शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

“श्रीकृष्णरुपी देवेंद्र फडणवीसांच्या मदतीने कंस मामाला गाडल्याशिवाय राहणार नाही”

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 13:53 IST

शरद पवार यांना कधीही शेतकऱ्यांचा जाणता राजा मुळीच म्हणणार नाही, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.

पंढरपूर: गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. यातच आता रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर टीका केली आहे. यावेळी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाष्य करताना, होय राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री म्हणून येणार आहेत. यावर आमचा ठाम विश्वास आहे. पण आम्हाला आता वेगळे देवेंद्र फडणवीस बघायचे आहे, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. 

देवेंद्र फडणवीस तुम्ही राज्यात पुन्हा येणार आहात. त्यावेळी मात्र बारामतीच्या गड्यांना आत घेवू नका, असे आवाहन सदाभाऊ खोत यांनी यावेळी केले. उजनीतून बारामतीला एक थेंब ही पाणी जाऊ देणार नाही. पालकमंत्र्यांनी‌ कंस मामाची भूमिका घेऊ नये अन्यथा श्रीकृष्ण रूपी देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने कंस मामाला आम्ही गाडल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला.

शरद पवारांना मी शेतकऱ्यांचा जाणता राजा मुळीच म्हणणार नाही

दुसऱ्या एका कार्यक्रमानंतर मीडियाशी बोलताना, शरद पवार यांना कधीही शेतकऱ्यांचा जाणता राजा मुळीच म्हणणार नाही. राज्यात सहकारी चळवळीचे श्राद्ध घालण्याचे काम बारामतीकरांनी केले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकांसह सहकारी संस्था यांनी संपुष्टात आणल्या. शेतकरी उभा करण्याचे काम केले नाही. शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यांचा प्रपंच मातीत मिळसला, अशी घणाघाती टीका सदाभाऊ खोत यांनी केले. 

दरम्यान, शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने तुळजापूर दौऱ्यावर गेलेल्या माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी अभिनेत्री केतकी चितळे हिची पाठराखण केली होती. सदाभाऊ खोत यांनी केलेल्या या समर्थनानंतर सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्या अंगावर धावून गेले. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अचानक अंगावर आल्याने सदाभाऊ आणि सोबतचे कार्यकर्ते भेदरून गेले. मी केतकीच्या पोस्टचे समर्थन केले नाही. केतकी न्यायालयात खंबीरपणे उभी राहिली याबद्दल मी बोललो, असे सदाभाऊ सांगू लागले. सुरक्षारक्षक आणि पोलिसांनी प्रसंगावधान राखून कार्यकर्त्यांची समजूत काढली. 

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी