शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

मुलाच्या लग्नात भाजपा नेत्याचे शाही लक्षभोजन

By admin | Updated: April 17, 2016 03:42 IST

राज्यात भीषण दुष्काळ अन् पाणीटंचाई असतानाही शनिवारी सायंकाळी उदगीरमध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार गोविंद केंद्रे यांनी आपल्या चिरंजीवाच्या लग्नात शाही थाट

उदगीर (जि. लातूर) : राज्यात भीषण दुष्काळ अन् पाणीटंचाई असतानाही शनिवारी सायंकाळी उदगीरमध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार गोविंद केंद्रे यांनी आपल्या चिरंजीवाच्या लग्नात शाही थाट केला़ या सोहळ्यात एक लाख वऱ्हाडींची पंगत उठली़ पंगतीला बसलेल्या प्रत्येक माणसाला स्वतंत्र बाटलीबंद पाणी हे या लग्नाचे वैशिष्ट्य होते. गोविंद केंद्रे यांच्या मुलाचा शनिवारी सायंकाळी राजेशाही थाटात विवाह सोहळा पार पडला़ केंदे्र यांचा मतदारसंघ असलेला उदगीर भीषण पाणीटंचाईने होरपळत असताना येथे या शाही सोहळ्याची चर्चा रंगत होती़ तीस एकराहून अधिक क्षेत्रावर उभारलेला खुला मंडप, भव्यदिव्य स्वागतद्वार, विवाहमंच अन् त्यावरील रोषणाई, डोळे दिपवणारी प्रकाशव्यवस्था, विवाहानंतर झालेली आतषबाजी या सर्व उधळपट्टीचे सत्ताधारी मंत्री साक्षीदार राहिले़ विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, गृहराज्यमंत्री राम शिंदे, राज्यमंत्री दिलीप कांबळे, विजयकुमार देशमुख, खासदार प्रीतम मुंडे, डॉ़ सुनील गायकवाड यांच्यासह राज्यभरातील आजी-माजी आमदारांची या सोहळ्याला उपस्थिती होती़ ‘त्या’ सोहळ््याची आठवणसन १९७२-७३च्या भीषण दुष्काळात सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या लग्नाला देखील अकलूज येथे लक्षभोजनाचा थाट मांडला गेला होता. त्यावेळी वरपिता ज्येष्ठ नेते शंकरराव मोहिते पाटील यांच्यावर सर्व स्तरावर टीकेचा भडिमार झाला होता. याची आठवण अनेकांना झाली.आपण समाजकारण व राजकारण करीत असताना ७ हजारांपेक्षा अधिक जणांच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहिलो़ त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी व आपल्याला एकूलता एक मुलगा असल्याने असा सोहळा घ्यावा लागल्याचे गोविंद केंद्रे यांनी विवाह समारंभाच्या प्रारंभी निवेदनात सांगितले़मराठवाड्याला दुष्काळाची सर्वाधिक झळ बसली असून लातूर, बीड, उस्मानाबाद हे जिल्हे दुष्काळाच्या खाईत सापडले आहेत़ अनेकांवर गाव सोडण्याची वेळ आली आहे़ लातूरसारख्या शहराला रेल्वेने पाणी येत आहे़ परंतु, भाजपा नेत्यांनाच याचा विसर पडलेला दिसून येत आहे़