शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

उल्हासनगर महापालिका निवडणुकीतील सिंगल वॉर्डमुळे इच्छुकांची भाऊगर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 17:57 IST

रिपाइं, मनसे आदी पक्ष नेत्यांनी व्यक्त केला आनंद 

सदानंद नाईक 

उल्हासनगर : महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक सिंगल (एकल) वॉर्डनुसार होणार असल्याने रिपाइं, मनसे, बीएसपी, भारिप आदीसह शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना पक्षात उत्सवाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे भाजपच्या गोटातून नाराजीचा सूर निघत आहेत. सिंगल वॉर्डमुळे लहान पक्षांना फायदा होणार असल्याने, इच्छुकांच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र आहे.

उल्हासनगर महापालिकेत भाजपचे बहुमत असलेतरी, पक्षातील ओमी कलानी टीम समर्थक नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्याने, महापालिकेवर शिवसेना व मित्र पक्षाची सत्ता आहे. तसेच महापौर पदाच्या निवडणुकी पूर्वी स्थानिक साई पक्षाचे ११ नगरसेवक भाजप मध्ये विलीन झाल्याने, भाजपचे महापालिकेत पूर्ण बहुमत आहेत. मात्र सिंगल वॉर्ड रचनेमुळे साई पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचे संकेत पक्षाच्या आशा इदनानी यांनी दिले. सिंगल वॉर्डमुळे मोठ्या पक्षा पेक्षा लहान पक्षाला फायदा होण्याची शक्यता निर्माण झाली असून इच्छुक उमेदवारांच्या संख्येत वाढ झाली. मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख, रिपाइंचे शहराध्यक्ष व उपमहापौर भगवान भालेराव, भारिपचे शेषराव वाघमारे, पीआरपीचे ठाणे जिल्हाध्यक्ष प्रमोद टाले, बीएसपीचे प्रशांत इंगळे आदींनी सिंगल वॉर्ड रचनेचे स्वागत केले. तसेच त्यांच्या नगरसेवक संख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली. 

शहरात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, स्थानिक ओमी कलानी टीम, स्थानिक साई पक्ष, रिपाइं, मनसे आदींची शक्ती कमी अधिक प्रमाणात आहेत. आपसातील आघाडी नंतर, कोणाची सत्ता महापालिकेवर येते. हे सांगणे कठीण आहे. गेले दीड शतक महापालिका सत्तेची चाबी स्थानिक साई पक्षाकडे राहिली असून पक्षाचे नेते जीवन इदनानी यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले. साई पक्षाने सुरवातीला दोन वेळा शिवसेनेला पाठिंबा देऊन पक्षाला लिलाबाई अशान व आशा इदनानी यांच्या रूपाने दोन वेळा महापौर पदासह उपमहापौर, स्थायी समिती सभापती पद पदरात पाडून घेतले. त्यानंतर भाजपला पाठिंबा देऊन उपमहापौर पदासह अन्य पदे पक्षाकडे ठेवण्यात इदनानी याना यश आले. त्यानंतर इदनानी यांनी स्वतःसह अन्य नगरसेवकांसह भाजपात समाविष्ट झाले. मात्र पुन्हा पक्षाच्या चिन्हावर स्वतंत्रपने निवडणूका लढण्याचा मानस त्यांचा असल्याचे बोलले जाते. 

भाजप-शिवसेनेत चिंतेचे वातावरण 

सिंगल वॉर्डाचा फटका भाजपसह शिवसेनेला यापूर्वी बसला असून त्यांच्या नगरसेवकांची संख्या २० च्या पुढे गेली नव्हती. यावेळी सिंगल वॉर्डाचा फायदा रिपाइं, मनसे यांच्यासह स्थानिक साई पक्ष, ओमी कलानी, अपक्ष यांना मिळणार असल्याचे बोलले जाते. पक्षाचे सर्वच स्थानिक नेते जुळवाजुळव करायला निघाल्याचे चित्र शहरात होते. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर