शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

राज्यातील ग्रामीण रुग्णालयांना मिळणार ५०० रुग्णवाहिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2020 05:46 IST

ठाणे जिल्ह्याला मोठा फायदा : ८९.४९ कोटींची तरतूद

नारायण जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचे नादुरुस्त रुग्णवाहिकांमुळे अनेकदा वाभाडे निघाले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यभरातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालयांसह जिल्हा रुग्णालयांसाठी प्रत्येकीएक प्रमाणे नव्या ५०० रुग्णवाहिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. याचा सर्वात मोठा फायदा ठाणे जिल्ह्याला होणार आहे.

सध्या राज्यातील ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा केंद्राकडून मिळालेल्या रुग्णवाहिका वापरत आहे. मात्र, या रुग्णवाहिका जुन्या असून काही नादुरुस्त आहेत. तर ज्या काही चालू स्थितीत आहेत, त्यातील अनेक रुग्णवाहिका मध्येच रस्त्यात बंद पडण्याचे प्रकार घडून रुग्ण दगावण्याचे प्रकार घडले आहेत.याशिवाय राज्यात खासगी संस्थेकडून चालविण्यात येणाऱ्या १०२ क्रमांकाच्या रुग्णवाहिकांचा अनागोंदी कारभारही चव्हाट्यावर आला आहे. मार्चमध्ये अर्थसंकल्प सादर करतेवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात १०२ क्रमांकाच्या रुग्णवाहिका बदलून नव्याने ५०० रुग्णवाहिका खरेदीसाठी ८७ कोटींच्या तरतुदीची घोषणा केली होती. त्यानुसार आरोग्य विभागाने या ५०० रुग्णवाहिकांच्या खरेदीसाठी ८९ कोटी ४९ लाख ७० हजार रुपये खर्च करण्यास गेल्या आठवड्यात मान्यता दिली आहे.अशी आहे खरेदीची मान्यताजिल्हा परिषदांच्या २५३ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी ४५ कोटी २८ लाख चार हजार २२० रुपये तर सार्वजनिक विभागाच्या मालकीच्या १३७ ग्रामीण रुग्णालयांसाठी २४ कोटी ५१ लाख ९४ हजार ३८० रुपये, १०६ जिल्हा/ उपजिल्हा रुग्णालयांसाठी १८ कोटी ८७ लाख १२ हजार ४४० रुपये आणि चार मनोरुग्णालयांसाठी ७१ लाख ५८ हजार ४९० रुपये असे एकूण ८९ कोटी ४९ लाख ७० हजार रुपये खर्च करण्यास मान्यता दिली आहे.३८ रुग्णवाहिका मिळण्याची आशाठाणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रांसह एक जिल्हा रुग्णालय आणि उल्हासनगर, मुरबाड, शहापूर येथील उपजिल्हा/ग्रामीण रुग्णालयासह ठाण्याचे मनोरुग्णालय अशा ३८ रुग्णवाहिका मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल