शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

राज्याच्या राजकारणाचे ‘रोलमॉडेल’

By admin | Updated: February 25, 2017 01:10 IST

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई नगरीत सत्ता असावी, ही भाजपाची खूप जुनी महत्त्वाकांक्षा होती. तथापि, राज्यात लहान भाऊ हे बिरुद लागले असल्याने मुंबईत हातपाय पसरायचे तरी कसे

राहुल रनाळकर , मुंबईदेशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई नगरीत सत्ता असावी, ही भाजपाची खूप जुनी महत्त्वाकांक्षा होती. तथापि, राज्यात लहान भाऊ हे बिरुद लागले असल्याने मुंबईत हातपाय पसरायचे तरी कसे हे भाजपाला काही केल्या उमगत नव्हते. पण देशापाठोपाठ राज्यात मुसंडी मारल्याने मुंबईची सत्ता भाजपाला अडीच वर्षांपासूनच खुणावू लागली होती. गुजराती मनांना तर मुंबईचे भलतेच आकर्षण. काहीही करून मुंबई काबीज करायची ही सुप्त महत्त्वाकांक्षा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची होती. त्यामुळेच मुंबईसाठी रणनीती आखणे भाजपाने अडीच वर्षांपूर्वीच सुरू केले होते. त्या रणनीतीला लागलेली फळे म्हणजे महापालिकेचा ताजा निकाल. आकडा ८२. शिवसेनेकडून कोणतीही सत्ता खेचून घेतली किंवा केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्यातूनही त्यांना बाहेर पडावे लागले तरी सेनेला फार दु:ख होणे संभवत नव्हते. पण मुंबई ही शिवसेनेसाठीही दुखरी जागा आहे. मुंबईवर आपलीच सत्ता राहावी, हे गणित गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेने जपून ठेवले आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपापेक्षा अवघ्या २ जागा जास्त मिळवून शिवसेना क्रमांक एकचा पक्ष ठरला. काही अपक्षांची मदत घेऊन शिवसेना आपली ताकद आता अधिक वाढविण्याचा प्रयत्न करेल. भाजपाला देखील अन्य पक्षीयांसह अपक्षांना गळाला लावण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यात महापौरपद हा सगळ््यात कळीचा मुद्दा ठरणार आहे. सत्ता स्थापनेचे सूत्र अजून स्पष्ट झालेले नाही. युती पुन्हा होणार का? झाली तर ती कोणत्या निकषांवर होईल, हे पाहणं सर्वांत महत्त्वाचं ठरणार आहे. युती झाल्यास भाजपाकडून महापौरपदाची मागणी सहाजिकच होईल. त्यामुळे चर्चा किती होणार आणि तडजोडीचे मुद्दे कुठले असतील, हे स्पष्ट व्हायला थोडा अवधी जाईल. शिवसेनेने प्रचाराच्या रणधुमाळीत भाजपाविरुद्ध आघाडी नेतृत्त्व करण्याचे सुतोवाच केले होते. त्यामुळे उद्धव यांचा तोच रोख कायम राहणार? की युतीकडे कल राहील, हे पाहणंही महत्त्वाचं आहे.