शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

युवा संमेलन घेण्यास साहित्य महामंडळ असमर्थ

By admin | Updated: June 5, 2017 20:37 IST

युवा संमेलन हा राज्य शासनाचा विषय आहे. राज्य शासनाने या संमेलनासाठी शासनाने केलेली २५ लाख रुपयांची तरतूद अपुरी आहे.

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 5 - युवा संमेलन हा राज्य शासनाचा विषय आहे. राज्य शासनाने या संमेलनासाठी शासनाने केलेली २५ लाख रुपयांची तरतूद अपुरी आहे. वर्षातून एक संमेलन घेताना नाकी नऊ येत असताना दुस-या संमेलनाची जबाबदारी महामंडळाने घेऊ नये, असा निर्णय महामंडळाच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला. त्यामुळे युवा संमेलन घेण्यास महामंडळ असमर्थ आहे, असे शासनाला पत्राद्वारे कळवण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून चर्चेत असलेला युवा संमेलनाचा प्रश्न तुर्तास निकाली निघाला आहे.
युवा संमेलन महामंडळाचे नसून शासनाचे आहे. त्यामुळे युवा संमेलन घेण्यास महामंडळ असमर्थ असल्याचे शासनाला पत्राद्वारे कळवण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
राज्य शासनाच्या युवक धोरणाअंतर्गत तरुणांच्या कलागुणांना उत्तम व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने सरकारतर्फे युवा संमेलनाची घोषणा करण्यात आली. या संमेलनासाठी २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलानाचा अनुभव गाठीशी असल्याने साहित्य महामंडळाने युवा संमेलनाची जबाबदारी घ्यावी, अशी घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सासवड येथे २०१४ साली आयोजित साहित्य संमेलनामध्ये केली होती. 
शालेय क्रीडा आणि युवक सेवा विभाग आणि शासनाचा सांस्कृतिक विभाग यापैकी संमेलनाची जबाबदारी कोणी घ्यायची, यामध्ये स्पष्टता येत नव्हती. महामंडळाने अनेकदा पाठपुरावा आणि विचारणा करुनही प्रत्येक विभाग ही जबाबदारी एकमेकांच्या गळयात बांधत टोलवाटोलवी करत होता. याबाबत शासन आणि महामंडळ यांच्यात पत्रव्यवहारही झाले. युवा संमेलन साहित्य संमेलनाचा एक भाग करण्याबाबतही चर्चा झाली. 
महामंडळास प्राप्त झालेल्या पत्रव्यवहारानुसार, शासनाच्या विविध विभागांची उदासिनता पाहता, युवा संमेलन केवळ शासकीय उत्सव ठरेल, अशी शक्यता निर्माण झाली. युवा संमेलनासाठी २५ लाख रुपयांची तरतूद केली असली तरी ती मिळवण्यासाठी महामंडळाचा खटाटोप करावा लागणार आहे. एवढ्या कमी पैशांत संमेलन घेणे शक्य नाही. त्याचप्रमाणे, महामंडळाने संमेलनाचे स्वरुप निश्चित केल्यानंतर शासकीय हस्तक्षेप केला जाऊ शकतो. त्यामुळे युवा संमेलनाची जबाबदारी महामंडळाने घेऊ नये, असा निर्णय नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याचे जोशी यांनी सांगितले.