शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
5
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
6
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
7
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
8
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
9
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
10
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
12
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
13
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
14
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
15
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
16
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
17
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
18
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
19
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

साई संस्थानच्या निधीचा विनियोग सत्कार्यासाठी व्हावा!

By admin | Updated: April 14, 2015 01:09 IST

साईबाबा संस्थानच्या पैशांचा विनियोग समाजातील दु:ख व अज्ञान दूर करण्याकरिता व्हावा, अशी अपेक्षा डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी साठ वर्षांपूर्वी व्यक्त केली होती.

डॉ़ आंबेडकरांनी व्यक्त केली होती अपेक्षाप्रमोद आहेर - शिर्डीसाईबाबा संस्थानच्या पैशांचा विनियोग समाजातील दु:ख व अज्ञान दूर करण्याकरिता व्हावा, अशी अपेक्षा डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी साठ वर्षांपूर्वी व्यक्त केली होती. याबाबतच्या आठवणींना शिर्डीकर आजही उजाळा देत आहेत़ २३ ते २६ जानेवारी १९५४ दरम्यान मुंबईत आयोजित साईभक्त संमेलनाचे उद्घाटन डॉ़ आंबेडकरांच्या हस्ते करण्यात आले होते़ केंद्रीय गृह खात्याचे उपमंत्री दातार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई, रामकृष्ण मिशनचे स्वामी संबुद्धानंद, महसूलमंत्री भाऊसाहेब हिरे, प्राचार्य ए़आऱ वाडिया आदींची उपस्थिती होती़ या वेळी डॉ़ आंबेडकर यांनी संतांच्या नावे पैसा जमवला असल्यास त्याचा विनियोग सत्पात्री व्हावा, आपल्या सभोवताली दैन्य, दारिद्य्र, अज्ञान, रोगराई मोठ्या प्रमाणात पसरली आहे़ त्यामुळे अशा पैशाचा सदुपयोग हे दु:ख, अज्ञान दूर करण्याकरिता केला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती़धर्माच्या बाबतीत आपण चुकीच्या मार्गाने जात आहोत, एवढेच नव्हेतर धर्माच्या नावाने पैसा जमा करून तो वाटेल त्या कामी खर्च करणे, हा सध्या अनेकांचा व्यवसाय बनला आहे़ देशात दैन्य व दारिद्य्र इतके बोकाळले आहे की, धर्माच्या नावाने पैसा जमवून तो ब्राह्मण भोजनासाठी किंवा यात्रेकरूंना पोसण्यासाठी खर्च करणे गुन्हा आहे, असे आपण मानत असल्याचे परखड मतही डॉ़ आंबेडकर यांनी तेव्हा व्यक्त केले होते़ या देशात धर्माला वेळोवेळी वेगवेगळे स्वरूप प्राप्त झालेले आहे़ मूर्तीची, साधूसंतांची पूजा करणे किंवा त्यांच्या नादी लागणे हीच सध्या आपल्या धर्माची भिन्नभिन्न स्वरूपे आहेत़ मानवी मनाची ही अत्यंत खालावलेली अवस्था असल्याचे सांगत डॉ़ आंबेडकरांनी धर्माला पूर्वीचे सोज्वळ व पवित्र स्वरूप प्राप्त करून देण्याचे आवाहनही या वेळी भावी पिढीला केले़आपण साईबाबांचे भक्त किंवा अनुयायी नसल्याचे किंवा त्यांना पाहिलेही नसल्याचा खुलासा करत बाबा समाधीस्त झाल्यानंतरही भक्तवर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे डॉ़ आंबेडकरांनी सांगितले़ या भक्त संमेलनात संत गाडगे महाराज व संत तुकडोजी महाराज यांच्या भजन-प्रवचनाचेही कार्यक्रम झाले होते़