शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसी स्मार्ट सिटीसाठी ६ हजार ५०० कोटींचा आराखडा

By admin | Updated: October 4, 2015 04:19 IST

कल्याण-डोंबिवलीतील युवकांना रोजगारासाठी दीड-दोन तासांचा धक्काबुक्की आणि घुसमटत प्रवास करावा लागणार नाही. या ठिकाणीच एक लाख नोकऱ्या पहिल्या टप्प्यात

डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीतील युवकांना रोजगारासाठी दीड-दोन तासांचा धक्काबुक्की आणि घुसमटत प्रवास करावा लागणार नाही. या ठिकाणीच एक लाख नोकऱ्या पहिल्या टप्प्यात आणि त्या नंतरच्या टप्प्यात मोजता येणार नाहीत एवढ्या संधी निर्माण होणार आहेत. या ठिकाणीच वेगवेगळ्या योजना राबवण्यासाठी राज्य शासनाने ६ हजार ५०० कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. एवढेच नव्हे, तर स्मार्टसह सेफ सिटीसाठीही या महापालिकेला प्राधान्य दिले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवलीत भाजपाच्या विकास परिषद कार्यक्रमात केली. ६,५०० कोटींमध्ये ३०० कोटी पाणी नियोजनासाठी, ३०० कोटी घनकचरा निर्मूलन, १८२२ कोटी रस्ते, आरोग्यासाठी १५०० कोटी, एसआरए योजनेसाठी १ हजार कोटी, प्रदूषणमुक्तीसाठी १७२ कोटी यासह विविध सुधारणा करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. त्यासाठीचा कृती आराखडा तयार असून त्यातून स्मार्ट सिटी निर्माण केली जाणार आहे. राज्यात विविध प्रकल्पांसाठी गुंतवणूक करण्यासाठी जपानसह चीन हे देश तयार असून त्या दृष्टीने बोलणीही सुरू आहेत. त्यामुळे आगामी काळात राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणार आहे. त्यात ऐतिहासिक कल्याण आणि सांस्कृतिक नगरी असलेले डोंबिवली कसे काय वंचित ठेवले जाणार, असे ते म्हणाले.नागपूरवगळता बहुतांशी ठिकाणी पाणीगळती आणि त्याच्या पुरवठ्यातील नियोजनाचा अभाव असल्याने अनेक समस्या निर्माण होतात. त्या होऊ नयेत, यासाठी चांगले नियोजन आणि पारदर्शकता आणणे आवश्यक आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पारदर्शक कारभार यांच्या माध्यमातून आपण ही शहरे स्मार्ट करणार आहोत. ही केवळ आश्वासने नसून आगामी काळात प्रत्यक्ष कृतीतून ते आपल्याला दिसेल, असेही ते म्हणाले. सुरक्षित शहरांबाबत ते म्हणाले की, पुणे शहरासारखी यंत्रणा येथे कार्यान्वित होणार असून देशातील केवळ एकमेव पुणे शहर पूर्णत: सीसी कॅमेऱ्यांमध्ये बंदिस्त आहे. त्यामुळे कोणत्याही गैरव्यवहारावर लक्ष ठेवण्यास साहाय्य होत आहे. शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचीही सुरक्षा त्यातून ठेवली जात आहे. त्यामुळे पालकांची चिंता मिटवण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे आगामी काळात सरकारची गुणवत्ता, परिणामकारकता आणि दिलेल्या सर्व आश्वासनांचे-सेवांचे उत्तरदायित्व या निकषांवर काम करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. या वेळी व्यासपीठावर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षणमंत्री विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, समाजकल्याणमंत्री दिलीप कांबळे, खासदार कपिल पाटील, आमदार रवींद्र चव्हाण, नरेंद्र पवार, किसन कथोरे, गणपत गायकवाड, मंगलप्रभात लोढा आदींसह माजी मंत्री जगन्नाथ पाटील, शशिकांत कांबळे, राहुल दामले, आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते. यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी कोळसेवाडी आमदार गणपत गायकवाड यांच्या संपर्क र्कायालयाचे उद्घाटन केले.