शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

एमएसआरडीसीला ६८९० कोटींचा तोटा

By admin | Updated: May 13, 2015 01:33 IST

पांढरा हत्ती बनलेल्या एमएसआरडीसीचा तोटा ६८९० कोटींच्या घरात गेला असून शासन दिरंगाईमुळे या महामंडळाला ५२६२ कोटींचे व्याज निष्कारण

अतुल कुलकर्णी, मुंबईपांढरा हत्ती बनलेल्या एमएसआरडीसीचा तोटा ६८९० कोटींच्या घरात गेला असून शासन दिरंगाईमुळे या महामंडळाला ५२६२ कोटींचे व्याज निष्कारण द्यावे लागले आहे. परिणामी महामंडळाची बाजारात पत उरलेली नाही.राज्य सरकारने या खात्याकडे असणाऱ्या अनेक योजनांना लाल झेंडा दाखवल्यामुळे या खात्याकडे कामच उरलेले नाही. अधिकारी, कर्मचारी एवढे निवांत आहेत की त्यांच्यात क्रिकेटचे सामने झाले! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतल्यानंतर अनेक विषय एमएसआरडीसीकडून काढून घेतले गेले किंवा अमूक विषयाचा पाठपुरावा आपण करू नये असे तोंडी आदेश या विभागाला दिले गेले. मध्यंतरी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली इम्पॉवर्ड कमिटीची बैठक झाली. त्यात बहुचर्चित पेडर रोड उड्डाणपुलावर फुली पडली. वरळी-हाजीअली सागरी सेतूदेखील गुंडाळण्यात आला. कारण वरळी-हाजीअली-वांद्रे-वर्सोवा असा कोस्टल रोड महापालिकेतर्फे करण्याचे घाटले जाऊ लागले. त्यासोबतच ठाणे खाडीपूल ३ या प्रकल्पांचा पाठपुरावा एमएसआरडीसीने करू नये, अशा सूचना केल्या गेल्या. हा खाडीपूल पीडब्ल्यूडीकडे देण्यात येणार आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गाची क्षमता वाढ करण्याचे काम गुंडाळले गेले आहे. एनएच चारवर नवीन कामासाठी ४०० कोटी रुपये मंजूर झाले. मात्र त्यावर पुढे काहीच झालेले नाही. कार टोलमाफीमुळे घोडबंदर रोडवरील उन्नतमार्गाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्वारगेट पुणे इंटिग्रेटेड टर्मिनसचे काम थंड्या बस्त्यात गेले आहे. मुंबई-पुणे स्मार्ट सिटी करण्याचा प्रकल्पही कागदावरच उरला आहे. पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे कार्यक्षेत्र लोणावळ्यापर्यंत गेले तर सिडकोचा नयना प्रकल्प खोपोलीपर्यंत आल्यामुळे एमएसआरडीसीची स्मार्ट सिटी केवळ कागदावर उरली आहे.मुंबई जलवाहतूक महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडे दिली गेली. इस्ट कोस्ट व वेस्ट कोस्टच्या निविदा काढल्या गेल्या, त्यातल्या एकाला मान्यता दिली गेली, पण ते आता रद्द करून सगळे मॉडेलच बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. (उद्याच्या अंकात :पीडब्ल्यूडीचे अतिक्रमण)