शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

राज्यातील ग्रामीण रुग्णालयांना मिळणार ५०० रुग्णवाहिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2020 05:46 IST

ठाणे जिल्ह्याला मोठा फायदा : ८९.४९ कोटींची तरतूद

नारायण जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचे नादुरुस्त रुग्णवाहिकांमुळे अनेकदा वाभाडे निघाले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यभरातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालयांसह जिल्हा रुग्णालयांसाठी प्रत्येकीएक प्रमाणे नव्या ५०० रुग्णवाहिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. याचा सर्वात मोठा फायदा ठाणे जिल्ह्याला होणार आहे.

सध्या राज्यातील ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा केंद्राकडून मिळालेल्या रुग्णवाहिका वापरत आहे. मात्र, या रुग्णवाहिका जुन्या असून काही नादुरुस्त आहेत. तर ज्या काही चालू स्थितीत आहेत, त्यातील अनेक रुग्णवाहिका मध्येच रस्त्यात बंद पडण्याचे प्रकार घडून रुग्ण दगावण्याचे प्रकार घडले आहेत.याशिवाय राज्यात खासगी संस्थेकडून चालविण्यात येणाऱ्या १०२ क्रमांकाच्या रुग्णवाहिकांचा अनागोंदी कारभारही चव्हाट्यावर आला आहे. मार्चमध्ये अर्थसंकल्प सादर करतेवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात १०२ क्रमांकाच्या रुग्णवाहिका बदलून नव्याने ५०० रुग्णवाहिका खरेदीसाठी ८७ कोटींच्या तरतुदीची घोषणा केली होती. त्यानुसार आरोग्य विभागाने या ५०० रुग्णवाहिकांच्या खरेदीसाठी ८९ कोटी ४९ लाख ७० हजार रुपये खर्च करण्यास गेल्या आठवड्यात मान्यता दिली आहे.अशी आहे खरेदीची मान्यताजिल्हा परिषदांच्या २५३ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी ४५ कोटी २८ लाख चार हजार २२० रुपये तर सार्वजनिक विभागाच्या मालकीच्या १३७ ग्रामीण रुग्णालयांसाठी २४ कोटी ५१ लाख ९४ हजार ३८० रुपये, १०६ जिल्हा/ उपजिल्हा रुग्णालयांसाठी १८ कोटी ८७ लाख १२ हजार ४४० रुपये आणि चार मनोरुग्णालयांसाठी ७१ लाख ५८ हजार ४९० रुपये असे एकूण ८९ कोटी ४९ लाख ७० हजार रुपये खर्च करण्यास मान्यता दिली आहे.३८ रुग्णवाहिका मिळण्याची आशाठाणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रांसह एक जिल्हा रुग्णालय आणि उल्हासनगर, मुरबाड, शहापूर येथील उपजिल्हा/ग्रामीण रुग्णालयासह ठाण्याचे मनोरुग्णालय अशा ३८ रुग्णवाहिका मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल