शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘विक्रांत’च्या सुरक्षेसाठी अंबरनाथचे ‘कवच’; युद्धनौकेचे करणार संरक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 08:20 IST

ही मिसाईल ‘विक्रांत’पासून ३ ते ५ किमी अंतरावर शत्रूच्या मिसाईलसमोर एक युद्धनौका उभी असल्याचा आभास निर्माण करेल. ज्यामुळे शत्रूची मिसाईल तिथेच फुटेल आणि विक्रांतचे संरक्षण होईल.

अंबरनाथ : भारतीय नौदलाच्या ताफ्यात नुकत्याच दाखल झालेल्या ‘विक्रांत’ युद्धनौकेचे रक्षण अंबरनाथचे ‘कवच’ करणार आहे. कवच ही अँटिमिसाईल सिस्टीम असून ती विक्रांत युद्धनौकेचे मिसाईल हल्ल्यापासून रक्षण करणार आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील अंबरनाथच्या मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी ही अँटिमिसाईल सिस्टीम तयार करण्यात आली आहे.

देशावर सागरी मार्गाने होणारी आक्रमणे रोखण्यासाठी आणि तितक्याच ताकदीने परतवून लावण्यासाठी विक्रांत ही युद्धनौका २ सप्टेंबर २०२२ रोजी भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. ही युद्धनौका देशाचे रक्षण करत असली, तरी या युद्धनौकेचे संरक्षणही अतिशय महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे शत्रू सैन्याने या युद्धनौकेवर एखादे मिसाईल डागले, तर त्यापासून रक्षण करण्यासाठी या युद्धनौकेवर कवच ही अँटिमिसाईल सिस्टीम बसवण्यात आली आहे. ज्यावेळी शत्रूकडून विक्रांतवर एखादे मिसाईल डागण्यात येईल, त्यावेळी रडारच्या माध्यमातून कवचला सूचना जाऊन आपोआप त्यातून एक मिसाईल फायर होईल. 

ही मिसाईल ‘विक्रांत’पासून ३ ते ५ किमी अंतरावर शत्रूच्या मिसाईलसमोर एक युद्धनौका उभी असल्याचा आभास निर्माण करेल. ज्यामुळे शत्रूची मिसाईल तिथेच फुटेल आणि विक्रांतचे संरक्षण होईल. विक्रांतवर चार ठिकाणी बसवलेली ही संपूर्ण सिस्टीम संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील अंबरनाथच्या मशीन टूल प्रोटोटाईप फॅक्टरीत (एमटीपीएफ) तयार करण्यात आली आहे. त्यामुळे देशाचा अभिमान असलेल्या विक्रांतला अंबरनाथचे सुरक्षा कवच असणे ही अंबरनाथकरांसाठी मोठी गौरवाची बाब ठरली आहे. मशीन टूल प्रोटोटाईप फॅक्टरीचे प्रमुख, चीफ जनरल मॅनेजर राजेश अगरवाल यांनीही आपल्यासाठी ही अभिमानाची बाब असल्याचे म्हटले आहे.

विविध नाैकांवर सिस्टीम कार्यान्वित२००६ पासून या फॅक्टरीत ‘कवच’ या अँटिमिसाईल सिस्टीमची निर्मिती सुरू झाली. ही सिस्टीम संपूर्ण ‘एमटीपीएफ’ फॅक्टरीच्या अधिकारी आणि कामगारांनी मिळून तयार केली आहे. परदेशी तंत्रज्ञानाचा यासाठी वापर केलेला नाही. आतापर्यंत अशा १३ ‘कवच’ अँटिमिसाईल सिस्टीम भारतीय नौदलाच्या विविध युद्धनौकांवर बसवण्यात आल्या आहेत.