शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

जनतेने कोणालाच बहुमत दिले नाही याचे दुःखच - उद्धव ठाकरे

By admin | Updated: October 20, 2014 09:42 IST

महाराष्ट्रातील जनतेने यंदाही कोणालाच बहुमत दिले नाही, या निकालामुळे जनता खूश आहे का ? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २० - महाराष्ट्रातील जनतेने यंदाही कोणालाच बहुमत दिले नाही,  जनताजनार्दाला आम्ही दोष देणार नाही, मात्र विधानसभेच्या निकालामुळे जनता खूश आहे का ? असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्र पुन्हा अराजकता आणि अस्थिरतेच्या झोक्यावर गटांगळ्या खात आहे अशी भिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.  

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण केले आहे. युती तुटल्याचा सर्वाधिक फायदा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला झाला असून 'युती' कायम असती तर आघाडीच्या २५ जागाही आल्या नसत्या असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.  एकीककडे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्व सत्ता विरोधात होती तर दुसरीकडे काँग्रेस - राष्ट्रवादीचे सत्ताधारी आमच्या विरोधात उतरली. सत्ता, मत्ता आणि 'थैैल्यां'चे पाठबळ दोन्ही बाजूला असताना शिवसेनेने एकाकी लढत दिली असेही ठाकरे यांनी नमूद केले.