शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

पदक गेल्याचे दु:ख, पण हार मानणार नाही : अर्चना आढाव

By admin | Updated: July 11, 2017 02:20 IST

नकळत झालेल्या चुकीमुळे मला आशियाई स्तरावरील स्पर्धेत जिंकलेले सुवर्णपदक गमवावे लागले

शिवाजी गोरे । लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : नकळत झालेल्या चुकीमुळे मला आशियाई स्तरावरील स्पर्धेत जिंकलेले सुवर्णपदक गमवावे लागले, याचे नक्कीच दु:ख आहे. पण पुढील राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत हार न मानता याचा वचपा मी नक्कीच घेणार असल्याचे पदक गमवावे लागलेल्या पुण्याच्या (मूळची दानापूर, तालुका तेल्हार, जि. अकोला) अर्चना आढावने ‘लोकमत’ला सांगितले. भुवनेश्वर येथे संपलेल्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत अर्चनाने सुवर्णपदक जिंकले होते. पण हा आनंद तिला काही काळच साजरा करता आला. तांत्रिक समितीने श्रीलंकेच्या धावपटूला शेवटच्या २५ मीटरमध्ये असताना हाताचा धक्का लावून अडथळा आणल्याबद्दल तिला दोषी ठरवून पदक काढून घेतले. रविवारी स्पर्धा संपल्यानंतर अर्चना आपले मार्गदर्शक डॉ. निकोलाय यांच्यासह प्रशिक्षण शिबिरासाठी धर्मशाला येथे सोमवारी पोहोचली, तेव्हा तिच्याबरोबर संपर्क साधला असता तिने वरील वक्तव्य केले. ती म्हणाली, ‘‘संपूर्ण अ‍ॅथलेटिक्स जगताचे लक्ष आमच्या शर्यतीकडे होते, कारण या शर्यतीत पी. टी. उषाची खास धावपटू टिंटू लुका पळणार होती. त्यामुळे शर्यतीच्या सुरुवातीपासून मी मनाचा निश्चय केला होता, की आपण या शर्यतीत चांगली कामगिरी करून पदक जिंकायचे एवढेच होते. शर्यत सुरू झाली तेव्हा आम्ही पहिले १०० मीटर संपल्यावर काही अंतर बरोबरीनेच पळत होते. या वेळी टिंटू पहिल्या क्रमांकावर होती. टिंटूने ही आघाडी पहिल्या चारशे मीटरपर्यंत राखली होती. पण नंतर ती मागे पडली. पहिले पाचशे मीटर झाले तेव्हा मी तिसऱ्या क्रमांकावर होते. त्या वेळी श्रीलंकेची धावपटू पहिली होती. पहिल्या चारशे मीटर आम्ही एक मिनिटात पूर्ण केले होते. शर्यत खूप फास्ट होत होती. शेवटचे शंभर मीटर राहिले असताना श्रीलंकेच्या दोघी आणि मी बरोबरीनेच पळत होतो. शेवटचे २५ मीटर राहिले असताना श्रीलंकेच्या धावपटूचा पायाचा थोडा धक्का माझ्या पायाला लागला. तेव्हा माझा तोल जाईल की काय, असे मला वाटत होते. पण मी स्वत:ला सांभाळण्याच्या बडबडीत माझ्या हाताचा धक्का श्रीलंकेच्या धावपटूला लागला. तेवढा मला एवढे काही वाटले नाही, की यावरून पदक जाईल म्हणून. माझ्याकडून ही चूक काही मुद्दाम केली गेलेली नाही. एवढ्या मोठ्या स्पर्धेत धावायचे म्हणजे तेसुद्धा लेनमध्ये नाही, तेव्हा असे काही होतेच.’’ पण, हासुद्धा मला एक धडा आहे. आपण जेव्हा पळतो तेव्हा अशा चुकासुद्धा चुकून आपल्याकडून होऊ शकतात, हे माझ्या चांगलेच लक्षात ठेवावे लागणार आहे. पण याचा वचपा मी नक्कीच पुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये घेणार, असे विश्वासाने अर्चनाने म्हणाली. टिंटूलाने शर्यत मध्येच सोडून दिली, म्हणजेच तिला असे वाटले असावे, की या धावपटूंच्याबरोबर आपली डाळ शिजणार नाही, त्यामुळे तिने मध्ये शर्यत सोडून दिली. माझे मार्गदर्शक डॉ. निकोलाय यांना अजिबात दु:ख झाले नाही. उलट ते म्हणाले, की माझ्या दृष्टीने तूच सुवर्णपदकविजेती आहेस. शर्यतीत तांत्रिक कारणावरून तुझे पदक काढून घेतले गेले आहे. पण तू पहिलीच आहेस ना. तू दिलेली वेळसुद्धा चांगलीच आहे. आपण राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत याचा वचपा काढू. त्यामुळे आम्ही लगेच धर्मशाला येथे प्रशिक्षण शिबिरासाठी आलो आहोत. पदक गेल्याचे दु:ख मनात ठेवू नकोस. आत्मविश्वासाने पराभवाला सामोरे जाण्याची तयारी ठेव. - अर्चना आढाव