शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

साखर कारखाने विक्रीची चौकशी ‘ईडी’नेच करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 04:31 IST

महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने खासगी संस्थांना विक्री झाल्याच्या व्यवहाराची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी अंमलबजावणी संचालनालयनेच (ईडी) करावी, असा जबाब खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी दिला.

कोल्हापूर : महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने खासगी संस्थांना विक्री झाल्याच्या व्यवहाराची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी अंमलबजावणी संचालनालयनेच (ईडी) करावी, असा जबाब खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी दिला. शेट्टी यांनी केलेल्या तक्रारीनुसार या व्यवहारांची राज्य शासनाच्या राज्य गुन्हे अन्वेषण शाखेकडून (सीआयडी) चौकशी सुरू झाली असून त्यासाठी हा जबाब घेण्यात आला.राज्यातील ३६ सहकारी साखर कारखान्यांची ९६० कोटी रुपयांना विक्री झाली असून बाजारभावाप्रमाणे या विक्रीपोटी १० हजार कोटी रुपये यायला हवेत, असे शेट्टी यांचे म्हणणे आहे. या व्यवहारात मोठा गैरव्यवहार झाल्याची त्यांची तक्रार आहे. मागील पाच वर्षांत अडचणीत आलेले कारखाने विक्री करण्याचा जणू सपाटाच सुरू होता. ज्यांच्या गैरकारभार व भ्रष्टाचारामुळे हे कारखाने बंद पडले त्यांनीच स्वत:च्या खासगी संस्थेकडून किंवा कुणाला तरी पुढे करून हे कारखाने विकत घेतले आहेत. त्याबद्दल खासदार शेट्टी यांनी ईडी, उच्च न्यायालयात याचिका व मुख्यमंत्र्यांकडेही वारंवार तक्रारी केल्या होत्या.मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आलेल्या तक्रारींची दखल घेऊन त्यांनी ही चौकशी राज्य गुन्हे शाखेकडे सोपवली होती. या शाखेचे उपमहानिरीक्षक जय जाधव यांनी शेट्टी यांचा कोल्हापुरात येऊन जबाब नोंदविला.शेट्टी यांनी सांगितले, ‘हा सगळा व्यवहारच संशयास्पद आहे. ज्या बँकांनी कर्ज दिले व ते थकीत राहिले म्हणून कारखाने विक्रीस काढले त्यांची तसेच, ज्यांनी हे कारखाने विकत घेतले त्या संस्थेच्या संचालकांचीही चौकशी आवश्यक आहे. त्यांच्याकडे एवढा पैसा आला कुठून याच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. जिल्हा बँका व सहकारी बँकेच्या तत्कालीन पदाधिकारी व अधिकाºयांनी या व्यवहारात मोठा डल्ला मारला आहे. गोरगरीब शेतकºयांच्या घामाच्या पैशांतून कारखानदारी उभी राहिली.’

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टी