शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

‘रोटरी क्लब’ने उचलला रेल्वे स्थानकांच्या स्वच्छतेचा विडा!

By admin | Updated: March 12, 2016 02:23 IST

भुसावळ मंडळातील १0 रेल्वे स्थानकांवर राबविणार ‘स्वच्छ भारत’ अभियान!

अकोला: रेल्वे प्रशासनाच्यावतीने देशातील सर्व रेल्वे स्थानकांवर ह्यस्वच्छ रेल - स्वच्छ भारतह्ण हे अभियान राबविले जात आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळात या अभियानाची यशस्वी अंमलबजावणी व्हावी, याकरिता रोटरी क्लबने विभागातील १0 रेल्वे स्थानकांवर हे अभियान राबविण्याचा विडा उचलला आहे. रेल्वे आणि रोटरी क्लब ३0३0 यांच्यात तीन वर्षांसाठी झालेल्या करारानुसार रोटरीच्यावतीने हे अभियान अकोल्यासह विभागातील अमरावती, बडनेरा, शेगाव, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड व नाशिक रोड रेल्वे स्थानकावर राबविले जाणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध सामाजिक क्षेत्रांमध्ये कार्य करणारी रोटरी संघटना सन १९0५ मध्ये अस्तित्वात आली. संपूर्ण जगात या संघटनेचे १.३ कोटींपेक्षा अधिक सदस्य असून, देशातील ५३0 जिल्ह्यांत ३३ हजार शाखा या संघटनेने स्थापन केल्या आहेत. विविध क्षेत्रांमध्ये सामाजिक कार्य करणार्‍या या संघटनेची विदर्भात ह्यरोटरी क्लब ३0३0ह्ण ही शाखा कार्यरत आहे. रोटरी क्लबच्या या शाखेने भुसावळ मंडळातील १0 रेल्वे स्थानकांवर स्वच्छता अभियान राबविण्याचा विडा उचलला आहे. यासाठी तीन वर्षांचा करार २६ फेब्रुवारी २0१६ रोजी मध्य रेल्वे भुसावळ मंडळाचे विभागीय व्यवस्थापक आणि रोटरी क्लब ३0३0 चे जिल्हा राज्यपाल डॉ. निखिल किबे यांच्यात झाला. यावेळी संघटनेचे महेश मोखडकर, डॉ. के. एस. राजन व राजीव शर्मा उपस्थित होते. या अभियानाची व्याप्ती धुळे, बुलडाणा, यवतमाळ तसेच बर्‍हाणपूर व खंडवा या रेल्वे स्थानकांपर्यंत राहणार आहे. या अभियानाची अंमलबजावणी करीत असताना रेल्वे स्थानकांची स्वच्छता आणि सुंदरतेकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. लोकसहभाग वाढविण्यासाठी आणि सुरक्षिततेबाबत जनजागृतीही करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. निखिल किबे यांनी दिली.