शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
3
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
4
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
5
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
6
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
7
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
8
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
9
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
10
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
11
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
12
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
13
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
14
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
15
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
16
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
17
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
18
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
19
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
20
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!

नामांकित कंपन्यांच्या नावावर बोगस सोयाबीन बियाणे विक्री

By admin | Updated: May 26, 2014 01:01 IST

पश्‍चिम विदर्भातील एक लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा कॅश करण्यासाठी काही दलाल-विक्रेत्यांनी नवा फंडा शोधून काढला आहे. तीन हजार रुपये क्विंटलचे सोयाबीन खरेदी करून ते पिशव्यांमध्ये भरले

यवतमाळ : पश्‍चिम विदर्भातील एक लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा कॅश करण्यासाठी काही दलाल-विक्रेत्यांनी नवा फंडा शोधून काढला आहे. तीन हजार रुपये क्विंटलचे सोयाबीन खरेदी करून ते पिशव्यांमध्ये भरले जात आहे. त्यावर नामांकित कंपन्यांचा टॅग लावून हेच सोयाबीन बियाणे म्हणून आठ हजार रुपये क्विंटलने बाजारात विकले जात आहे.

विशेष असे, या बियाण्यांवर कोणतीही प्रक्रिया केलेली नसून त्याची उगवण क्षमताही तपासली गेली नसल्याने हे बियाणे कृषी खात्याकडून बोगस असल्याचे शिक्कामोर्तब केले जात आहे.

अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात खरीप लागवड क्षेत्रापैकी ५0 टक्के अर्थात १६ लाख ५0 हजार हेक्टर क्षेत्र सोयाबीन खाली येणार आहे. त्यासाठी १२ लाख क्विंटल बियाणे लागणार आहे. परंतु विविध मार्गाने प्रयत्न करूनही केवळ दहा ते ११ लाख क्विंटल एवढेच बियाणे उपलब्ध होत आहे.

उर्वरित एक लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा आहे. हा तुटवडा भरुन काढण्यासाठी काही बियाणे कंपन्यांनी शेतकर्‍यांच्या फसवणुकीचा प्रयोग सुरू केला आहे. बुलडाणा, अमरावती तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यात गारपीट व वादळी पाऊस झाला नाही किंवा कमी प्रमाणात झाला. तेथील सोयाबीनची गुणवत्ता चांगली होती. तेथून तीन हजार रुपये प्रति क्विंटल दराने बियाणे कंपन्या सोयाबीनची खरेदी करीत आहे. हेच सोयाबीन बियाणे म्हणून बॅगमध्ये भरले जात आहे. त्यावर नामांकित कंपन्यांचा टॅग लावून हेच सोयाबीन प्रति क्विंटल आठ हजार रुपये दराने बियाणे म्हणून शेतकर्‍यांच्या माथी मारले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून हा गोरखधंदा यवतमाळसह पाचही जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. या बोगस बियाण्यांची जबाबदारी विक्रेत्याच्या डोक्यावर टाकली जात आहे. या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल पश्‍चिम विदर्भातील बियाणे बाजारात सुरू आहे.

बियाण्यांच्या नावाखाली कोणतीही उगवण क्षमता न तपासलेले, प्रक्रिया न केलेले सोयाबीन विकले जात आहे. या बोगस बियाण्यांवर कृषी खात्याचे थेट नियंत्रण नसल्याने कारवाईसाठी अडचणी येत आहेत. कृषी विभाग अशा बियाण्यांचे नमुने घेतो, त्यात त्याची उगवण क्षमता ७0 टक्क्यापेक्षा अधिक असल्यास कारवाई करता येत नाही. (जिल्हा प्रतिनिधी)