभागाला करावे लागणार आहे. त्याचवेळी जीएसटी राज्यात येऊ घातला आहे. अशा परिस्थितीत विक्रीकराचा डोलारा कोसळणे राज्याला परवडणारे नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तर रिटर्न भरले जात नसले तरी करभरणा व्यवस्थित सुरू असल्याचा दावा विक्रीकर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला. जुनी बंद, नवीन पद्धत येईना!‘सॅप’ आधारित कर महसूल व्यवस्थापन (टीआरएम) पद्धत विक्रीकर विभागात आणण्याचे कंत्राट एनआयआयटी कंपनीला वर्षभरापूर्वी देण्यात आले होते. मात्र ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात कंपनीला अद्यापही यश आलेले नाही. त्यासाठी कंपनीवर कुठली कारवाई करणार, असा प्रश्न आहे.नवीन पद्धत लागू करण्यास विलंब झाला आहे. मात्र, आता तिचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या दहा दिवसांत ती सुरू होईल. त्यानंतर विक्रीकराचे रिटर्न भरण्याचे काम पूर्ववत होईल. नवीन पद्धत अधिक गतिमान, पारदर्शक असेल. प्रकरणे प्रलंबित राहणार नाहीत.- राजीव जलोटा, विक्रीकर आयुक्त

सामोरे जाताना आॅनलाइन रिटर्नबाबत विक्रीकर विभागाची अशी उदासीनता चांगली नाहीच. व्यापाऱ्यांना कर भरायला विलंब झाला की सरकार दंड करते. रिटर्नची नवीन आॅनलाइन पद्धत आणण्यात अक्षम्य दिरंगाई करणाऱ्यांविरुद्धही कारवाई करावी. सरकारचा खजिना भरणाऱ्या व्यापारी वर्गाबाबत सरकारचा दृष्टिकोन योग्य नाही. - बी. सी. भरतिया, अध्यक्ष, कॉन्फिडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स