शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

राममंदिर आंदोलनातील बलिदाने चोर-लफंग्यांची होती ? - उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल

By admin | Updated: April 14, 2016 09:25 IST

राममंदिर हा भाजपसाठी राजकारणाचा मुद्दा नाही’ हा विचार आता चमकला असेल तर राममंदिराचे तेव्हाचे आंदोलन व त्यातील बलिदाने काय चोर-लफंग्यांची होती? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. १४ - ‘राममंदिर हा भाजपसाठी राजकारणाचा मुद्दा नाही’ हा विचार आता चमकला असेल तर राममंदिराचे तेव्हाचे आंदोलन व त्यातील बलिदाने काय चोर-लफंग्यांची होती? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून विचारला आहे. ज्या अयोध्या आंदोलनाचे नेतृत्व भाजपने केले, अयोध्या यात्रेवर स्वार होऊन देशातला माहोल गरमागरम झाला. रामभक्तांच्या, करसेवकांच्या रक्ताने शरयू लाल झाली ते सर्व काय होते?  भाजपने आता त्या सर्व करसेवकांची व अयोध्येतील बलिदाने झालेल्या रामभक्तांची माफी मागायला हवी असंही उद्धव ठाकरे बोलले आहेत.
 
आश्‍वासने द्यायची व कृती करायची नाही असा निर्धार आमच्या सत्तेतील मित्रवर्यांनी केलेला दिसतोय. ज्या मुद्यांसाठी रान पेटवायचे तेच मुद्दे सत्तेवर येताच अडगळीत टाकून शांत बसायचे असेच एकंदरीत धोरण दिसते. सत्तेवर येताच प्रखर राष्ट्रवादाचे किंवा हिंदुत्वाचे हे सर्व मुद्दे वादग्रस्त मानून बाजूला ठेवायचे. हेच आता राममंदिराच्या बाबतीत घडत असल्याची खंत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे. अयोध्येत कालपर्यंत श्रीरामाची आरती, भजन म्हणणारे अचानक रामाच्या गर्भगृहात जणू नमाज पढू लागले किंवा भानगडी नकोत म्हणून कालच्या रामभक्तांनी प्रभू श्रीरामाचे धर्मांतर करून स्वत:च्या मागचा ससेमिरा सोडवून टाकला. भाजपने राममंदिराचे राजकारण कधीच केले नाही ही थाप आहे की विनोद याचा खुलासा आता व्हायलाच हवा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे.
 
कश्मीरात ३७० कलमाची नाडी मेहबुबा मुफ्तीने सोडलीच आहे. समान नागरी कायद्याचेही बारा वाजवले आहेतच. आता रामाचे धर्मांतर करून नमाज पढण्याचेच काम सुरू झाले आहे. राममंदिर हा राजकीय मुद्दा नसल्याचे सांगून शरयूत समाधी घेतलेल्या रामभक्तांचीही जणू सुन्ता करून टाकली! हे धक्कादायक असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हंटलं आहे. 
 
बहुमत असते तर राममंदिराआधी ‘जीएसटी’ मंजूर केले असते, असेही भाजप नेत्यांनी जाहीर केले. राममंदिरासाठी भाजपला ३८० खासदारांचे बळ हवे, अशी भूमिका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीच मध्यंतरी मांडली होती. आज भाजपला लोकसभेत संपूर्ण बहुमत आहे व प्रभू श्रीरामाच्या अयोध्या भूमीतून ७५ खासदारांचे बळ मिळाले. भाजप फक्त दोन खासदारांतून आताच्या राजकीय शिखरावर पोहोचला तो फक्त राममंदिराच्या प्रश्‍नावर. अयोध्येत राममंदिर उभे करू हे वचन भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात अनेकदा दिले. ते नक्की काय होते? राजकारणात व निवडणूक प्रचारात दिल्या-घेतल्या आश्‍वासनांकडे गांभीर्याने पाहायचे नसते हे मान्य केले तरी या रांगेत प्रभू श्रीरामास उभे करणे म्हणजे हिंदुत्वाचा पराभव आहे. प्रभू श्रीरामाचे मंदिर अयोध्येत निर्माण करणे हे राष्ट्रीय कार्य आहे व त्यासाठी पाकिस्तान किंवा ओबामांची परवानगी घेण्याची गरज नाही अशी खरमरीत टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.
 
राममंदिर हा फक्त आस्थेचा विषय असेल तर मग राममंदिराच्या नावे आतापर्यंत सांडलेल्या रक्ताशी आपले अजिबात नाते नसून हिंदुत्व आणि राममंदिराच्या बाबतीत आमच्या धमन्यांतून आता दुसरेच रक्त उसळत आहे, याची कबुली द्यावी लागेल. उत्तर प्रदेशच्या निवडणुका येनकेनप्रकारे जिंकायच्याच आहेत हे खरे, पण त्यासाठी प्रभू श्रीरामाची कबर खणायचे प्रयोजन काय? अयोध्येत बाबरी नामक पडक्या वास्तूचे घुमट कोसळताच ‘‘आम्ही नाही त्यातले, हे आमचे कामच नाही. बाबरी पाडण्याचे काम बहुधा शिवसैनिकांनी केले असेल,’’ अशी पळपुटी भूमिका तेव्हा भाजपने घेताच शिवसेनाप्रमुख हिंदुत्वाच्या अभिमानाने कडाडले होते, ‘‘होय, बाबरी पाडणारे माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे!’’ आम्ही आजही आमच्या भूमिकेवर ठाम असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हंटलं आहे.