शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

भातशेतीसाठी सगुणा तंत्र फायदेशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 11:44 IST

ग्रासरुट इनोव्हेटर : काशीनाथ खोले नेरळ येथील कृषीतज्ज्ञ चंद्रशेखर भडसावळे यांच्या सहवासात आले आणि त्यांच्याकडून त्यांनी सगुणा शेतीचे धडे मिळविले.

- हेमंत आवारी (अकोले, जि.अहमदनगर)

सहा वर्षांपासून  शेताची नांगरणी, वखरणी नाही. रोप नाही. पहिला पाऊस पडला की, खाचरात गादी वाफ्यावर भाताचे बी एका ओळीत टोबायचे. पावसाच्या पाण्यावर नैसर्गिक सेंद्रिय शेती पिकवायची अन् उत्पादन खर्च कमी करून पारंपरिक भातशेतीपेक्षा दुपटीने जास्त उत्पादन घ्यायचे, ही किमया ‘सगुणा’ तंत्रामुळे साधली. पेंडशेत शिवारात काशीनाथ खोले या आदिवासी शेतकऱ्याने सगुणा पद्धतीने भातशेती फुलविली आहे. काशीनाथ खोले नेरळ येथील कृषीतज्ज्ञ चंद्रशेखर भडसावळे यांच्या सहवासात आले आणि त्यांच्याकडून त्यांनी सगुणा शेतीचे धडे मिळविले. २०१३ ला त्यांनी सगुणाची कास धरली.

पूर्वी रानात दोन अडीच पोती पेरली की दहा बारा पोते उत्पादन मिळायचे. आता सगुणामुळे नांगरणी बंद झाल्याने बैलं विकून टाकले. गाळ करण्याचा प्रश्न राहिला नाही. गादी वाफे करायचे. त्यावर टोभणी यंत्राने शिस्तबद्ध भात टोभायचे. एकरी १० ते १२ किलोत लागवड पूर्ण होते. दोन ओळीत अंतर असल्याने शेतात मोकळे वावरता येते. लावणीचा मजुरी खर्च कमी झाला. तण काढून गाडल्याने सेंद्रिय खत मिळते. गांडूळ खतामुळे जमीन भुसभुशीत राहते. ‘शेण, गोमूत्र, दही, गूळ, डाळीचे पीठ’यापासून तयार केलेले ‘जिवामृत’ फवारले की कीड नियंत्रण होते. पाणी कमी लागते. रबीत टोभूनच हरभरा, वाटाणे, मसूर पीक घेता येते. भाताची खोड तशीच असली तरी ती सडतात आणि खत मिळते.

सहा एकरवर सगुणाबाग उभारली असून, सध्या पारंपरिक वाण काळभात, जीरवेल, कोळपी तसेच इंद्रायणी, फुलेराधा वाण उभे आहेत. एकरी २२ ते २४ क्ंिवटल भात उत्पादन होते. हातसडीचा काळभात १२५ रुपये तर इंद्रायणी ६० रुपये किलोने विकला. २५ गुंठ्यात दीड क्ंिवटल हरभरा, वाटाणा व मसूर प्रत्येकी ५० किलो उत्पादन मिळाले. आपली ही शेती बघून तालुक्यातील इतर गावातील ७५ शेतकरी सगुणा शेतीकडे वळाले, असे खोले सांगतात.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र