शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
3
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
4
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
5
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
6
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
7
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
8
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
9
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
10
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
11
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
12
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
13
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
14
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
15
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
16
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
17
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
18
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
19
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
20
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम

सदानंदाचा येळकोट... येळकोट...येळकोट जय मल्हार....!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 19:37 IST

सदानंदाचा येळकोट , येळकोट ,येळकोट ,,जयमल्हार ,,,असा जयघोष करीत राज्याच्या विविध भागातून आलेल्या भाविकांनी भंडाऱ्याची मुक्तहस्ताने उधळण केली.

ठळक मुद्देसोमवती यात्रेनिमित्त दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन

जेजुरी ,दि. ३  (बी. एम. काळे ) अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या सोमवती यात्रेनिमित्त दोन लाख भाविकांनी गर्दी केली होती. सदानंदाचा येळकोट , येळकोट ,येळकोट ,,जयमल्हार ,,,असा जयघोष करीत राज्याच्या विविध भागातून आलेल्या भाविकांनी भंडाऱ्याची मुक्तहस्ताने उधळण केली. देवदर्शन, कऱ्हा स्नानाची पर्वणी तळीभंडार ,जागरण गोंधळ आदी कुलधर्म कुलाचार पूजन उरकून अमावास्येचा वारी पूर्ण केली.सोमवारी अमावस्या असेल त्या दिवसाला सोमवती यात्रा भरते, यादिवशी अमावस्या पर्वकाळात खंडेरायाच्या उत्सवमूर्ती पालखी सोहळ्याद्वारे गडकोटातून क-हा नदीतीरावर नेल्या जातात. राज्याच्या विविध प्रांतातून आलेले भाविक आणि समस्त जेजुरीकर खादेकरी ,मानकरी ,पुजारी ,सेवेकरी यांच्या वतीने उत्सवमूर्तींना विधिवत अभिषेक स्नान घालण्यात येते. यंदा सोमवारी (दि. ३ ) दुपारी १२ वाजेपर्यंतच अमावास्येचा पुण्यकाळ असल्याने सकाळी ८ वाजता मुख्य वतनदार इनामदार पेशवे यांनी आदेश देताच भाविकांनी केलेल्या भंडाऱ्याच्या उधळणीत गडकोट आवारातून पालखी सोहळ्याने प्रस्थान ठेवले. देवसंस्थानच्या वतीने बंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी देण्यात आली .यावेळी मुख्य विश्वस्त शिवराज झगडे ,विश्वस्त राजकुमार लोढा ,संदीप जगताप ,पंकज निकुडे पाटील ,अड. अशोकराव संकपाळ ,तुषार सहाणे ,व्यवस्थापक राजेंद्र जगताप ,ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष गंणेश आगलावे ,नित्य वारकरी ,कृष्णा कुदळे , सोमनाथ उबाळे ,शहरातील अठरा पगड जातीधर्मातील मानकरी खांदेकरी ,पुजारी ,सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .पालखी सोहळ्यापुढे घडशी समाजबांधवांचा सनईचा मंगलमय सूर ,,छत्र चामरे ,अब्दागिरी ,मानाचा अश्व ... आदींच्या साथीने पालखी सोहळा मल्हार गौतमीश्वर मंदिरात पोहोचला. मुख्य शहरातील जामा मस्जिद येथे मुस्लिम समाजबांधव पानसरे यांच्या पानांचे विड्याचा मान स्विकारुन धालेवाडीमार्गे क-हानदीतीराकडे मार्गस्थ झाला. दुपारचे साडेअकराच्या सुमारास रंभाई शिंपिन कट्टा -पापनाश तीर्थावर खंडोबा -म्हाळसादेवी उत्सव मूर्तींना विधीवत दही -दूध घालत स्नान घालण्यात आले ,यंदा भीषण दुष्काळामुळे क-हा नदीचे पात्र पूर्णतः कोरडे पडल्याने देवसंस्थानचे वतीने श्रीच्या व भाविकांच्या स्नानासाठी दोन टँकर ठेवण्यात आले होते . स्नान धार्मिक विधी उरकल्यानंतर पालखी सोहळा धालेवाडी गावात दुपारी ४वाजेपर्यंत स्थिरावला .त्यानंतर फुलाई माळीण कट्टा ,जानाईदेवी कट्टा ,येथे मान पान देत घेत सायंकाळी उशिरा पालखी सोहळा गडकोटात दाखल झाला .रोजमुरा वाटप होऊन सोहळ्याची सांगता झाली .सहा.पोलीस निरीक्षक अंकुश माने ,रामदास शेळके ,गणेश पिंगुवाले यांचे मार्गदर्शनाखाली सुमारे १५०पोलीस कर्मचारी वर्ग बंदोबस्तासाठी ठेवण्यात आला होता .देवसंस्थानच्या वतीने भाविक, खांदेकरी मानकरी यांचेसाठी थंड पाणी बाटली ,अल्पोपहार उपलब्ध करून दिला रखरखत्या उन्हात पाय भाजू नयेत म्हणून पायमोजे वाटप करण्यात आले होते .यंदाच्या सोमवती उत्सवावर भीषण दुष्काळाचे सावट दिसून येत होते , राज्याच्या विविध प्रांतातून आलेला भाविक पाऊस पडू दे ,,दुष्काळ हटू दे ,,,,असे साकडे खंडेरायाला घालत होता .परिवहन मंडळाने जादा बस ठेवल्या होत्या .हार फुले ,भंडारा खोबरे , देवाची प्रतिके, टाक यांची मोठी उलाढाल झाली .

टॅग्स :JejuriजेजुरीKhandoba Yatraखंडोबा यात्रा