शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
3
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
4
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
5
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
6
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
7
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
8
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
9
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
10
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
11
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
12
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
13
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
14
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
15
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
16
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
17
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
18
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
19
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
20
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पदक गेल्याचे दु:ख, पण हार मानणार नाही : अर्चना आढाव

By admin | Updated: July 11, 2017 02:20 IST

नकळत झालेल्या चुकीमुळे मला आशियाई स्तरावरील स्पर्धेत जिंकलेले सुवर्णपदक गमवावे लागले

शिवाजी गोरे । लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : नकळत झालेल्या चुकीमुळे मला आशियाई स्तरावरील स्पर्धेत जिंकलेले सुवर्णपदक गमवावे लागले, याचे नक्कीच दु:ख आहे. पण पुढील राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत हार न मानता याचा वचपा मी नक्कीच घेणार असल्याचे पदक गमवावे लागलेल्या पुण्याच्या (मूळची दानापूर, तालुका तेल्हार, जि. अकोला) अर्चना आढावने ‘लोकमत’ला सांगितले. भुवनेश्वर येथे संपलेल्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत अर्चनाने सुवर्णपदक जिंकले होते. पण हा आनंद तिला काही काळच साजरा करता आला. तांत्रिक समितीने श्रीलंकेच्या धावपटूला शेवटच्या २५ मीटरमध्ये असताना हाताचा धक्का लावून अडथळा आणल्याबद्दल तिला दोषी ठरवून पदक काढून घेतले. रविवारी स्पर्धा संपल्यानंतर अर्चना आपले मार्गदर्शक डॉ. निकोलाय यांच्यासह प्रशिक्षण शिबिरासाठी धर्मशाला येथे सोमवारी पोहोचली, तेव्हा तिच्याबरोबर संपर्क साधला असता तिने वरील वक्तव्य केले. ती म्हणाली, ‘‘संपूर्ण अ‍ॅथलेटिक्स जगताचे लक्ष आमच्या शर्यतीकडे होते, कारण या शर्यतीत पी. टी. उषाची खास धावपटू टिंटू लुका पळणार होती. त्यामुळे शर्यतीच्या सुरुवातीपासून मी मनाचा निश्चय केला होता, की आपण या शर्यतीत चांगली कामगिरी करून पदक जिंकायचे एवढेच होते. शर्यत सुरू झाली तेव्हा आम्ही पहिले १०० मीटर संपल्यावर काही अंतर बरोबरीनेच पळत होते. या वेळी टिंटू पहिल्या क्रमांकावर होती. टिंटूने ही आघाडी पहिल्या चारशे मीटरपर्यंत राखली होती. पण नंतर ती मागे पडली. पहिले पाचशे मीटर झाले तेव्हा मी तिसऱ्या क्रमांकावर होते. त्या वेळी श्रीलंकेची धावपटू पहिली होती. पहिल्या चारशे मीटर आम्ही एक मिनिटात पूर्ण केले होते. शर्यत खूप फास्ट होत होती. शेवटचे शंभर मीटर राहिले असताना श्रीलंकेच्या दोघी आणि मी बरोबरीनेच पळत होतो. शेवटचे २५ मीटर राहिले असताना श्रीलंकेच्या धावपटूचा पायाचा थोडा धक्का माझ्या पायाला लागला. तेव्हा माझा तोल जाईल की काय, असे मला वाटत होते. पण मी स्वत:ला सांभाळण्याच्या बडबडीत माझ्या हाताचा धक्का श्रीलंकेच्या धावपटूला लागला. तेवढा मला एवढे काही वाटले नाही, की यावरून पदक जाईल म्हणून. माझ्याकडून ही चूक काही मुद्दाम केली गेलेली नाही. एवढ्या मोठ्या स्पर्धेत धावायचे म्हणजे तेसुद्धा लेनमध्ये नाही, तेव्हा असे काही होतेच.’’ पण, हासुद्धा मला एक धडा आहे. आपण जेव्हा पळतो तेव्हा अशा चुकासुद्धा चुकून आपल्याकडून होऊ शकतात, हे माझ्या चांगलेच लक्षात ठेवावे लागणार आहे. पण याचा वचपा मी नक्कीच पुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये घेणार, असे विश्वासाने अर्चनाने म्हणाली. टिंटूलाने शर्यत मध्येच सोडून दिली, म्हणजेच तिला असे वाटले असावे, की या धावपटूंच्याबरोबर आपली डाळ शिजणार नाही, त्यामुळे तिने मध्ये शर्यत सोडून दिली. माझे मार्गदर्शक डॉ. निकोलाय यांना अजिबात दु:ख झाले नाही. उलट ते म्हणाले, की माझ्या दृष्टीने तूच सुवर्णपदकविजेती आहेस. शर्यतीत तांत्रिक कारणावरून तुझे पदक काढून घेतले गेले आहे. पण तू पहिलीच आहेस ना. तू दिलेली वेळसुद्धा चांगलीच आहे. आपण राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत याचा वचपा काढू. त्यामुळे आम्ही लगेच धर्मशाला येथे प्रशिक्षण शिबिरासाठी आलो आहोत. पदक गेल्याचे दु:ख मनात ठेवू नकोस. आत्मविश्वासाने पराभवाला सामोरे जाण्याची तयारी ठेव. - अर्चना आढाव