शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
2
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
3
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
4
"तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
5
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
6
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
7
Operation Sindoor Live Updates: 'पाकिस्तानला मेसेज मिळालाय, आता थेट तुमच्या मुख्यालयावरच हल्ला करू'
8
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
9
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
10
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
11
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
12
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
13
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
14
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
15
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
16
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
17
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
18
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
19
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
20
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती

सेना सत्तेत गेली तर विरोधकाची भूमिका

By admin | Updated: December 1, 2014 02:08 IST

भाजपाने शिवसेनेला सत्तेत बरोबर घेतले तर राष्ट्रवादी काँग्रेसला वाईट वाटण्याचे कारण नाही. पुन्हा निवडणुकांना सामोरे जावे लागू नये

मुंबई : भाजपाने शिवसेनेला सत्तेत बरोबर घेतले तर राष्ट्रवादी काँग्रेसला वाईट वाटण्याचे कारण नाही. पुन्हा निवडणुकांना सामोरे जावे लागू नये, राष्ट्रपती राजवट लागू होऊ नये, म्हणून सरकारला पाठिंबा दिला होता. शिवसेना सत्तेत गेली तर विरोधी पक्षनेतेपद मोकळे होईल आणि राष्ट्रवादी विरोधकाची भूमिका बजावेल, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. सरकारला पाठिंबा द्या, अशी मागणी भाजपाने केलेली नाही. शिवाय आमच्या नेतृत्वाने शिवसेना सत्तेत सहभागी झाली तर सुंठीवाचून खोकला जाईल, असे मत व्यक्त केले असल्याचे ते म्हणाले.पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कापसाला ६,५०० रुपये हमीभाव द्यावा, साखरेवरील आयात कर २५ टक्क्यांऐवजी ४० टक्के करावा, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत दुष्काळ जाहीर करावा, जवखेड्यातील हत्याकांडाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, आदी मागण्या केल्या. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पुढील आठवड्यापासून सुरू होत असून त्यापूर्वी राज्यातील शेतकरी, साखर कारखाने यांच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. यामुळे सरकारला कार्यवाही करण्यास पुरेसा वेळ मिळेल, असे ते म्हणाले. महाराष्ट्रातील कुठलाही समाजघटक अडचणीत आला तर त्याची बाजू सभागृहात मांडणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. राज्यात आमचे सरकार असताना सरकारी मदतीचे निकष बाजूला ठेवून दुष्काळग्रस्त, गारपीटग्रस्त यांना विशेष मदत दिली आहे. आताही सरकारने तशीच कृती करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. (विशेष प्रतिनिधी)