शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

साई संस्थानच्या निधीचा विनियोग सत्कार्यासाठी व्हावा!

By admin | Updated: April 14, 2015 01:09 IST

साईबाबा संस्थानच्या पैशांचा विनियोग समाजातील दु:ख व अज्ञान दूर करण्याकरिता व्हावा, अशी अपेक्षा डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी साठ वर्षांपूर्वी व्यक्त केली होती.

डॉ़ आंबेडकरांनी व्यक्त केली होती अपेक्षाप्रमोद आहेर - शिर्डीसाईबाबा संस्थानच्या पैशांचा विनियोग समाजातील दु:ख व अज्ञान दूर करण्याकरिता व्हावा, अशी अपेक्षा डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी साठ वर्षांपूर्वी व्यक्त केली होती. याबाबतच्या आठवणींना शिर्डीकर आजही उजाळा देत आहेत़ २३ ते २६ जानेवारी १९५४ दरम्यान मुंबईत आयोजित साईभक्त संमेलनाचे उद्घाटन डॉ़ आंबेडकरांच्या हस्ते करण्यात आले होते़ केंद्रीय गृह खात्याचे उपमंत्री दातार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई, रामकृष्ण मिशनचे स्वामी संबुद्धानंद, महसूलमंत्री भाऊसाहेब हिरे, प्राचार्य ए़आऱ वाडिया आदींची उपस्थिती होती़ या वेळी डॉ़ आंबेडकर यांनी संतांच्या नावे पैसा जमवला असल्यास त्याचा विनियोग सत्पात्री व्हावा, आपल्या सभोवताली दैन्य, दारिद्य्र, अज्ञान, रोगराई मोठ्या प्रमाणात पसरली आहे़ त्यामुळे अशा पैशाचा सदुपयोग हे दु:ख, अज्ञान दूर करण्याकरिता केला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती़धर्माच्या बाबतीत आपण चुकीच्या मार्गाने जात आहोत, एवढेच नव्हेतर धर्माच्या नावाने पैसा जमा करून तो वाटेल त्या कामी खर्च करणे, हा सध्या अनेकांचा व्यवसाय बनला आहे़ देशात दैन्य व दारिद्य्र इतके बोकाळले आहे की, धर्माच्या नावाने पैसा जमवून तो ब्राह्मण भोजनासाठी किंवा यात्रेकरूंना पोसण्यासाठी खर्च करणे गुन्हा आहे, असे आपण मानत असल्याचे परखड मतही डॉ़ आंबेडकर यांनी तेव्हा व्यक्त केले होते़ या देशात धर्माला वेळोवेळी वेगवेगळे स्वरूप प्राप्त झालेले आहे़ मूर्तीची, साधूसंतांची पूजा करणे किंवा त्यांच्या नादी लागणे हीच सध्या आपल्या धर्माची भिन्नभिन्न स्वरूपे आहेत़ मानवी मनाची ही अत्यंत खालावलेली अवस्था असल्याचे सांगत डॉ़ आंबेडकरांनी धर्माला पूर्वीचे सोज्वळ व पवित्र स्वरूप प्राप्त करून देण्याचे आवाहनही या वेळी भावी पिढीला केले़आपण साईबाबांचे भक्त किंवा अनुयायी नसल्याचे किंवा त्यांना पाहिलेही नसल्याचा खुलासा करत बाबा समाधीस्त झाल्यानंतरही भक्तवर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे डॉ़ आंबेडकरांनी सांगितले़ या भक्त संमेलनात संत गाडगे महाराज व संत तुकडोजी महाराज यांच्या भजन-प्रवचनाचेही कार्यक्रम झाले होते़