शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळासाठी ४,३०० कोटी द्या!

By admin | Updated: November 7, 2015 22:32 IST

दुष्काळावर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडे ४३०० कोटी रुपयांची मदत मागण्याचे राज्य सरकारने ठरविले असून तसे औपचारिक निवेदन दिल्लीकडे पाठविले जाईल, असे महसूलमंत्री

मुंबई : दुष्काळावर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडे ४३०० कोटी रुपयांची मदत मागण्याचे राज्य सरकारने ठरविले असून तसे औपचारिक निवेदन दिल्लीकडे पाठविले जाईल, असे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शनिवारी सांगितले. याचा लाभ राज्यातील ६० लाख शेतकऱ्यांना होईल, असेही खडसे म्हणाले.आॅक्टोबर अखेरच्या आणेवारीनुसार राज्यात दुष्काळी गावांच्या संख्येत वाढ झाली असून बुलडाणा जिल्ह्णातील १०३९ गावांचा दुष्काळग्रस्त गावांमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त गावांची संख्या आता १५ हजार ७४७ झाली आहे. आॅक्टोबर अखेर आलेल्या आणेवारीचा आढावा घेऊन केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव पाठविण्यातबाबत खडसे यांनी मंत्रालयात बैठक घेतली. यावेळी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, कृषि विभागाचे अपर मुख्य सचिव डी. के. जैन, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव गोविंदराज, कृषि आयुक्त विकास देशमुख उपस्थित होते.यासंदर्भात माहिती देताना खडसे म्हणाले, दुष्काळग्रस्त गावांच्या मदतीसाठी केंद्राकडे रविवारी निवेदन पाठविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यासंदर्भात केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांच्याशीही दूरध्वनीवरून चर्चा करण्यात आली असून केंद्राच्या पाहणीचे पथक महाराष्ट्रात आठवडाभरात पाठविण्याची विनंती त्यांना केली आहे असेही खडसे म्हणाले. केंद्राने दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठीचे जे निकष केले आहे ते सर्व राज्य शासनाने मान्य केले असून पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना विम्याची रक्कम आणि केंद्राची दुष्काळाची मदत या दोन्ही मदतीचा लाभ मिळणार आहे, असे ते म्हणाले. यावर्षी गेल्यावर्षीच्या दुप्पट म्हणजे ८३ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत आपला सहभाग नोंदविला आहे. त्याचबरोबर सर्व जिराईत, कोरडवाहू पिकांसाठी प्रती हेक्टरी ६८०० रुपये निविष्ठा अनुदान दिले जाणार आहे. बागायत पिकांसाठी प्रती हेक्टरी १३ हजार ५०० रुपये तर फळबाग क्षेत्रासाठी १८००० रुपये निविष्ठा अनुदान दिले जाईल. ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या पिकांना ही मदत दिली जाईल. पीकविमा योजनेअंतर्गत मिळणार मदतअल्प व अत्यल्प भूधारकांच्या पूर्ण क्षेत्रासाठी ही मदत लागू असून बहुभूधारकांच्या बाबतीत मदतीची मर्यादा एक हेक्टरवरून दोन हेक्टर केली आहे. विशेष म्हणजे, उडीद, मुग, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल यासारख्या लहान कालावधीची पिक आहेत ज्यांना पूर्वी मदत मिळायची नाही अशा पिकांना देखील यंदा मदत मिळणार असल्याचे खडसे यांनी सांगितले.