शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

धावत्या रेल्वेत ढेकूण, उंदरांचा उपद्र्रव

By admin | Updated: February 2, 2015 00:27 IST

प्रवासी हैराण : रेल्वे प्रशासनाचे स्वच्छतेबाबत दुर्लक्ष; आंदोलन उभारणार

मिरज : रेल्वे स्थानकांच्या स्वच्छतेकडे लक्ष देणाऱ्या रेल्वे प्रशासनाने रेल्वे गाड्यांतील सफाईकडे मात्र दुर्लक्ष केल्यामुळे धावत्या रेल्वेत ढेकूण व उंदीर प्रवाशांना हैराण करीत आहेत. स्वच्छतेचा ठेका खासगी ठेकेदारांकडे सोपविण्यात आल्यापासून रेल्वेच्या स्वच्छतेचा बोजवारा उडाल्यामुळे प्रवाशांना उपद्रव सहन करावा लागत आहे. याच्या निषेधार्थ रेल्वे प्रवासी संघटना आंदोलन उभारण्याच्या तयारीत आहेत.रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या अनेक एक्स्प्रेसमध्ये ढेकणांचा उपद्रव वाढला आहे. आरक्षित वातानुकूलित व सर्वसाधारण डब्यांची स्वच्छता व कीटकनाशकांवरील उपाययोजनांकडे दुर्लक्ष असल्याने रेल्वेचे डबे म्हणजे ढेकूण, उंदीर, झुरळ व कीटकांच्या आश्रयाचे ठिकाणच बनले आहेत. रेल्वेचे डबे दर तीन महिन्यांनी पेस्ट कंट्रोल करण्याचा नियम आहे. मात्र रेल्वे डब्यांच्या स्वच्छतेचे काम खासगी ठेकेदाराकडे सोपविण्यात आल्याने पेस्ट कंट्रोलचे काम वेळेवर होत नाही. रेल्वेच्या जुन्या डब्यांमधील आसनांमध्ये काथ्याचा वापर करण्यात आल्याने अशी आसन व्यवस्था ढेकणांसाठी आश्रयस्थान बनली आहे. कीटकनाशक फवारणीनंतरही या ढेकणांचे नियंत्रण होत नसल्याने प्रवासी ढेकणांसोबतच प्रवास करीत आहेत. जोधपूर-धनबाद या मिरजेतून जाणाऱ्या एक्स्प्रेसचे वातानुकूलित डबे ढेकणांसाठी बदनाम आहेत. जोधपूर एक्स्प्रेसच्या एका वातानुकूलित डब्यातील ढेकणांचे नियंत्रण होत नसल्याने दोन महिन्यांपूर्वी हा डबा बदलण्यात आला. वातानुकूलित डब्याप्रमाणे आरक्षित व सर्वसाधारण डब्यांमध्येही ढेकणांचा मुक्तसंचार आहे. मिरजेतून येणाऱ्या-जाणाऱ्या पॅसेंजर रेल्वेमधील प्रवासीही ढेकणांचा सामना करीत आहेत. तसेच रेल्वे प्रवासी सोबत खाद्यपदार्थ घेऊन प्रवास करीत असल्याने रेल्वे डब्यात उंदरांचाही सुळसुळाट वाढला आहे. मात्र तक्रार येईल तेथेच ढेकूण व उंदरांच्या नियंत्रणाची तात्पुरती उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र सर्वच रेल्वेगाड्यांत त्यांचा फैलाव होत आहे. लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांसाठी भोजन तयार करण्यासाठी असलेल्या पॅन्ट्री कारमधील अन्नपदार्थांच्या साठ्यामुळे उंदीर मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत.ढेकूण व उंदारामुळे प्रवासी त्रस्त झाल्याने काही जणांनी रेल्वे प्रवासाकडे पाठ फिरविली आहे. रेल्वेमध्ये औषध फवारणी करावी, अशीही मागणी प्रवासीकडून होत आहे. वातानुकूलित व आरक्षित डब्यांतील महागडे तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना ढेकूण व उंदीर चांगलाच मनस्ताप देत आहेत. (वार्ताहर)ढेकणांच्या त्रासामुळे रेल्वे रोखली...सहा महिन्यांपूर्वी अजमेर एक्स्प्रेसच्या वातानुकूलित डब्यात ढेकणांच्या त्रासामुळे प्रवाशांनी हुबळी स्थानकात ही एक्स्प्रेस रोखली होती. प्रवाशांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने अजमेर एक्स्प्रेसची वातानुकूलित बोगी बदलण्यात आली होती. गेल्या आठवड्यात सिद्धेश्वर एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका लोकप्रतिनिधीने ढेकणांच्या त्रासामुळे रेल्वे प्रवासच रद्द केल्याची घटना घडली.ठेकेदारांमध्ये समन्वयाचा अभावरेल्वेतील स्वच्छतेचे काम वेगवेगळ्या ठेकेदारांवर सोपविण्यात आले आहे. स्थानकातील स्वच्छतेचे काम एकाकडे, रेल्वेची फेरी पूर्ण झाल्यानंतर सर्व डबे धुऊन स्वच्छ करण्याचे दुसऱ्याकडे, तर धावत्या रेल्वेची स्वच्छता ठेकेदाराकडे आहे. ठेकेदारांची संख्या जास्त व त्यांच्यात समन्वय नसल्याने रेल्वेतील स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. रेल्वेत व रेल्वे स्थानकात अस्वच्छता करणाऱ्यांसाठी दंडाची रक्कम वाढविण्यात आली आहे. मात्र रेल्वेचे डबे स्वच्छ ठेवण्याबाबत मात्र रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे.