शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

नालेसफाईबाबत सत्ताधाऱ्यांचा पळ

By admin | Updated: May 19, 2016 05:02 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यंदा नालेसफाईची पाहणी करणार नसल्याची घोषणा केली आहे.

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यंदा नालेसफाईची पाहणी करणार नसल्याची घोषणा केली आहे. नालेसफाईच्या कामात १५० कोटींचा घोटाळा झाला असल्यामुळेच त्यांनी पाहणी दौरा न करण्याचा निर्णय घेतला. त्यांची ही भूमिका म्हणजे नालेसफाईच्या जबाबदारीतून पळ काढण्याचा प्रकार असल्याची टीका मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे. वर्षभरात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या नालेसफाईचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. पावसाळा १५ दिवसांवर आला असतानाही अद्याप नालेसफाईने वेग घेतला नसल्याचा आरोप करत, विरोधी बाकांवरील काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेना-भाजपाला लक्ष्य केले आहे, तर भाजपा नेते नालेसफाईवरून शिवसेनेवर शाब्दिक हल्ले चढवत आहेत. विरोधकांसह मित्रपक्ष भाजपानेही नालेसफाईवरून लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याने, शिवसेनेने नालेसफाईची सारी जबाबदारी प्रशासनावर ढकलली आहे. महापौर स्नेहल आंबेकर यांनी तर महापालिका आयुक्तांना पत्र लिहून नालेसफाईसाठी प्रशासनाला जबाबदार धरले. याबाबत निरुपम म्हणाले की, ‘पालिकेत शिवसेना-भाजपाची सत्ता आहे. त्यांनी मुंबईकरांना आश्वस्त करायला हवे, पण पाहणीच करणार नसल्याचे सांगत, उद्धव ठाकरे आपल्या जबाबदारीतून पळ काढत आहेत. पालिकेचा कारभार पाहता, या वर्षीही पाणी साचण्याची शक्यता आहे. पाणी साचल्याने मुंबईकरांना होणाऱ्या त्रासाला शिवसेनाच जबाबदार असेल, असे निरुपम म्हणाले. शिवसेना-भाजपाला मुंबईकरांची कामे करायची नसतील, तर त्यांनी सत्ता सोडून द्यावी. २० वर्षे सत्तेत असणारी भाजपा केवळ शिवसेनेवर आरोप करून आपले हात झटकत आहे. भाजपा सत्तेत राहून विरोधकाची भूमिका वठवू पाहत असल्याचे निरुपम यांनी सांगितले.