शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात विक्रीकर वसुली रामभरोसे!

By admin | Updated: August 19, 2016 01:30 IST

आर्थिक उलाढालीत देशात क्रमांक १ चे राज्य असलेल्या महाराष्ट्रात १ एप्रिल २०१६ पासून विक्रीकराची वसुली रामभरोसे सुरू आहे. गेल्या पाच महिन्यांपासून आॅनलाइन रिटर्न बंद असल्याने

- यदु जोशी,  मुंबईआर्थिक उलाढालीत देशात क्रमांक १ चे राज्य असलेल्या महाराष्ट्रात १ एप्रिल २०१६ पासून विक्रीकराची वसुली रामभरोसे सुरू आहे. गेल्या पाच महिन्यांपासून आॅनलाइन रिटर्न बंद असल्याने कोट्यवधी रुपयांच्या उत्पन्नावर उदक सोडण्याची पाळी सरकारवर आली आहे.आॅनलाइन पद्धत ३१ मार्च २०१६ पासून बंद करण्यात आली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. रिटर्नच भरले जात नसल्याने व्यापाऱ्यांकडे नेमके किती रुपयांचे करदायित्व आहे हे कळायला मार्ग नाही. व्यापारी भरतील तो कर गोड मानून घेतला जात आहे. गेल्या वर्षी तुम्ही किती कर भरला होता त्या अनुषंगाने भरा, असे आम्हाला सांगितले जात असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. राज्याच्या महसुलात विक्रीकराचा सिंहाचा वाटा आहे. गेल्या वर्षी ७९ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न या कराद्वारे राज्य शासनास मिळाले होते. २०१६-१७ या आर्थिक वर्षात ९० हजार कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट आहे. विक्रीकर आॅफलाइन भरला जात नाही. पाच महिन्यांपासून रिटर्न भरण्याची आॅनलाइन यंत्रणा बंद आहे. यदा कदाचित ती उद्या सुरू झाली तरी करदायित्व निश्चित करून त्याची वसुली करण्याचे जिकिरीचे काम विभागाला करावे लागणार आहे. त्याचवेळी जीएसटी राज्यात येऊ घातला आहे. अशा परिस्थितीत विक्रीकराचा डोलारा कोसळणे राज्याला परवडणारे नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तर रिटर्न भरले जात नसले तरी करभरणा व्यवस्थित सुरू असल्याचा दावा विक्रीकर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला. जुनी बंद, नवीन पद्धत येईना!‘सॅप’ आधारित कर महसूल व्यवस्थापन (टीआरएम) पद्धत विक्रीकर विभागात आणण्याचे कंत्राट एनआयआयटी कंपनीला वर्षभरापूर्वी देण्यात आले होते. मात्र ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात कंपनीला अद्यापही यश आलेले नाही. त्यासाठी कंपनीवर कुठली कारवाई करणार, असा प्रश्न आहे.नवीन पद्धत लागू करण्यास विलंब झाला आहे. मात्र, आता तिचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या दहा दिवसांत ती सुरू होईल. त्यानंतर विक्रीकराचे रिटर्न भरण्याचे काम पूर्ववत होईल. नवीन पद्धत अधिक गतिमान, पारदर्शक असेल. प्रकरणे प्रलंबित राहणार नाहीत.- राजीव जलोटा, विक्रीकर आयुक्त

सामोरे जाताना आॅनलाइन रिटर्नबाबत विक्रीकर विभागाची अशी उदासीनता चांगली नाहीच. व्यापाऱ्यांना कर भरायला विलंब झाला की सरकार दंड करते. रिटर्नची नवीन आॅनलाइन पद्धत आणण्यात अक्षम्य दिरंगाई करणाऱ्यांविरुद्धही कारवाई करावी. सरकारचा खजिना भरणाऱ्या व्यापारी वर्गाबाबत सरकारचा दृष्टिकोन योग्य नाही. - बी. सी. भरतिया, अध्यक्ष, कॉन्फिडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स