शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

जनतेने कोणालाच बहुमत दिले नाही याचे दुःखच - उद्धव ठाकरे

By admin | Updated: October 20, 2014 09:42 IST

महाराष्ट्रातील जनतेने यंदाही कोणालाच बहुमत दिले नाही, या निकालामुळे जनता खूश आहे का ? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २० - महाराष्ट्रातील जनतेने यंदाही कोणालाच बहुमत दिले नाही,  जनताजनार्दाला आम्ही दोष देणार नाही, मात्र विधानसभेच्या निकालामुळे जनता खूश आहे का ? असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्र पुन्हा अराजकता आणि अस्थिरतेच्या झोक्यावर गटांगळ्या खात आहे अशी भिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.  

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण केले आहे. युती तुटल्याचा सर्वाधिक फायदा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला झाला असून 'युती' कायम असती तर आघाडीच्या २५ जागाही आल्या नसत्या असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.  एकीककडे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्व सत्ता विरोधात होती तर दुसरीकडे काँग्रेस - राष्ट्रवादीचे सत्ताधारी आमच्या विरोधात उतरली. सत्ता, मत्ता आणि 'थैैल्यां'चे पाठबळ दोन्ही बाजूला असताना शिवसेनेने एकाकी लढत दिली असेही ठाकरे यांनी नमूद केले.