शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

‘सा. रें.’च्या जाण्याने चळवळीचा मार्गदर्शक हरपला

By admin | Updated: April 2, 2015 00:36 IST

कार्यकर्त्यांची भावना : सांगलीशी जुळले होते ऋणानुबंध, विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते झाले सुन्न

सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील दत्त शेतकरी सहकारी साखर कारख्यान्याचे संस्थापक आणि काँग्रेसचे आमदार आणि विचारांनी ‘तरुण’ असलेले सा. रे. ऊर्फ आप्पासाहेब पाटील पुरोगामी विचारांशी इतके समरस झाले होते की, त्यांना पक्षाचे बंधन आड आले नाही. आज (बुधवारी) सकाळी ‘सा. रे.’ यांचे निधन झाल्याचे वृत्त आले आणि सांगलीमधील चळवळीतील कार्यकर्ते अक्षरश: सुन्न झाले. शांतिनिकेतनशी त्यांचे स्नेहबंध जुळले असल्याने तेथेही शांतता होती. शांतिनिकेतन लोकविद्यापीठ आणि सा. रे. पाटील यांचा ऋणानुबंध अतिशय दृढ होता. शांतिनिकेतनच्या नवभारत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष म्हणून ते कित्येक वर्षापासून जबाबदारी सांभाळत होते. वर्षातून कमीत कमी दोन वेळा तरी वयाची पर्वा न करता ते शांतिनिकेतनमधील बैठकीस हजर असत. शांतिनिकेतनमध्ये कोणताही महत्त्वाचा कार्यक्रम असेल, तर ‘सा. रें.’ची उपस्थिती हमखास असायचीच. प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांच्याशी त्यांचा विशेष स्नेह. शांतिनिकेतनमध्ये कोणताही नवीन उपक्रम राबवायचा म्हटले की, पहिला निरोप हा ‘सा. रें.’ना असायचा. तेथे १६ जानेवारी २०१५ रोजी पंचायतराज स्मृती उद्यानाच्या उद्घाटन समारंभास ते ९४ व्या वर्षीही हजर होते. आज सकाळी सा. रे. पाटील यांचे निधन झाल्याचे कळताच शांतिनिकेतनमधील प्रत्येक कर्मचारी आणि शिक्षकांच्या चेहऱ्यावर दु:खाची छटा दिसत होती. शांतिनिकेतनचा आधार असलेल्या सरोजमाई, त्यानंतर पी. बी. सर, नंतर आर. आर. पाटील आबा आणि आता सा. रे. पाटील गेल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्यावतीने १९९३ मध्ये चळवळीतील कार्यकर्त्यांचे मुखपत्र म्हणून ‘अंधश्रध्दा निर्मूलन वार्तापत्र’ काढण्याचे निश्चित झाले. परंतु नेहमीप्रमाणे कार्यकर्त्यांपुढे पैशाची अडचण उभी राहिली. त्यावेळी सर्वजण सा. रे. पाटील यांच्याकडे गेले होते. त्यांना वस्तुस्थितीची कल्पना देताच, समाजातील अंधश्रध्दा दूर होण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करण्याची कृतिशील ग्वाही त्यांनी दिली होती. ‘अंनिस’तर्फे शहरात आयोजित केलेल्या ‘वैज्ञानिक जाणिवा’ या शिबिराच्या उद्घाटनास ते आवर्जून आले होते. अंनिसतर्फे, दत्त कारखान्याच्या मागील बाजूस असलेल्या खंजीरे मळा येथील मांत्रिकाचा पर्दाफाश केला होता. त्यावेळी स्थानिक राजकारणामुळे बाका प्रसंग निर्माण झाला होता. त्यावेळी सा. रे. पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले होते, अशी आठवण अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे डॉ. प्रदीप पाटील यांनी सांगितली. (प्रतिनिधी) नवभारत शिक्षण मंडळाच्या जडणघडणीत प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील सरांसमवेत माजी आमदार डॉ. सा. रे. पाटील यांचा महत्त्वाचा वाटा होता. अनेक विकास कामात तसेच नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात त्यांचे मार्गदर्शन आम्हाला नेहमी मिळत असे. - गौतम पाटील, संचालक, नवभारत शिक्षण मंडळ, आठवणींमधून उतरले सा. रे. महाराष्ट्रातील सामाजिक संघटनांनी एकत्र यावे म्हणून सांगली येथे चित्रपट अभिनेते नंदू माधव यांच्या संकल्पनेतून ‘सांगड’ या उपक्रमाचे २०१३ मध्ये आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सा. रे. पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केल्याची आठवण अ‍ॅड. अमित शिंदे यांनी सांगितली. पत्रकार दीनानाथ भोसले हे त्यावेळी सांगलीत दोन दैनिके चालवत होते. ते समाजवादी विचाराचे असल्याने त्यांचे व सा. रे. पाटील यांचे मित्रत्वाचे संबंध होते. याच मित्रत्वातून सांगलीत विविध राजकीय विचारांच्या लोकांचा एक गट निर्माण झाला. अण्णासाहेब कराळे यांच्या कट्ट्यावर त्यांचा गप्पांचा फड रंगत असे. सांगली जिल्हा सुधार समितीच्यावतीने सांगलीत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या व्याख्यानाचे नियोजन नुकतेच केले होते. ही कल्पना सा. रे. पाटील यांना समजताच त्यांनी स्वत:हून कार्यक्रमासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला होता. मिरज येथील आय. एम. ए. सभागृहात सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव सा. रे. पाटील यांच्याहस्ते फेब्रुवारी २०१३ मध्ये करण्यात आला होता. त्यावेळी सा. रे. पाटील यांनी, धावपळीच्या युगात सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तीला स्थान नसल्याची खंत व्यक्त केली होती, असे राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते सदाशिव मगदूम यांनी यावेळी सांगितले. सा. रे. पाटील हे काँग्रेसचे आमदार असले तरीही, समाजवादी आणि पुरोगामी कार्यकर्त्यांबरोबर त्यांचा विशेष स्नेह होता. रयत शिक्षण संस्थेशी देखील त्यांचा ऋणानुबंध होता. वेळोवेळी त्यांनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले असल्याचे रयत शिक्षण संस्था समितीचे प्रतिनिधी अ‍ॅड. अजित सूर्यवंशी यांनी सांगितले.