शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

सरकारी यंत्रणा हाताशी धरून कुळाच्या जमिनींची विक्री, आदिवासी रस्त्यावर येण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 00:29 IST

खेड तालुक्यातील निसर्गरम्य भोरगिरी येथील कुळाच्या जमिनींचे बेकायदेशीरपणे प्लॉटिंग करून एजंटांकडून सर्रास विक्री सुरू आहे. गेल्या चार पिढ्यांपासून येथील आदिवासी कुटुंबे ही जमीन कसत असताना परस्पर विक्री सुरू आहे.

सुषमा नेहरकर-शिंदे ।पुणे : खेड तालुक्यातील निसर्गरम्य भोरगिरी येथील कुळाच्या जमिनींचे बेकायदेशीरपणे प्लॉटिंग करून एजंटांकडून सर्रास विक्री सुरू आहे. गेल्या चार पिढ्यांपासून येथील आदिवासी कुटुंबे ही जमीन कसत असताना परस्पर विक्री सुरू आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.भोरगिरी येथील सुमारे १५० एकर जमीन काहींनी आपल्या नावावर करून घेतली; परंतु त्या जमिनीवर सुमारे ८० आदिवासी कुटुंबांची कूळ म्हणून नोंद झाली आहे. गेल्या शंभर वर्षांपासून या आदिवासी कुटंबांची जमिनीवर वहिवाट आहे. भीमाशंकर अभयारण्याला लागून निसर्गरम्य भागात हे प्लॉटिंग केले असून, केवळ ५० हजार रुपये गुंठा दराने ही विक्री सुरू आहे. हे प्लॉटिंग करताना संबंधित एजंटांनी महसूल विभागातील गावपातळीवरील अधिकाºयांना हाताशी धरून कुळांच्या नोंदीमध्ये फेरफार केला आहे. यात दोन पिढ्यांच्या कुळांच्या नोंदी वगळण्यात आल्या असून, केवळ चालू पिढीचे नाव कूळ म्हणून लावले आहे. जमिनीची विक्री करण्यासाठी चाकण, राजगुरुनगर, वाडा, भोरगिरी येथे मोठमोठे बॅनर लावून जमीनविक्रीची जाहिरात करण्यात आली आहे.>स्वस्तात मिळते म्हणून जमीन खरेदी करू नयेगेल्या काही वर्षांत खेडसह जिल्ह्यात सर्वच ठिकाणी एजंटांकडून गुंतागूत असलेल्या जमिनीचे बेकायदेशीरपणे प्लॉटिंग करून स्वस्तात विक्री करण्याचे प्रकार सुरू आहेत. जमीन स्वस्तात मिळते म्हणून नागरिकांकडूनदेखील अशी जमीन खरेदी करण्यासाठी उड्या पडतात; परंतु जमिनीचे ‘टायटल’ क्लीअर असल्याशिवाय कोणत्याही स्वरूपाची जमीन खरेदी करून नये. दरम्यान, खेड तालुक्यातील भोरगिरी येथील बेकायदेशीर प्लॉटिंगसंदर्भांत तक्रार दाखल झाली असून, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. - राजेंद्र मुठे,निवासी उपजिल्हाधिकारी>१५० एकरांचे प्लॉटिंग; आदिवासींची फसवणूकखेड तालुक्यात भोरगिरी येथील तब्बल १५० एकर जमिनीचे प्लॉटिंग करून बेकायदेशीर विक्री सुरू आहे. गेल्या चार पिढ्यंपासून येथील आदिवासी ही जमीन कसत आहेत. सरकारी सर्व कायदे आदिवासी लोकांच्या बाजूचे असताना सरकारी अधिकाºयांना हाताशी धरून कायद्यातून पळवाटा काढल्या जातात. त्यामुळे सर्वसामान्य आदिवासी कुटुंबांवर अन्याय केला जातो. भोरगिरी येथे जमिनी व्यवहाराचे असे प्रकार सुरू आहेत. यामध्ये तातडीने जिल्हाधिकाºयांनी लक्ष घालून फसवणूक त्वरित थांबवावी.-सीताराम जोशी, अध्यक्षआदिवासी समाज कृती समिती