शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
2
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
3
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
4
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
5
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
6
Video : हवेत टक्कर अन् काही सेकंदात जमिनीवर कोसळले हेलिकॉप्टर! अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद
7
चांदी जैसा रंग है तेरा...! 'ही' छैल छबेली चांदी फक्त भाव खात चालली आहे...
8
"युक्रेन शांतता चर्चा ९५% यशस्वी, पण..." झेलेन्स्की-ट्रम्प यांच्यात काय चर्चा झाली? हा महत्वाचा मुद्दा अद्यापही लटकूनच
9
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२१,३४१ चं फिक्स व्याज, गॅरंटीसह मिळणार परतावा
10
रशियन सैन्यातील १० भारतीयांचा युद्धात मृत्यू; भावाचा शोध घेणाऱ्या तरुणाचा खळबळजनक दावा
11
आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण...
12
१ महिन्यात ३ चतुर्थींचा अद्भूत योग; २०२६ मध्ये किती अन् कधी विनायक-संकष्टी तिथी? यादीच पाहा
13
एआयच्या निमित्ताने अदानींसोबतच पवार कुटुंब एकाच व्यासपीठावर; शरद पवार यांचे अदानींकडून कौतुक
14
मुंबई महापालिकेत काँग्रेस-वंचित युती; इतर महापालिकांचा निर्णय स्थानिक पातळीवर; वंचित ६२ जागा लढवणार, अकोल्यात मात्र वेटिंग
15
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
16
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
17
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
18
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
19
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
20
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाल्यासाठी बाहे गाव जिल्ह्यात अग्रस्थानी

By admin | Updated: April 7, 2017 02:41 IST

भाजीपाला पिकाच्या क्षेत्रात सर्वस्वी योगदान देऊन संपूर्ण रायगड जिल्ह्यात एक वेगळे वैशिष्ट्य निर्माण केले आहे

मिलिंद अष्टिवकर,रोहा- कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी या संत चोखामेळाच्या वचनाप्रमाणे ज्या गावाने कर्म हीच देवपूजा मानून स्वत:चा चरितार्थ चालवून भाजीपाला पिकाच्या क्षेत्रात सर्वस्वी योगदान देऊन संपूर्ण रायगड जिल्ह्यात एक वेगळे वैशिष्ट्य निर्माण केले आहे असे रोहे तालुक्यातील कृषीनिष्ठ बाहे गाव. कसदार व ताज्या भाजीसाठी केवळ रोहे तालुक्यालाच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्याला हेवा वाटावा असे हे गाव. गेल्या अनेक पिढ्यांपासून या गावाने आपला हा व्यवसाय जतन करून ठेवला आहे. रोह्यातून वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळणाऱ्या निसर्गरम्य कुंडलिका नदीच्या तीरावर हे गाव वसले आहे. बारमाही वाहणाऱ्या कुंडलिका नदीच्या तीरावर असलेल्या आपल्या शेतीमध्ये या गावात पिढ्यानपिढ्या भाजीपाल्याची शेती पिकविली जात आहे. भाजीपाला क्षेत्रातील सारी कौशल्ये एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत आहेत, तर आज या क्षेत्रात गावातील केवळ वडीलधारी मंडळीच नव्हे तर उच्चशिक्षित तरुणाईनेही आपापली नोकरी सांभाळून झोकून दिले आहे.भाजीपिकांवर कितीही संकटे आली तरी येथील शेतकरी साऱ्या गोष्टींवर मात करीत किमान स्वत:च्या चरितार्थापुरते तरी उत्पादन घेताना दिसत आहेत. येथील भाजीपाल्याच्या वेगळ्या वैशिष्ट्यामुळे साऱ्यांनाच येथील भाजीचे वेगळे आकर्षण आहे. उन्हाळी हंगामात नदीच्या पाण्यावर येथील शेतकरी कित्येक एकराच्या परिसरात भाजीपाल्याची लागवड करीत आले आहेत. रासायनिक खते व कीटकनाशकांचा कमीत कमी वापर करून केवळ अंगमेहनत व चिकाटीच्या जोरावर येथील शेतकऱ्यांनी आपला व्यवसाय टिकून ठेवला आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या भाजीपेक्षा येथील भाजीचा दर्जा चांगला असल्याने तसेच ताजी भाजी व किफायतशीर दर यामुळे ग्राहकांचीही पहिली पसंती या भाजीलाच येते.उन्हाळी हंगामात भातशेतीला पाणी मिळत नाही. याशिवाय गावाच्या बाजूलाच एमआयडीसीत कारखाने आहेत. परंतु स्थानिकांना येथे कायमस्वरूपी नोकरी मिळत नसल्याने येथील शेतकरी व तरुण वर्गाने आपल्या हक्काची रोजीरोटी म्हणून भाजीपाल्याच्या शेतीकडे विशेष लक्ष दिले आहे. भाजीचे उत्पादन चांगले आले तर संपूर्ण वर्षभराच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटतो, तर कधी उत्पादन कमी आले तर फक्त तात्पुरता चरितार्थ चालतो. येथील शेतीमळ्यात पिकणारी भाजी शेतकरी डोक्यावर टोपले घेऊन तालुक्यातील प्रत्येक गावात फिरत असतात,तर रोह्याची बाजारपेठ तसेच विविध आठवड्यांचे बाजार येथे विकली जाते. काही वर्षांपासून पुणे, महाड, पेण, पनवेल व नवी मुंबई येथील घाऊक व्यापारी थेट शेतमळ्यावर येऊन भाजी खरेदी करीत असल्याने मालाला उठाव देखील चांगला होत आहे, याशिवाय श्रम व पैशांचीही चांगली बचत होत आहे. या व्यापारात शेतकरीवर्गाला बऱ्यापैकी आर्थिक लाभ होताना दिसत आहे. शेतकरी वर्गाने चालविलेला पिढीजात व्यवसाय आधुनिक काळात देखील आदर्शवत ठरत आहे.