शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

युवा संमेलन घेण्यास साहित्य महामंडळ असमर्थ

By admin | Updated: June 5, 2017 20:37 IST

युवा संमेलन हा राज्य शासनाचा विषय आहे. राज्य शासनाने या संमेलनासाठी शासनाने केलेली २५ लाख रुपयांची तरतूद अपुरी आहे.

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 5 - युवा संमेलन हा राज्य शासनाचा विषय आहे. राज्य शासनाने या संमेलनासाठी शासनाने केलेली २५ लाख रुपयांची तरतूद अपुरी आहे. वर्षातून एक संमेलन घेताना नाकी नऊ येत असताना दुस-या संमेलनाची जबाबदारी महामंडळाने घेऊ नये, असा निर्णय महामंडळाच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला. त्यामुळे युवा संमेलन घेण्यास महामंडळ असमर्थ आहे, असे शासनाला पत्राद्वारे कळवण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून चर्चेत असलेला युवा संमेलनाचा प्रश्न तुर्तास निकाली निघाला आहे.
युवा संमेलन महामंडळाचे नसून शासनाचे आहे. त्यामुळे युवा संमेलन घेण्यास महामंडळ असमर्थ असल्याचे शासनाला पत्राद्वारे कळवण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
राज्य शासनाच्या युवक धोरणाअंतर्गत तरुणांच्या कलागुणांना उत्तम व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने सरकारतर्फे युवा संमेलनाची घोषणा करण्यात आली. या संमेलनासाठी २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलानाचा अनुभव गाठीशी असल्याने साहित्य महामंडळाने युवा संमेलनाची जबाबदारी घ्यावी, अशी घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सासवड येथे २०१४ साली आयोजित साहित्य संमेलनामध्ये केली होती. 
शालेय क्रीडा आणि युवक सेवा विभाग आणि शासनाचा सांस्कृतिक विभाग यापैकी संमेलनाची जबाबदारी कोणी घ्यायची, यामध्ये स्पष्टता येत नव्हती. महामंडळाने अनेकदा पाठपुरावा आणि विचारणा करुनही प्रत्येक विभाग ही जबाबदारी एकमेकांच्या गळयात बांधत टोलवाटोलवी करत होता. याबाबत शासन आणि महामंडळ यांच्यात पत्रव्यवहारही झाले. युवा संमेलन साहित्य संमेलनाचा एक भाग करण्याबाबतही चर्चा झाली. 
महामंडळास प्राप्त झालेल्या पत्रव्यवहारानुसार, शासनाच्या विविध विभागांची उदासिनता पाहता, युवा संमेलन केवळ शासकीय उत्सव ठरेल, अशी शक्यता निर्माण झाली. युवा संमेलनासाठी २५ लाख रुपयांची तरतूद केली असली तरी ती मिळवण्यासाठी महामंडळाचा खटाटोप करावा लागणार आहे. एवढ्या कमी पैशांत संमेलन घेणे शक्य नाही. त्याचप्रमाणे, महामंडळाने संमेलनाचे स्वरुप निश्चित केल्यानंतर शासकीय हस्तक्षेप केला जाऊ शकतो. त्यामुळे युवा संमेलनाची जबाबदारी महामंडळाने घेऊ नये, असा निर्णय नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याचे जोशी यांनी सांगितले.