शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

मुलाच्या लग्नात भाजपा नेत्याचे शाही लक्षभोजन

By admin | Updated: April 17, 2016 03:42 IST

राज्यात भीषण दुष्काळ अन् पाणीटंचाई असतानाही शनिवारी सायंकाळी उदगीरमध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार गोविंद केंद्रे यांनी आपल्या चिरंजीवाच्या लग्नात शाही थाट

उदगीर (जि. लातूर) : राज्यात भीषण दुष्काळ अन् पाणीटंचाई असतानाही शनिवारी सायंकाळी उदगीरमध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार गोविंद केंद्रे यांनी आपल्या चिरंजीवाच्या लग्नात शाही थाट केला़ या सोहळ्यात एक लाख वऱ्हाडींची पंगत उठली़ पंगतीला बसलेल्या प्रत्येक माणसाला स्वतंत्र बाटलीबंद पाणी हे या लग्नाचे वैशिष्ट्य होते. गोविंद केंद्रे यांच्या मुलाचा शनिवारी सायंकाळी राजेशाही थाटात विवाह सोहळा पार पडला़ केंदे्र यांचा मतदारसंघ असलेला उदगीर भीषण पाणीटंचाईने होरपळत असताना येथे या शाही सोहळ्याची चर्चा रंगत होती़ तीस एकराहून अधिक क्षेत्रावर उभारलेला खुला मंडप, भव्यदिव्य स्वागतद्वार, विवाहमंच अन् त्यावरील रोषणाई, डोळे दिपवणारी प्रकाशव्यवस्था, विवाहानंतर झालेली आतषबाजी या सर्व उधळपट्टीचे सत्ताधारी मंत्री साक्षीदार राहिले़ विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, गृहराज्यमंत्री राम शिंदे, राज्यमंत्री दिलीप कांबळे, विजयकुमार देशमुख, खासदार प्रीतम मुंडे, डॉ़ सुनील गायकवाड यांच्यासह राज्यभरातील आजी-माजी आमदारांची या सोहळ्याला उपस्थिती होती़ ‘त्या’ सोहळ््याची आठवणसन १९७२-७३च्या भीषण दुष्काळात सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या लग्नाला देखील अकलूज येथे लक्षभोजनाचा थाट मांडला गेला होता. त्यावेळी वरपिता ज्येष्ठ नेते शंकरराव मोहिते पाटील यांच्यावर सर्व स्तरावर टीकेचा भडिमार झाला होता. याची आठवण अनेकांना झाली.आपण समाजकारण व राजकारण करीत असताना ७ हजारांपेक्षा अधिक जणांच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहिलो़ त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी व आपल्याला एकूलता एक मुलगा असल्याने असा सोहळा घ्यावा लागल्याचे गोविंद केंद्रे यांनी विवाह समारंभाच्या प्रारंभी निवेदनात सांगितले़मराठवाड्याला दुष्काळाची सर्वाधिक झळ बसली असून लातूर, बीड, उस्मानाबाद हे जिल्हे दुष्काळाच्या खाईत सापडले आहेत़ अनेकांवर गाव सोडण्याची वेळ आली आहे़ लातूरसारख्या शहराला रेल्वेने पाणी येत आहे़ परंतु, भाजपा नेत्यांनाच याचा विसर पडलेला दिसून येत आहे़