शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

शहरातून परप्रांतीय फेरीवाल्यांचा पळ

By admin | Updated: July 4, 2016 03:11 IST

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईमुळे रस्ते व पदपथ अडविणाऱ्या फेरीवाल्यांचे धाबे दणाणले आहे.

नवी मुंबई : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईमुळे रस्ते व पदपथ अडविणाऱ्या फेरीवाल्यांचे धाबे दणाणले आहे. आतापर्यंत आम्हाला कोणी हटवू शकत नाही, असे उघड बोलणाऱ्या अनेक परप्रांतीय व पालिका क्षेत्राबाहेरून येथे येणाऱ्या फेरीवाल्यांनी पळ काढला आहे.राजकीय व प्रशासकीय वरदहस्त लाभल्यामुळे नवी मुंबईमधील फेरीवाल्यांची संख्या प्रचंड वाढली होती. शहरातील सर्व प्रमुख रस्ते व पदपथ फेरीवाल्यांनी अडविले होते. वाशी सेक्टर ९, सानपाडा, नेरूळ रेल्वे स्टेशन परिसरातील पदपथ पूर्णपणे फेरीवाल्यांनी अडविले होते. तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच रस्ते व पदपथांवरील अतिक्रमण तत्काळ हटविण्याचे आदेश दिले. प्रत्येक विभागात धडक मोहिमा राबवून फेरीवाल्यांचे साहित्य जप्त करण्यास सुरवात केली. फेरीवाल्यांवर कारवाई यापूर्वीही व्हायची. परंतु त्यामध्ये कारवाईपेक्षा दिखावेगिरीच जास्त होती. विभाग अधिकारी कार्यालयातील काही कर्मचारी कारवाई होणार असल्याची माहिती द्यायचे. कारवाई करणारे पथक गेले की पुन्हा जैसे थे परिस्थिती होत होती. परंतु आयुक्तांनी स्वत: लक्ष देण्यास सुरवात केल्याने सातत्यपूर्ण कारवाई सुरू झाली आहे. महापालिकेची स्थापना झाल्यापासून सातत्याने व नि:ष्पक्षपणे कारवाई पहिल्यांदाच झाल्याने रस्ते पदपथावर अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. शहरातील फेरीवाल्यांची संख्या २५ हजारपेक्षा जास्त झाली असून यात परप्रांतीयांचा भरणा जास्त आहे. फेरीवाल्यांना नवी मुंबई हे सर्वात सुरक्षित शहर वाटू लागले होते. राजकीय पदाधिकाऱ्यांच्या व अधिकाऱ्यांच्या संगनमताने बिनधास्तपणे व्यवसाय करता येत होता. अनेक फेरीवाला संघटनांनीही फेरीवाले वाढविण्याचा व्यवसाय सुरू केला होता. मानखुर्द, गोवंडी व इतर ठिकाणावरून नवी मुंबईमध्ये येवून अनेक जण व्यवसाय करतात. आयुक्तांच्या कारवाईमुळे परप्रांतीय फेरीवाल्यांनी शहरातून पळ काढण्यास सुरवात केली आहे. जोपर्यंत मुंढे या शहरात आहेत तोपर्यंत अनधिकृत व्यापार करता येणार नाही. यामुळे काहींनी मुंबई, ठाणे व पनवेल परिसरात व्यवसाय करण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे, तर काही पुण्यात स्थलांतरित होत आहेत. >कोपरखैरणेमधील परिस्थिती जैसे थेमहापालिकेच्या कारवाईमुळे शहरातील रस्ते व पदपथावरील फेरीवाल्यांचे अतिक्रमण थांबले आहे. रस्ते मोकळे झाले आहेत. परंतु कोपरखैरणे सेक्टर १५ व १८ च्या मध्ये असलेल्या रोडवरील फेरीवाले मात्र जैसे थे आहेत. रविवारी रोडवर दोन्ही बाजूंना भाजी विक्रेते व इतर फेरीवाल्यांनी व्यवसाय सुरू केल्याने या रोडवर चक्काजाम झाले होते. नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली होती. महापालिकेचे अधिकारी येथील फेरीवाल्यांवर कडक कारवाई करत नाहीत. पालिकेचे पथक गेले की पुन्हा त्या ठिकाणी व्यवसाय सुरू होत असून आयुक्त तुकाराम मुंढे हा रस्ता फेरीवालामुक्त कधी करणार, असा प्रश्न विचारत आहेत. दबावाचे फोन बंद झाले महापालिकेच्या विभाग कार्यालयाच्यावतीने फेरीवाले व मार्जिनल स्पेसवर नियमित कारवाई केली जात होती. परंतु कारवाई सुरू झाली की राजकीय नेते, फेरीवाला संघटनांचे प्रतिनिधी यांच्याकडून दबाव आणला जात होता. ते आमच्या ओळखीचे आहेत, त्यांच्यावर कारवाई करू नका असे सांगितले जात होते. यामुळे कारवाई थांबवावी लागत होती. परंतु मुंढे आयुक्त झाल्यापासून दबावाचे सर्व फोन बंद झाले आहेत.