शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

सरकारी यंत्रणा हाताशी धरून कुळाच्या जमिनींची विक्री, आदिवासी रस्त्यावर येण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 00:29 IST

खेड तालुक्यातील निसर्गरम्य भोरगिरी येथील कुळाच्या जमिनींचे बेकायदेशीरपणे प्लॉटिंग करून एजंटांकडून सर्रास विक्री सुरू आहे. गेल्या चार पिढ्यांपासून येथील आदिवासी कुटुंबे ही जमीन कसत असताना परस्पर विक्री सुरू आहे.

सुषमा नेहरकर-शिंदे ।पुणे : खेड तालुक्यातील निसर्गरम्य भोरगिरी येथील कुळाच्या जमिनींचे बेकायदेशीरपणे प्लॉटिंग करून एजंटांकडून सर्रास विक्री सुरू आहे. गेल्या चार पिढ्यांपासून येथील आदिवासी कुटुंबे ही जमीन कसत असताना परस्पर विक्री सुरू आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.भोरगिरी येथील सुमारे १५० एकर जमीन काहींनी आपल्या नावावर करून घेतली; परंतु त्या जमिनीवर सुमारे ८० आदिवासी कुटुंबांची कूळ म्हणून नोंद झाली आहे. गेल्या शंभर वर्षांपासून या आदिवासी कुटंबांची जमिनीवर वहिवाट आहे. भीमाशंकर अभयारण्याला लागून निसर्गरम्य भागात हे प्लॉटिंग केले असून, केवळ ५० हजार रुपये गुंठा दराने ही विक्री सुरू आहे. हे प्लॉटिंग करताना संबंधित एजंटांनी महसूल विभागातील गावपातळीवरील अधिकाºयांना हाताशी धरून कुळांच्या नोंदीमध्ये फेरफार केला आहे. यात दोन पिढ्यांच्या कुळांच्या नोंदी वगळण्यात आल्या असून, केवळ चालू पिढीचे नाव कूळ म्हणून लावले आहे. जमिनीची विक्री करण्यासाठी चाकण, राजगुरुनगर, वाडा, भोरगिरी येथे मोठमोठे बॅनर लावून जमीनविक्रीची जाहिरात करण्यात आली आहे.>स्वस्तात मिळते म्हणून जमीन खरेदी करू नयेगेल्या काही वर्षांत खेडसह जिल्ह्यात सर्वच ठिकाणी एजंटांकडून गुंतागूत असलेल्या जमिनीचे बेकायदेशीरपणे प्लॉटिंग करून स्वस्तात विक्री करण्याचे प्रकार सुरू आहेत. जमीन स्वस्तात मिळते म्हणून नागरिकांकडूनदेखील अशी जमीन खरेदी करण्यासाठी उड्या पडतात; परंतु जमिनीचे ‘टायटल’ क्लीअर असल्याशिवाय कोणत्याही स्वरूपाची जमीन खरेदी करून नये. दरम्यान, खेड तालुक्यातील भोरगिरी येथील बेकायदेशीर प्लॉटिंगसंदर्भांत तक्रार दाखल झाली असून, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. - राजेंद्र मुठे,निवासी उपजिल्हाधिकारी>१५० एकरांचे प्लॉटिंग; आदिवासींची फसवणूकखेड तालुक्यात भोरगिरी येथील तब्बल १५० एकर जमिनीचे प्लॉटिंग करून बेकायदेशीर विक्री सुरू आहे. गेल्या चार पिढ्यंपासून येथील आदिवासी ही जमीन कसत आहेत. सरकारी सर्व कायदे आदिवासी लोकांच्या बाजूचे असताना सरकारी अधिकाºयांना हाताशी धरून कायद्यातून पळवाटा काढल्या जातात. त्यामुळे सर्वसामान्य आदिवासी कुटुंबांवर अन्याय केला जातो. भोरगिरी येथे जमिनी व्यवहाराचे असे प्रकार सुरू आहेत. यामध्ये तातडीने जिल्हाधिकाºयांनी लक्ष घालून फसवणूक त्वरित थांबवावी.-सीताराम जोशी, अध्यक्षआदिवासी समाज कृती समिती