शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
4
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
5
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
6
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
7
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
9
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
10
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
11
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
12
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
13
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
14
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
15
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
16
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
17
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
18
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
19
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
20
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार

नोकरशहांची भूमिका महत्त्वाची

By admin | Updated: October 4, 2015 00:59 IST

महाराष्ट्रात उद्योगस्नेही वातावरण निर्माण व्हावे, येथील उद्योगांची भरभराट व्हावी यासाठी राज्यात नव्याने सत्तेत आलेल्या सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत.

- प्रवीण तापडिया (लेखक विदर्भ इंडस्ट्रीज असोसिशनचे माजी अध्यक्ष आहेत.) महाराष्ट्रात उद्योगस्नेही वातावरण निर्माण व्हावे, येथील उद्योगांची भरभराट व्हावी यासाठी राज्यात नव्याने सत्तेत आलेल्या सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. आणि हे करीत असताना सरकारचा हेतू अथवा प्रामाणिकपणाबद्दल शंका घेण्याचे काही कारण नाही. त्यामुळे भविष्यकाळात महाराष्ट्र उद्योगप्रिय राज्यांच्या क्रमवारीत निश्चित प्रथम स्थान प्राप्त करू शकेल, असा विश्वास आहे. परंतु हे यशोशिखर गाठण्याकरिता गरज आहे ती नोकरशाहीची मानसिकता बदलण्याची. कारण उद्योगस्नेही वातावरण निर्माण करणे हे काही एकट्यादुकट्या व्यक्तीचे काम नाही, तर ती एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत सहभागी प्रत्येक घटकाने अत्यंत सकारात्मक दृष्टिकोनातून याचा विचार करायला हवा. उद्योग आणि उद्योजकांसाठी सुकर परिस्थिती आपल्या राज्यातही निर्माण होऊ शकते. गरज आहे ती केवळ अधिकाऱ्यांच्या इच्छाशक्तीची. बहुतांश अधिकाऱ्यांची नकारात्मक मानसिकता आणि अधिकारशाही उद्योगांच्या प्रगतीतील अडसर ठरत आहे. त्यामुळे उद्योजकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. साधा इमारतीचा नकाशा मंजूर करून घ्यायलाही अडथळ्यांची शर्यत पूर्ण करावी लागते. गेल्या १५ ते २० वर्षांपासून या विभागांमध्ये अकार्यक्षमता आणि भ्रष्टाचाराची दलदल निर्माण झाली आहे. स्वच्छ भारत अभियानाप्रमाणे ही दलदलही साफ करण्याची आवश्यकता आहे. बरेचदा उद्योग सुरू करण्यास इच्छुक लोक कुठलाही धोका पत्करायला तयार नसतात. प्रत्येक गोष्ट आपोआप मिळणार नाही. त्यासाठी कठोर परिश्रमांची गरज असते. प्रामुख्याने स्टार्टअप्ससाठी दर्जेदार सेवा प्राधान्यक्रमावर असणे गरजेचे आहे. संकल्पना, अंमलबजावणीची क्षमता, आवड व निर्धार असल्यास या जगात अशक्य काहीच नाही.